यांना आपल्या देशाचे कसे म्हणायचे?
- गद्दार आणि फितुरांचा बंदोबस्त करणे केव्हाही गरजेचे असते. छत्रपती शिवरायांनी नेमके तेच केले म्हणून ते उत्तम राजे ठरले. सूर्याजी पिसाळसारख्या प्रवृत्तींचा त्यांनी बंदोबस्त केला म्हणून राजे महान झाले. हे आत्ताच्या राज्यकर्त्यांना कधी कळणार? आज जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यासारखे भोंदु पुरोगामी हे देशाला घातक आहेत. त्यांच्यापेक्षा सरळ समोर ठाकलेला शत्रू परवडला. म्हणजे डेव्हीड कोलमन हेडली हा फ़सवा माणूस आहे. तो अमेरिकेसह पाकिस्तानचा एकाच वेळी हस्तक होता. आपल्या बोलवित्या धन्यालाही फ़सवत होता. म्हणून आता त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल सध्या पुरोगाम्यांनी उभा केला आहे. असे तर्क करण्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडांसारखे नेत चलाख आहेत. हा चटकन पटणारा असाच हा तर्क आहे. पण ज्यांची बुद्धी शाबुत आहे आणि डोके ठिकाणावर आहे, त्याला असे तर्क फ़सवू शकत नाहीत.
- इशरतचे पुरस्करर्ते जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर, निखिल वागळे, नबाब मलिक असे सेक्युलर या गोतावळ्यात अनेक आहेत. त्यांनीच आपल्या या देशप्रेमी इशरतसाठी हेडलीला चुकीचे ठरविण्याचा हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हेडलीचा खरेपणा सिद्ध करण्यापेक्षा, इशरतच्या खरेपणाविषयी उलटे प्रश्न केले पाहिजेत. त्यात नेहमी पुढाकार घेणार्या राष्ट्रवादी आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी तेव्हा नरेंद्र मोदी व भाजपावर बेछूट आरोप केलेले होते. अर्थात बेछूट आरोप करण्यासाठी फक्त तोंड आणि जिभ असली की भागते. त्यासाठ पुराव्याची अभ्यासाची काहीच गरज नसते. पण आता त्याच त्यांच्या जिभेने चांगले तोंड सडकले आहे. तरीही पडलो तर नाक वर आणि नाक कापलं तरी अजून भोकं आहेतच अशी आव्हाडांची परिस्थिती आहे. त्यामुळे केविलवाणी धडपड त्यांची सुरू आहे.
- आता आव्हाड, कुमार केतकर, निखिल वागळे ही भोंदु माणसे अशा चर्चेसाठी पुढे येणार नाहीत. कारण त्यांच्या चॅनेलचा मालकही आता तुरूंगात गेल्यामुळे यांची पुरती बेअब्रू झाली आहे. कोणाच्या शेजेवर हे इतके दिवस पैसे कमवण्यासाठी झोपत होते हे समोर आले आहे.
- हेडलीने साक्ष दिल्यावर आता या कंपूला अभ्यासाची गरज भासू लागली आहे. ज्यांना खोट्यावर विश्वास ठेवायची दुर्बुद्धी होते, त्यांना हल्ली सेक्युलर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुरोगाम्यांना जे काही खोटे वाटते, त्यावर निखळ सत्य म्हणून विश्वास ठेवायची वेळ आता आली आहे. या आव्हाड, केतकर, वागळे, हेमंत देसाई, जतीन देसाई, नबाब मलिक अशा कंपुमुळे या देशात पुन्हा एकदा विभाजन होणार काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैशासाठी वाटेल ते करण्याची यांची प्रवृत्ती आणि गोबेल्स नितीचा वापर करून पुरोगामी नावाच्या गोंडस शब्दाखाली स्वत:चा लाळघोटेपणा झाकण्याचे काम हे लोक करत आहेत. पण हे देशाशी गद्दारी करत आहेत. लष्करे तोयबाच्या इशरत जहाची भलावण, पाठराखण करत आहेत. त्यांच्यावर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत.
- असे अनेकवेळा या देशद्रोही कंपूने केलेले आहे. बडोदा बेस्ट बेकरीच्या विषयात जाहिरा शेख हिने पहिल्या कोर्टात आपली जबानी फ़िरवली होती. तेव्हा तिच्यावर दबाव आणला गेला, असा गदारोळ करून टाहो फ़ोडला गेला. पण पुढल्याच खटल्यात तीच जाहिरा शेख साक्ष फ़िरवू लागली तेव्हा तिला खोटारडी ठरवायला हेच लोक पुढे आले होते. त्याच बडोदा जळीतकांडात जिचे तमाम नातलग जळून भस्मसात झाले, त्या जाहिराला खोटी पाडून वर्षभर तुरूंगात पाठवण्याला हे लोक पुरोगामीत्व म्हणतात. जाहिरा यांच्या तालावर नाचत होती तोवर खरी होती आणि विरुद्ध बोलू लागली मग खोटी पाडली गेली. ही या गद्दार भोंदू पुरोगामी कंपूची लायकी आहे.
- आज यांची अवस्था अशी आहे की या गद्दार, देशद्रोही पुरोगामी चेहरा दाखवू पाहणार्या टोळीच्या विरोधात जो बोलेल किंवा त्यांचे पितळ उघडे पाडेल तो खोटा, हाच त्यांचा निकष आहे. ज्यांना खोटेच सत्य म्हणून लोकांच्या गळी मारायचे असते, त्यांना सत्य पटवण्याची गरज नसते. पण आज अझर मसूद, अफझल गुरू, कसाब, हेडली यांच्यापेक्षा घातक आणि देशद्रोही कोण आहेत असा कोणी प्रश्न केला तर या कंपूची नावे द्यावीच लागतील. कारण यांना भारत या देशाशी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे खिसे भरण्यासाठी कुठल्याही मार्गाने पैसा मिळाला की झाला. त्यामुळे कोणाच्याही नावाचा टिळा लावायला सोकावलेल्या या वारांगनाच आहेत. म्हणजे पाकिस्तानची भाषा हे लोक बोलतात याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्या देशात आपण या पाकीस्तानी लोकांना थारा देतो आहोत हे किती धोक्याचे आहे? यापेक्षा अणूबॉंब वेगळा नाही. मुंबई हल्ल्यानंतर आजपर्यंत कित्येक पुरावे आणि साक्षी पाकिस्तानला भारताने पाठवल्या आहेत. त्याचा काही उपयोग होऊ शकला आहे काय? कितीही पुरावे द्या, ते भक्कम नाहीत किंवा विश्वासार्ह नाहीत, हीच टकळी पाकिस्तानकडून वाजवली जाते आहे ना? तोच प्रकार ही आव्हाड, वागळे, केतकर ही देशद्रोही माणसे करत आहेत. त्यांना अटक का केली जावू नये असा सामान्यांना आता प्रश्न पडला आहे. त्यामुळे हेडली परवडला पण हा कंपू नको अशी परिस्थिती सध्या आहे. देशाशी गद्दारी करणार्या लोकांची पाठराखण करणार्या या लोकांना आपले कसे म्हणायचे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा