शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

चमकू प्रवृत्तीचे लोक आणि प्रसारमाध्यमे जबाबदार

  •   मुंबई बॉंम्बस्फोटातील गुन्हेगार ( हो त्याला फाशी झाली म्हणजे तो गुन्हेगारच, आता आरोपी असा उल्लेख करण्याचे काहीच कारण नाही. अनेकांनी या बातम्यांमध्ये त्याचा उल्लेख आरोपी केल्यामुळे सखेद आश्‍चर्य वाटले म्हणून हा कंस टाकला.) याकूब मेमनच्या फाशी प्रकरणात त्याचे फारच कौतुक केले गेले. विशेषत: इलेक्ट्रानिक्स मिडीयाने त्याचे फार कौतुक केले. एबीपी माझा या मराठी वाहिनीबाबत जरा आदर वाटत होता, पण गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे प्रक्षेपण त्यांनी दिवसभर दाखवून काय साध्य केले?     याकूबचे शव माहीमला येणार व तिथून ते अंत्यविधीसाठी ६ वा. मरिन लाईन येथील बडा कबरस्तानमध्ये नेले जाणार असे जाहीर झाले होते. नागपुरात फाशी दिलेल्या शवाची रवानगी मुंबईल होणार हे सांगतानाही एबीपी माझा अगदी आमचा प्रतिनिधी त्याच विमानाने येत आहे हे अभिमानाने सांगत होता याची खरं तर लाज वाटली. किती हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण? याचे परिणाम काय होतील याचा विचार या माध्यमांनी केला आहे काय? याकूबवर हळहळणारे जर यातून काही पडसाद उमटले तर त्याची जबाबदारी घेणार आहेत काय?
  • याकूबच्या अंत्ययात्रेला बंदी होती. गृहखात्याने, न्यायव्यवस्थेने तसे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही ती अंत्ययात्रा निघाली. हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. याचा नेमका अर्थ काय काढायचा? या देशात कायदा न मानणारे लोक आहेत? आपल्या न्यायव्यवस्थेला काहीच अर्थ नाही? का मूठभर विद्वानांनी याकूबचे समर्थन केल्यामुळे हे उदात्तीकरण केले गेले? असे असेल तर कोळसे पाटील ते गिरीश कुबेर अशा विद्वानांचे जाहीर सत्कार केले पाहिजेत. म्हणजे यापुढे गुन्हेगार, देशद्रोह्यांचे समर्थन करणे हे पवित्र कार्य आहे असा संदेश तरी जाईल.
  •  याकूब मेमनच्या घराच्या व माहीम चर्चपर्यंतच्या परिसरात हजारो लोक जमले होते. फेसबुक, व्हॉटसअपवरून ते फोटोही प्रसिद्ध झाले. हे लोक फक्त माहीमचे नव्हते. खूप लोक बाहेरुन आले होते. ते याकूब मेमन अमर रहेच्या घोषणा देत होते. स्त्रिया अशा प्रसंगात कमी असतात. पण इथे स्त्रियाही लक्षणीय होत्या. त्याही घोषणा देत होत्या. या कार्यकर्त्यांना हा माहौल नवीन होता. त्यांना वातावरणात खूप ताण व काहीशी भीतीही जाणवत होती. याकूब मेमनच्या घराजवळ राहणार्‍या एका व्यक्तिच्या म्हणण्यानुसार याकूब मेमन गुन्हेगार होता, हे कोणाच्याही गावी नव्हते. मुस्लिम म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, इतर समाजाच्या तुलनेत आम्हाला असेच लक्ष्य करण्यात येते अशी रागाची भावना लोकांच्या मनात ठसठसते आहे. हे ठसठसणे काय रीतीने बाहेर येईल, याबाबत त्या व्यक्तिला भय वाटत होते.
  •    काल संध्याकाळी मुंबईतल्या त्या भागात खूप विरळ लोक रस्त्यावर होते. पोलीस बंदोबस्त मात्र जोरात होता. पण या वातावरणावरून एक प्रकारचा असंतोष, खदखद सर्वत्र असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या खदखदीला टिव्हीवर बोलायला मिळते म्हणून वाटेल ते बरळणारे चमकू प्रवृत्तीचे लोक आणि प्रसारमाध्यमे जबाबदार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: