- प्रसिद्ध उद्योगपती आणि यशस्वी व्यावसायीक हेन्री फोर्ड यांच्या ऑफीसमध्ये दर्शनी भागातच एक फोटो लावलेला होता. दररोज कार्यालयात आल्यावर नित्यनियमाने त्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय ते आपल्या कामाला कधीही सुरूवात करायचे नाहीत. हा फोटो कोणत्याही संताचा, देवाधिकाचा नव्हता. अत्यंत सामान्य अशा व्यक्तिचा तो फोटो होता. पण ऑफीसमधील सर्व कर्मचार्यांना या हेन्री फोर्ड यांच्या कृतीचे आश्चर्य वाटायचे. आपला बॉस, मालक इतका यशस्वी आहे, त्याने या व्यक्तीच्या फोटोला नियमीतपणे नमस्कार करावा. म्हणजे ही व्यक्ती आपल्या मालकापेक्षाही श्रेष्ठ असणार असे सर्वांना वाटत होते. एकदा फोर्ड यांंच्या पीएनी आयाबाबत फोर्ड याना विचारले. तेव्हा अत्यंत नम्रपणे आणि हासत हासत फोर्डनी सांगितले की, या व्यक्तीने आणि मी एकाचवेळी व्यवसायाला सुरूवात केली. तो सतत अपयशी होत गेला. तो का अपयशी झाला हे पाहून मी माझी व्यूहरचना आखली त्यामुळे यशस्वी झालो. त्याने केलेल्या चूका मला मार्गदर्शक ठरल्या, तशी परिस्थितीत आपल्यावर येवू नये म्हणून सतत त्याचे स्मरण मी करतो. कारण तो इतका अपयशी आहे की आज भिकारी म्हणून जीवन जगतो आहे.
- हे उदाहरण राजकारणात यशस्वी होवू पाहणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. मोदींची कार्यशैली ही अशीच राहणार आहे, कारण ज्या चूका काँग्रेसने केल्या त्या ते करणार नाहीत. काँग्रेस नरेंद्र मोदींना अशा नमस्कारापुरती आवश्यक वाटते. काँग्रेसच्या चुका प्रत्येकाने टाळल्या तर अनेक छोटे पक्षही तारून निघतील. कारण बहुतेक सगळ्या अपयशी पक्षांकडे चुकीच्या व्यक्तीच्या हातात नेतृत्त्व असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे चांगले नेतृत्त्व दिले तर काँग्रेसही जीवंत राहू शकते. म्हणूनच काँग्रेसच्या कामावरून एक दृष्टीक्षेप टाकणे गरजेचे आहे.
- काँग्रेसशी प्रामाणिक मतदार काँग्रेसजवळ या प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसच्या पाठीशी होता. म्हणजे राम ठाकूर यांच्यासारख्या गल्लीबोळातील अनेक चिल्लर नेत्यांनी काँग्रेसला मतदान करू नका, राष्ट्रवादीला मतदान करू नका असे सांगून आघाडी दुबळी करण्याचा प्रयत्न केला. तरीही ओरीजनल काँग्रेसच्या कार्यकत्यार्र्नी आपले इमान राखले होते. त्यामुळे पक्षातील असे गद्दार हाकलले, घाण साफ केली तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या सज्जन माणसाला कलंक लागणार नाही. अर्थात आगामी विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा मनमोहनसिंग होणार आहे हे स्पष्ट झालेले आहे. कारण गद्दार, भ्रष्टाचार्यांच्या कळपात राहिल्यावर असाच शेवट होणार हे निश्चित असते. त्यामुळे भाजप काय किंवा भाजप समर्थक कोणत्याही पक्षाने चूकूनही काँग्रेसच्या चुका केल्या नाहीत तर काँग्रेसचा हा सव्वाशे वर्षांचा वटवृत्त बोनसॉय म्हणून आपल्या दिवाणखान्यात ठेवता येईल.
- काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका नाही. ते नमस्कारासाठी आणि स्मरणासाठी शिल्लक राहिले पाहिजे, म्हणजे हेन्री फोर्डप्रमाणे सगळ्या पक्षांना कसे असू नये हे दाखवण्यासाठी काँग्रेस थोड्या प्रमाणात शिल्लक ठेवावी लागेल. ती फक्त ओरीजनल काँग्रेसवाले ठेवतील. राम ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्यासारखे गल्लीबोळातले चिल्लर नेते ती लिलया संपवतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 40 हजारांनी मागे हटलेली काँग्रेस कोणता चेहरा समोर आणून विधानसभेला हे लिड कमी करणार आहे?
- लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव ही काही अनपेक्षित घटना नाही. मतमोजणीपूर्वीच त्याची कल्पना काँग्रेससह सर्वांनाच आली होती. काँग्रेसच्या पराभवाचा पाया नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होण्यापूर्वीच रचला गेला होता. कारण कुठेतरी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली होती. देशहितासाठी काँग्रेस आपल्या देशात असणे घातक होते. सत्तेत असूनही काँग्रेसचे नेते, खासदार , आमदार मूर्खासारखे वागत होते. खारघरचा टोल नाका रद्द करा यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनाच आंदोलनाचा इशारा देण्याचा भाबडेपणा प्रशांत ठाकूर करतात. हा भाबडेपणा आहे की मूर्खपणा आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण सत्ता तुमची असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून हा प्रश्न का सोडवू शकत नाही? वाढदिवसाला मुख्यमंत्र्यांना बोलावता येते. जनतेच्या प्रश्नासाठी बोलता येत नाही? तेव्हा आंदोलन करीन असा इशारा देता? अर्थात हा इशारा फक्त त्यांच्या वर्तमानपत्रातून दिला आहे, प्रत्यक्षात असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेही नसेल. कारण मुख्यमंत्री तोंडात शेण घालतील. ही प्रशांत ठाकूर यांची पराभूत मानसिकता आहे. आपण पराभूत होणार आहोत, आपण सत्तेत येणार नाही हे समजल्यामुळे आत्ताच विरोधकाची भूमिका त्यांनी सुरू केलेली आहे. पराभूत मानसिकतेचा माणूस ज्या मुख्यमंत्र्यांच्या टिममध्ये असेल त्यांचा पक्ष कदापि यशस्वी होणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते करतात तशा चुका विरोधकांनी टाळल्या तर छोटे पक्षही मोठे होतील. प्रशांत ठाकूर पनवेलकरांची कशी फसवणूक करत आहेत हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांचा पराभव किती फरकाने करायचा एवढेच पनवेलकर विचारात आहेत. मतदार बाहेर पडणार आहे तो कोणा एकाला विजयी करण्यासाठी नाही, तर प्रशांत ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी बाहेर पडणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण आता जनतेला कुचकामी नेते नको आहेत. फसवणूक करणार्यांचा कंटाळा आलेला आहे.
- ‘काँग्रेसमुक्त भारत’ही निवडणुकीसाठीची लोकप्रिय घोषणा भाजपने दिली होती. त्या घोषणेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. निवडणूक निकालाने मात्र खरेच काँग्रेस संपते की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. काँग्रेसचा एवढा दारुण पराभव होणे आणि आता ती संपणार असे वाटणे याचे एक प्रबळ कारण आता हा देश टोकाचा विचार करू लागला आहे. 2004 ते 2009 या पहिल्या कार्यकाळातील कामाने खुश होऊन मतदारांनी 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त समर्थन देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पुन्हा सत्तेत आणल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच काँग्रेसने इतक्या वर्षांत काहीच चांगले केले नाही, उलट देशाला लुटून त्याचा सत्यानाश केला. हा विचार लोकांच्या मनात रूजला. राहुल गांधींपुढे खरे आव्हान होते ते काँग्रेसची जनमानसात मोदींच्या प्रचाराने तयार झालेली प्रतिमा बदलण्याचे. ही प्रतिमा बदलण्यासाठी आक्रमक होऊन खोटे आरोप करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न राहुल गांधींच्या अंगलट आला. राहुल गांधींचे हेच चुकीचे अनुकरण गल्लीबोळातील भटक्या नेत्यांनीही सुरू केल्यावर काँग्रेसचे काय होणार?
- उगवत्या सूर्याला नमस्कार करून सत्तेत जाण्यासाठी आतूर झालेले काँग्रेसचे राम ठाकूर यांच्यासारखे चिल्लर नेते खुळखूळ वाजत आहेत. हा खुळखुळा काँग्रेसला खिळखिळा करत आहे. आता सन अँड सैन्य आधी दुसरीकडे पाठवून मग स्वत: कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही पक्ष बदलत आहोत हे म्हणण्यासाठी मोकळे झाले आहेत. राम ठाकूर सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. एकीकडे वाढदिवसाला मुख्यमंत्र्यांना बोलवायचे आणि दुसरीकडे कमळातला मध शोधायला जायचे. काँग्रेस कार्यकत्यार्र्ना रक्तदान करून स्वत:चे वजन किती आहे ते पहायचे आणि स्वत: कमळातला मध खायला जायचे. तो गुंजारव पनवेलमध्ये घुमायला लागला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
- ही गद्दारी म्हणजेच काँग्रेस आहे अशी लोकांची काँग्रेसविषयक निराशाजनक मानसिकता तयार झाल्याने ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पना हातोहात खपली. लोकच नाही तर विश्लेषक, विचारवंत आणि पत्रपंडितदेखील या परिणामी टोकाचा विचार ठामपणे मांडायला लागले. काँग्रेसने केलेल्या निराशेच्या टोकावरून आशेच्या टोकावर जनतेला नेण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेसने काहीच केले नाही, आता नरेंद्र मोदी सारे काही करतील. काँग्रेसच्या दारुण पराभवाचे आणि नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाला ही मानसिकता कारणीभूत ठरली आहे.
- काँग्रेस हा 130 वर्षाचा जुना पक्ष आहे, देशाच्या कानाकोपर्यात त्याचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा पक्ष संपणार नाही, असा टोकाचा भाबडा युक्तिवाद काँग्रेस समर्थकांकडून ऐकायला मिळतो आहे. उलट जुना असल्याने नव्या जगाशी जुळवून घेणे काँग्रेसला जमलेले नाही हे त्याच्या पराभवाचे खरे कारण आहे. रायगड जिल्ह्यातून काँग्रेस नामशेष झाली आहे. उमेदवार मिळत नाहीत. जे काही अंतुले गटांचे निष्ठावंत आहेत, त्यांचीच मते या निवडणुकीत दिसून आली. बाकी जी काही शिल्लक आहे, ती संपविण्याचे काम पितापुत्र करतील. पण दिखावूपणासाठी रक्तदान शिबिरे घेतील आणि प्रत्यक्षात रक्तपिपासू अशी प्रवृत्ती असलेले हे डास आहेत. या डासांपासून इतरांनी काय बोध घ्यायचा ते लक्षात घ्यावे.
रविवार, १ जून, २०१४
ुरक्तपिपासूंचा डास बोध
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा