- जवाहरलाल नेहरू विद्यापीठावरून तथाकथीत पुरोगाम्यांनी आणि कॉंग्रेसने जो तमाशा मांडला आहे यावरून या देशात कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांइतके दहशतवादी दुसरे कोणी नसतील असेच स्पष्ट होताना दिसते आहे.
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाची सर्व बाजूने योग्यरित्या चौकशी करत आहेत. पण या प्रकरणात राजकारण आणून कॉंग्रेस आणि डावे पक्ष हे दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहेत. यामुळे दहशतवाद हा कॉंग्रेसचा खरा चेहरा असल्याचे स्पष्ट आहे. डाव्यांनी नक्षलवाद आणि कॉंग्रेसने दहशतवाद जोपासल्याचे स्पष्ट आहे.
- दहशतवादी अफजल गुरूला झालेल्या फाशीच्या विरोधात जेएनयूतील काही विद्यार्थ्यांच्या समूहाने फाशीचा निषेध करणार्या सभेचे आयोजन केले होते. इतर काही संघटनांनी त्यास विरोध दर्शविल्याने जेएनयूमध्ये वाद निर्माण झाले. त्यावेळी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या ‘जेएनयू’मधील विद्यार्थी संघटनांचा प्रमुख असलेल्या कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. भारतविरोधी कारवाया करणार्या याच कन्हैय्याकुमारची पाठराखण करण्याकरीता कालपर्यंत पप्पू असलेले पोरकट युवराज राहुल गांधी धावून येतात. कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद आपल्याकडे आहे, आपण स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करतो आणि देशद्रोही दहशतवादी यांना समर्थन देतो? राहुल गांधींच्या या भूमिकेचा सर्व स्तरावर निषेध होणे गरजेचे आहे.
- ज्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ हा प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडला आणि ज्याचे समर्थन राहुल गांधींनी केले त्या राहुल गांधींना देशाने प्रश्न विचारला पाहिजे की लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुका जवळ आल्यावर त्यांच्याच कॉंग्रेस सरकारने मग अफझल गुरूला फाशी का दिली? सुशीलकुमार शिंदे यांनी केविलवाणा हासरा चेहरा करत अफझल गुरूला फाशी दिल्याचे गुप्त ठेवले आणि कसे कोणाला कळू न देता फाशी दिली याबाबत सरकारचे कौतुक का केले होते? म्हणजे अफझल गुरूच्या फाशीचा वापर केवळ कॉंग्रेसने निवडणुकीत या देशाची सहानुभूती मिळवण्यासाठी केला होता काय? तेव्हा अफझल गुरूला फाशी दिली आणि आता त्याला फाशी दिली म्हणून शोक करणार्या लोकांचे समर्थन करणार असाल तर राहुल गांधींचा मेंदू डोक्याऐवजी गुडघ्यात आहे असा अर्थ घ्यायचा काय?
- ज्या कोणा कन्हैय्याने भारत विरोधी घोषणा दिल्या त्याचे समर्थन करणे म्हणजे राहुल गांधींनी देशविरोधी कृत्य करण्याचा हा प्रकार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील त्या माथेफिरूंनी सुरवातीला पाकीस्तान झिंदाबाद नावाच्या घोषणा दिल्या. त्या एकवेळ मान्य केल्या जातील. पण भारत विरोधी घोषणा देण्याचा अर्थ काय होतो? अशा दहशतवादी तरूणांना अटक केली म्हणून राहुल गांधी गळा काढतात? डावे पक्ष त्यांना समर्थन देतात? काय देशद्रोही आहात काय सगळे? ज्या राहुल गांधींना आपल्या बापाचा म्हणजे देशाच्या माजी पंतप्रधानाचा खून झाला त्यांना फाशी द्यावीशी वाटत नाही, त्यांना सोडून देण्यासाठी मायलेकरे धडपडतात, त्यांनाच आता अफझल गुरूचा पुळका आलेला आहे. भारत विरोधी घोषणा देणार्यांचे समर्थन करण्यात धन्यता मानतात. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे काय? या देशातील कोणतेही पद भुषवण्याचा अधिकार आहे काय? कॉंग्रेसचे नेते लाचारपणे जर राहुल गांधींच्या या कृत्याचे समर्थन करणार असतील तर त्यांच्याइतके बुळगे आणि शामळू कोणी नाही असेच म्हणावे लागेल. एकातही कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची धमक नाही आणि राहुल गांधींसारख्या मूर्ख पप्पूला हटवण्याची ताकद नसेल तर कॉंग्रेस बंद करून टाकली पाहिजे.
- ज्या अफझल गुरूने संसदेवर हल्ला केला, देशाच्या लोकशाहीच्या मंदीरावर ज्याने हल्ला केला त्याचा पुळका घेणार्या राहुल गांधींना देशाने प्रश्न विचारला पाहिजे या संसदेवरील हल्ल्यालाही तुमचे समर्थन होते का? तेव्हा संसदेत भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यामुळे कॉंग्रेसनेच या दशतवादाला पोसून हा हल्ला घडवला होता काय? कॉंग्रेसच्या या पापकृत्याचे पुरावे अफझल गुरू समर्थकांकडे असल्यामुळे कॉंग्रेंस नेत्यांना ते वाकवत आहेत काय? अफझल गुरूच्या पाठोपाठ राहुल गांधी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आगामी काळात अजमल कसाबची जयंती पुण्यतीथी साजरी करणार का? त्याच्यावरून देशात रणकंदन माजवणार का? देशात दंगली घडवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात हे खूळ आले आहे काय? अशा प्रवृत्तींचे समर्थन डावे पक्ष करणार काय?
- किती दुष्ट आणि विषारी आहेत या कॉंग्रेसच्या प्रवृत्ती? त्यांना वेळीच ठेचले नाही तर या देशाचे असंख्य तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. कॉंग्रेस हाच दहशतवादाचा चेहरा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६
दहशतवादाचा चेहरा समोर आला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा