बुधवार, १८ जून, २०१४

विवेकसिंधू-3 निस्पृह आणि चातुर्य


   कोणतेही काम निस्पृहपणे करणे हे आमदार विवेक पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. निस्पृहपणे केलेल्या कामाची श्रेष्टता ही उच्चतम अशी असते. भगवंतांनी गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग किंवा फळाची अपेक्षा न करता काम करण्याची जी प्रवृत्ती असते त्याचा चिरंतन स्थायीभाव आमदार विवेक पाटील यांच्या ठायी दिसून येतो.
  • समर्थ रामदासांनी सांगितलेली निस्पृहाची लक्षणे तंतोतंत आमदार विवेक पाटील यांना लागू पडतात.
  • “ शुद्धमार्ग सोडू नये। दुर्जनांसी तंडो नये।   अ अ
  • समंध पडो देऊ नये। चांडाळासी॥”
  •    अनेक लोकोपयोगी कामे करूनही त्याची वाच्यता न करता गप्प बसण्याचा निस्पृहपणा आमदार विवेक पाटील यांनी जपला. आपला सरळपणा शुद्धमार्ग त्यांनी कधी बदलला नाही. विरोधक अकारण टिकेची झोड उठवत असताना दुर्जनांसी तंडो नये या वृत्तीने धीरोदात्तपणे ते स्थिर राहिले. हे सामर्थ्य शांत अशा, विवेक बुद्धीच्या नेत्याचे असते.
  • कोणतेेही काम करताना त्यामध्ये येणारे सगळे अडथळे दूर करून मग ते काम पूर्ण करण्याचे कौशल्य आमदार विवेक पाटील यांच्याकडे आहे. संघर्ष करून, संघटीत करणार्‍या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आमदार विवेक पाटील यांना अपार श्रद्धा. बाबासाहेबांचे विचार सर्वदूर पोहोचले पाहिजेत. ते सर्वांना समजले पाहिजेत. बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचे भव्य असे स्मारक आपल्या पनवेलमध्ये असले पाहिजे. ही अनेकवर्ष इच्छा त्यांच्या मनात होती. त्यासाठी पनवेल नगरपालिकेत शेकापची सत्ता असताना, जे एम म्हात्रे नगराध्यक्ष असताना त्यांनी एक बैठक घेतली. त्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमली. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील या बैठकीला होते. त्याप्रमाणे आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली, जे एम म्हात्रे यांनी पनवेलमध्ये अशा स्मारकासाठी भूखंड आरक्षित करण्याचे मान्य केले. पनवेल नगरपालिकेने स्मारकाचा भूखंड आरक्षित केला. जे एम म्हात्रे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. परंतु अडचणी काही संपत नव्हत्या. या आरक्षित भूखंडावर विरोधकांनी झोपडपट्टी वसवली होती. आमदार विवेक पाटील यांचे हे स्वप्न पूर्ण होवू नये आणि आंबेडकर भवन होवू नये यासाठी या जागेवर झोपडपट्टी उभारण्याचे काम काही समाजकंटक आणि विरोधकांनी केले. पण अशा अडचणींनी दबतील तर ते विवेक पाटील कसले? त्यांनी त्या झोपडपट्टीवाल्यांना भेटून तुम्हाला पक्की घरे देतो सांगितले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 35 लाख रूपये खर्च करून या झोपडपट्टीधारकांन पक्की घरे दिली, त्यांचे पुनर्वसन केले आणि आंबेडकर भवनाचा मार्ग मोकळा केला. ही आमदार विवेक पाटील यांच्या कामाची पद्धत आहे. कितीही अडथळे आले तरी डगमगायचे नाही. त्यावर मात करून पुढे कसे जायचे याचे चांगले कसब आमदार विवेक पाटील यांच्याकडे आहे. ही शक्ती त्यांच्यामध्ये असण्याचे कारण त्यांचे कार्य निस्पृहपणे केलेले असते. अन्य कोणतीही व्यक्ती झोपडपट्टी आहे, ती कशी हलवणार म्हणून हातपाय गाळून बसली असती. सरकार काही मदत करते का म्हणून वाट बघत बसली असती. तसे जर केले असते तर आज आंबेडकर भवनाची वास्तू उभीच राहिली नसती. या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी नगरपालिकेकडे तरतूद नाही. हरकत नाही. मी करतो त्याची व्यवस्था, पण आंबेडकर भवन हे झालेच पाहिजे. या हेतुने आमदार विवेक पाटील यांनी आपल्या ट्रस्टमधून पैसे काढून त्यातून झोपडपट्टी पुनर्वसन केले. म्हणजे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे नेमके वर्तन त्यांच्या हातून घडले. आंबेडकर भवन झाले पाहिजे हा हेतु त्यांचा अतिशय शुद्ध होता. त्यामुळे त्या हेतुला त्यांनी जवळ केले. त्या हेतुला बाधा आणणार्‍या, हेतुसाध्य होवू नये म्हणून अडथळे आणणार्‍या विरोधकांशी वाद घालत न बसता त्यातून मार्ग काढला. झोपडपट्टीधारकांना विश्‍वासात घेवून त्यांचे पुनर्वसन केले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक पनवेलमध्ये उभे राहिले. हे स्मारक म्हणजे आमदार विवेक पाटील यांच्या संघर्षमय कर्तृत्त्वाची साक्ष आहे. पनवेलच्या इतिहासात कोरलेले सुवर्णपान आहे.
  •      सत्ताधारी काँग्रेसच्या हातात सातत्याने माध्यमसत्ता असल्यामुळे खोटा प्रचार करणे, खोटा विकास दाखवणे, विरोधकांची चांगली बाजू समोर येवू न देणे, अफवा पसरवणे या गोष्टींचा काँग्रेसने सातत्याने वापर केला. विरोधकांच्या चांगल्या कामांनाही, विधायक कामांनाही प्रसिद्धी द्यायची नाही असे धोरण आखले. माध्यमशक्तीचे प्राबल्य वाढले तसे प्रत्येकाचे ते आकर्षण राहिले. माध्यमांमधून दिसणारे तेच सत्य वाटू लागले. त्यामुळे आपली बाजू मांडण्यासाठी, सत्याची बाजू समोर येण्यासाठी चार वर्षांपूर्वी आमदार विवेक पाटील यांच्या 55 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 19 जून 2010 या दिवशी कर्नाळा या वर्तमानपत्राची स्थापना आमदार विवेक पाटील यांनी केली. आज कर्नाळाने माध्यमजगतात, वाचकांमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. दुसरी बाजू प्रखरपणे समोर येवू लागल्यामुळे कर्नाळाची लोकप्रियता, वाचकप्रियता वाढू लागली,हे आमदार विवेक पाटील यांचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणजे योग्यवेळी योग्य निर्णय घेवून तशी व्यूहरचना करण्याचे काम हे श्रेष्ठ, धुरंधर असा सेनापती करतो. त्याप्रमाणे आमदार विवेक पाटील यांचे कार्य सुरू आहे.
  • समर्थांनी सांगितल्याप्रमाणे,“ नित्यनेम सांडू नये। अभ्यास बुडो देवू नये। परतंत्र होवू नये। काही केल्या॥” असे आमदार विवेक पाटील यांचे आचरण आहे. रात्री कितीही उशीर झाला तरी पहाटे ठराविक वेळीच उठणार. ध्यानधारणा, योगा, व्यायाम करणार. प्रात:काळीच ताजेतवाने होवून आनंदी, प्रसन्न चेहर्‍याने कार्यकर्ते, अभ्यागत यांच्या भेटी घेण्यासाठी सामोरे जाणार. हा नित्यनियम वर्षानुवर्षे कधी बदलला नाही. प्रतिदिन काही तरी शिकण्याची, सतत अभ्यास करण्याची जिज्ञासा आमदार विवेक पाटील यांनी जोपासली आहे. एखादा प्रश्‍न विधानसभेत कसा मांडायचा, त्यावर हमखास अपेक्षित असेच उत्तर कसे मिळवायचे याचा अभ्यास ते सतत करत असतात. विधानसभेतील लायब्ररीचा, संदर्भांचा वापर करण्याचे त्यांचे कौशल्या फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेली वीस वर्ष आमदार असलेल्या विवेक पाटील यांची कार्यशैली प्रत्येक नवीन आमदार आत्मसात करताना दिसतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तर नेहमी सांगतात की आम्ही विवेक पाटील यांना गुरू मानतो. विधानसभेत प्रश्‍न कसा मांडायचा याचे शिक्षण त्यांच्याकडून घेतो. त्यांची अभ्यासाची पद्धत समजावून घेतो. हे आमदार विवेक पाटील यांचे मोठेपण आहे.
  • लोकशाही ही खर्‍या अर्थाने आमदार विवेक पाटील यांना समजलेली आहे. विरोध हा निवडणुकीपुरता असतो. एकदा निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांचे नेत आहोत. ज्यांनी आपल्याला मते दिलेली नाहीत त्यांचेही आपण नेते आहोत. त्यांचीही कामे करायची आहेत हे मोठेपण आमदार विवेक पाटील यांच्यात आहे. हे न्यायबुद्धीचे, निस्पृहपणाचे लक्षण आहे. हे फार कमी लोकांमध्ये असते. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी जाहीर कार्यक्रमात आमदार विवेक पाटील यांचेबद्दल गौरवोद्गार काढले होते. विधानसभेत अभ्यासपूर्ण बोलणारे जे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार आहेत, त्यापैकी एक आमदार विवेक पाटील आहेत. हे विधान फार महत्त्वाचे आहे.
  • “ लोक आपणास वोळावे। किंवा अवघेच कोसळावे।
  • आपणास समाधान फावे। ऐसे करावे॥”
  • समर्थांनी सांगितलेले हे चातुर्यलक्षण आमदार विवेक पाटील यांच्यात आहे. आपल्या बाजूला लोकांनी यावे असे त्यांना नेहमीच वाटते. पण आपला विचार, कार्यपद्धती समजावून घेवून यावे असे आमदार विवेक पाटील यांचे धोरण असते. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा या ब्रिदवाक्याला स्विकारून येणार्‍यांना आपल्याकडे वळवण्याचे काम आमदार विवेक पाटील करतात. त्यातच आपले समाधान आहे असे मानतात. यामध्ये निस्पृह असे, निरपेक्ष असे कर्तृत्त्व दिसून येते. आपला प्रत्येक कार्यकर्ता सबळ असला पाहिजे. त्यासाठी प्रचंड अविश्रांत अशी मेहनत घेण्याची त्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. मेहनत केल्यावर यश हे मिळणारच यावर आमदार विवेक पाटील यांचा विश्‍वास आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम आमदार विवेक पाटील करतात.
  • “ समजले आणि वर्तले। ते चि भाग्यपुरष झाले।” असे जे समर्थांनी म्हटले आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार विवेक पाटील आहेत. कोणतेेही तंत्र, यंत्र, काम समजून घ्यायचे. ते समजल्यावरच त्याचा वापर करायचा. ज्ञान प्राप्त केल्यावर ते समजल्यावर त्याचा योग्य वापर करता येतो. त्याप्रमाणे वर्तन, आचरण घडते. मग भाग्य तुमच्या पायाशी लोळण घेते. समाजकारणाचे असो, विकासाचे असो वा लोकशाहीचे पूर्ण तंत्र, ज्ञान अभ्यासलेले असे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यासाठी सतत झटणारे असे हे चिरतरूण, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. कारण समजून केलेल्या वर्तनामुळे भाग्याने त्यांच्यावर वृष्टी केलेली आहे. त्याचे ते तेज आहे. त्या तेजाच्या वाढदिवसानिमित्त त्या तेजाला दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या सानिध्यात दीर्घकाळ राहता यावे या स्वार्थी पण शुद्ध हेतुने हा लेखनप्रपंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: