शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

मग काय राहुल गांधींची आरती करायची का?

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनबाबत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा उपहास करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. देशात हिटलरचे राज्य निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मत माजी संरक्षण मंत्री, कुठले कुठले माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री असे सुशीलकुमार शिंदे बोलत आहेत. याचे सुशीलकुमार शिंदे यांना अतीशय दु:ख होते आहे. त्यांचा कायम हसरा चेहरा ही  चिंता व्यक्त करताना अतीशय गंभीर झाला आहे. पण यातून सुशीलकुमारांची लाचारी प्रकट होते आहे.
  •    राहूल गांधी हे उपहास, थट्टा करण्यासाठीच जन्मले आहेत अशा अविर्भावात ते वागत असतात. मग थट्टेसाठी जन्म झालेल्या माणसाची थट्टा उपहास का होवू नये? आज राहूल गांधी ज्या वयाचे आहेत त्या वयात सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्रातील मंत्रीपद उपभोगले आहे. चांगला अभ्यास, वक्तृत्व त्यांच्याकडे आहे असा नावलौकीक आहे. मग या नावलौकीकाचा वापर सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधींची खुशामत करण्यासाठी घालवावी? सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी काही तरी माकडचेष्टा करतील आणि आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करतील असे स्वप्न पडले काय?
  •    का करू नयेत राहूल गांधींच्या थट्टा, उपहास? काय चांगले काम केले आहे त्यांनी या देशासाठी? केवळ माझी आजी, माझा बाप, माझा आजोबा यांचे कर्तृत्व सांगण्यापलिकडे स्वत:चे असे राहुल गांधींकडे काय आहे? कोणत्या गुणांचे कौतुक केले पाहिजे त्यांचे? द्यावे याचे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी.
  •   जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही, पाकनीष्ठ लोकांच्या पंगतीत जावून बसणार्‍या, त्यांचे समर्थन करणार्‍या राहुल गांधींच्या आरत्या ओवाळाव्यात असे सुशीलकुमार शिंदे यांना वाटते काय? देशद्रोह्यांना पाठीशी घालून त्यांचे समर्थन करणार्‍यांचा सत्कार करावा अशी सुशीलकुमार शिंदे यांची अपेक्षा आहे काय? पाकीस्तान हा भारताचा तहहयात शत्रू आहे. त्या शत्रूच्या गोटातील आणि भारताला घातक असणार्‍या व्यक्तिंचे समर्थन करण्याचे काम राहुल गांधी करत असतील तर त्यांची थट्टा होणार नाही तर काय भारतरत्न म्हणून गौरवले पाहिजे अशी सुशीलकुमार शिंदे यांची अपेक्षा आहे काय? बस झाली ही लाचारी आता. जरा मराठी माणसाचा स्वाभीमान दाखवा आणि चेहर्‍यावर करारी भाव आणा.
  • राहुल गांधींनी काय केले हो आजवर? माकडचेष्टा करण्यापलिकडे काही केले आहे काय? त्यांना माकड बनवण्याचे काम कॉंग्रेसच्या लोकांनीच केले आहे हे वेगळे. दोन वर्षांपूर्वी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ ग्रस्तांसाठी ऐन पावसात दौरा काढण्याचे महान काम राहुल गांधी यांनी केले होते. दुष्काळ जानेवारी ते जुलै पर्यंत होता. हे महाशय पाउस पडल्यावर आले. मग काय? रोजगार हमीची कामे आहेत काय? हे पाहण्यासाठी गेले तर तिथे बोगस माणसे उभी केली होती. रोजगार हमीच्या मजूरांना रोजच्या रोज पगार आणि धान्य द्यायचे असते. पण तीन महिने ते दिले गेले नाही. कॉंग्रेस राजवटीचा हा चेहरा प्रसारमाध्यमांपुढे येवू नये म्हणून कॉंग्रेसने आटापिटा केला. सगळ्या मजुरांना लपवून शाळेत बंद करून ठेवले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मजूर म्हणून उभे केले. त्यांनी अहवाल दिला, सगळं कसं छान चाललं आहे. हे पाहून राहुल गांधी खूष झाले. त्यांनीही चार पाट्या टाकण्याचे काम केले. पण प्रसारमाध्यमांपर्यंत ही बोगस मजूर आणि फसवेगिरीची बातमी पोहोचलीच. चांगले काम होते तर कॉंग्रेसला लोकसभा आणि विधानसभेत का पराभव पत्करावा लागला? ही थट्टा कोणी केली याचे उत्तर आता सुशीलकुमार शिंदे यांनी दिले पाहिजे. आपलेच कार्यकर्ते आपल्यालाच उल्लू बनवत आहेत आणि अशा पक्षाचे आपण उपाध्यक्ष, युवराज आहोत, पंतप्रधानपदाचे उमेदवार आहोत याचा राहुल गांधींना गौरव वाटतो का? मग त्याची थट्टा ही होणारच.
  • विदर्भातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना भेटायला म्हणून राहुल गांधींनी दौरा केला. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची पत्नी कलावतीबाई हीची त्यांनी कशी फसवणूक केली? तिच्या झोपडीत जावून  जेवण केल्याचे फोटो छापले. प्रत्यक्षात घरचाच डबा नेलेला होता. तिला आश्‍वासने दिली आणि मते मिळवली. पण नंतर वार्‍यावर सोडून दिले. या माकडचेष्टा नाहीत काय? मग थट्टा होणारच.
  •    चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मुंबई दौरा केला तेव्हा मुंबई लोकलने प्रवास केला. घाटकोपर स्टेशनवर कारमधून उतरले आणि लोकलप्रवासाचे नाटक केले. एटीएममध्ये जावून पैसे काढले आणि रांगेत उभे राहून त्यांनी तिकीट काढले. पण या एका तिकीटावर शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फुकट प्रवास केला. त्यावेळी राहुल गांधी कॉंग्रेसचे खासदार होते. खासदाराला रेल्वेचा प्रवास फुकट असतो. त्यांना तिकीट काढण्याची गरज काय होती? तरीही काढले. ज्या कार्यकत्यार्ंंनी तिकीटे काढणे आवश्यक होते त्यांनी फुकट प्रवास केला. अशाप्रकारे देशाला बुडवणार्‍या नेत्याची काय आरती करायची?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: