- स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतीची तपासणी करावी आणि अधिकृतपणेच गर्भाची लिंगचाचणी करून गर्भ मुलगा आहे की मुलगी, याची नोंद करावी आणि तेच मूल ती जन्माला घालते की नाही याची पाहणी करावी, अशी योजना भविष्यात आखता येते का, याबाबत विचार सुरू आहे, असे मनेका गांधी यांनी सोमवारी म्हटले होते. अर्थात या अत्यंत महत्वाकांक्षी आणि धाडसी निर्णयावर टीका होणे स्वाभाविक आहे. कारण मनेका गांधी या असेच काहीतरी जगावेगळे करत असतात. भटकी कुत्री, उपद्रवी प्राणी यांच्याबाबत प्रेम असणार्या मनेका गांधींना माणसांच्या अर्भकाबद्दल प्रेम निर्माण झाले हेही नसे थोडके.
- पण सोमवारी त्यांनी हे जाहीर केले आणि लगेच त्यांच्यावर टिकेला सुरूवात झाली. त्यामुळे मनेका गांधींनी काल लगेच सारवासारव केली. त्या म्हणाल्या की, गर्भलिंग निदान चाचणी अधिकृत करण्याची केवळ कल्पना असून तो प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे. मनेका गांधींचे म्हणणे आहे की, स्त्रीभ्रूणहत्येची समस्या रोखण्यासाठीचा हा वेगळा दृष्टीकोन आहे. याबाबत महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, यापूर्वी नागरिकांकडूनच मंत्रालयाला मिळालेली सूचना महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी मांडली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, याबाबत आणखी चर्चा व्हायला हवी. माध्यमांनी याबाबत त्यांच्या सूचना द्यायला हव्यात. याबाबत सध्यातरी मंत्रालयाकडे कोणताही औपचारिक प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
- पण जर भविष्यात मनेका गांधींनी असा प्रस्ताव मांडलाच तर ते भ्रष्टाचाराचे फार मोठे कुरण असेल. याचे कारण मनेका गांधींचा हा प्रस्ताव म्हणजे वैद्यक क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिकृत करण्याचे काम असेल.
- मनेका गांधीं कितीही साळसूदपणा आणत असल्या, जीव, अहिंसा, भृणहत्या रोखणे याबाबत बोलत असल्या तरी त्या शेवटी गांधी आहेत, हे विसरून चालणार नाही. कारण भ्रष्टाचाराशिवाय आणि भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याशिवाय हे गांधी कुटुंब काही करू शकत नाही. गेल्या दोन दशकात या मनेकाबाईंनी अशाचप्रकारे कुत्रांना वाचवून फार मोठी माया जमवली असण्याची शक्यता आहे. याचे कारण श्वानप्रेम यातून निर्माण झालेल्या बहुसंख्य प्राणीमित्र ंसंघटना हाच एक फार मोठा फ्रॉड आहे. देशभरातील श्वानप्रेमींच्या नावाखाली निर्माण झालेल्या एनजीओंना चरण्याचे नवे रान मनेका गांधींनी निर्माण करून दिले आहे. त्यामुळेच आता वैद्यकीय क्षेत्रात अशाप्रकारे नवा प्रकार आणून आणि गर्भलिंगनिदान अधिकृत करून नवे भ्रष्टाचाराचे प्रकार केले जाण्याची शक्यता आहे.
- मनेका गांधी म्हणतात की, स्त्रीभ्रृणहत्या रोखण्यासाठी हे करण्याचा आमचा विचार आहे. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गर्भलिंगनिदान करून त्याची नोंद करायची आणि बाळंतपणानंतर त्याच लिंगाचा जिव जन्माला येतो का, हे पहायचे. पण ही नोंद खरीच असेल हे कशावरून? गर्भात मुलगी दिसली आणि पैसे देवून मुलगा असल्याचा रिपोर्ट तयार करून घेतला. त्यानंतर गर्भपात केला तर काय करणार? मुलाचा गर्भपात करणे हा गुन्हा नाही. फक्त मुलीचा गर्भपात करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मुलगी असल्यावरही मुलगा असा रिपोर्ट दिला आणि त्यानंतर गर्भपात झाला तर कोणाला काय कळणार आहे? मनेका गांधींच्या डोक्यात आलेला हा विचार जन्माला येण्यापूर्वीच त्याचा गर्भपात करायला पाहिजे.
- मनेका गांधींची कार्यपद्धती ही आक्रमक असते. त्यांनी कुत्र्यांना मारायचे नाही याबाबत प्रशासकीय पातळीवर गेल्या दहा वर्षात दहशतच निर्माण केली. त्यासाठी सर्वत्र एनजीओ स्थापन करून श्वानांचे निर्बिजीकरणाचा पर्याय सुचवला. या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यासाठी मुंबईसारख्या महानगरांमधून विविध एनजीओंना प्रचंड प्रमाणात भूखंड देण्यास महापालिकांना भाग पाडले. त्या एनजीओंना एका श्वानाच्या निर्बिजीकरणामागे हजारो रूपये मिळतात. त्यामुळे कुत्र्यांच्या गाड्या मोठ्या शहरांमधून फिरताना दिसतात. पण निर्बिजीकरण करूनही कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. कुत्र्याच्या पिलांना काही नाव, गांव, अडनांव नसते, त्यांची डिएनए केली जात नाही. आणि निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यामुळे कोणत्याही कुत्रीला गर्भधारणा झाली किंवा नाही झाली, याचा कोणी शोध घेत नाही. त्यामुळे हे फक्त कागदोपत्री केले जाते. भुखंड पदरात पाडून घेतले जातात. कुत्र्यांच्या पैदासी होत राहतात. माणसांना उपद्रव होत राहतो. निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्याशी संबंध ठेवले आणि मला गर्भधारणा झाली म्हणून कोणतीही कुत्री न्यायालयात जाणार नाही. त्यामुळे हा बोगस कारभार वर्षानुवर्षे सुरू आहे. तसाच प्रकार आता गर्भलिंगनिदान चाचणीच्या मागून करण्याचा मनेका गांधींचा डाव असेल. त्यामुळे असले अपप्रकार डोक्यात येण्यापूर्वीच थांबवले पाहिजेत.
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६
मनेकांचा प्रस्ताव नाकारा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा