रविवार, १ जून, २०१४

अनुकरण कर्तृत्वाचे असावे, प्रचारंतत्राचे नाही

  • भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाने अनेक समिकरणे बदलली आहेत. या विजयाकडे अनेक जण अनेक अर्थांनी पहात आहेत. नरेंद्र मोदींच्या कर्तृत्त्वापेक्षा त्यांच्या करीष्म्यालाच अधिक महत्त्व दिले जात आहे. हा एका परिने त्यांच्यावर केला जाणारा अन्याय आहे. ते कसेही वागले तरी त्याचा वेगळा अर्थ काढण्याची अहमहमिका प्रसारमाध्यमांमधून आणि त्यांच्या विरोधी पक्षांमध्ये चालली आहे.
  • मोदींच्या विजयाकडे विशिष्ट चष्म्यातून पाहणार्‍यांची गर्दी सध्या उसळली आहे. हा चष्मा डाव्या विचारसरणीचा आहे, तसाच उजव्या विचारसरणीचाही आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही विचारधारा आपापल्या परंपरेला कुरवाळीत मोदींच्या विजयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही विचारसरणींना पुरोगामी म्हणणे धाडसाचे ठरेल. खरा लोकशाहीचा अर्थ या दोन्ही विचारसरणींना समजाला आहे की नाही याचे संशोधन करायला पाहिजे. तितकेच त्यावर प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यामुळे एका अर्थाने दोघेही प्रतिगामीच आहेत, असेच म्हणावे लागेल.
  •    लोकसभेसाठी झालेल्या झंझावाती प्रचारातून नरेंद्र मोदी हा नवा ब्रँड राष्ट्रीय स्तरावर स्थापन झाला. लोकसभेवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणारा विरोधी पक्षातील हा एकमेव ब्रँड. आज प्रत्येकाला आपण नरेंद्र मोदींप्रमाणे काहीतरी फॉर्म्युला वापरावा असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या आत्मचिंतनाच्या पहिल्याच बैठकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करावे असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिवसेनेनेही लगेच त्याचीच री ओढत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करावे अशी मागणी केली. त्यावर लगेच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया व्यक्त करून मी मुख्यमंत्री व्हावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे असे बोलून दाखवले. हा सगळा मोदी अनुकरणाचा लागलेला ध्यास आहे. पण या दोघांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले काय किंवा मुख्यमंत्री होते काय, ते निवडून येवून या पदांवर पोहोचले आहेत. ठाकरे घराण्यात कोणीही अजूनपर्यंत निवडणूक लढवलेली नाही. काँग्रेसनेही उशीरा का होईना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधींचे नाव जाहीर केले असले तरी राहुल गांधींनी निवडणूक लढवली आहे. ते निवडूनही आलेले आहेत. काही नसताना अरविंद केजरीवाल यांनीही स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणवून घेतले. त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे जनाधार फार महत्त्वाचा आहे, हे दोन्ही सेनेच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मोदींच करीष्मा चालला तसा असे नाव घोषित करून ठाकरे बंधूंना जमेल असे समजण्याचे कारण नाही. ते तेवढे सोपेही नाही. यामुळे फक्त प्रसारमाध्यमांना चर्चेला एक विषय मिळेल. त्यावर चर्चा होतील पण साध्य काही होणार नाही. नरेंद्र मोदींचे नाव घोषित करण्यामागे नियोजन होते. ते नियोजन काही निवडणुकीपूर्वी अचानक आलेले नव्हते. तर लोकसभेच्या निवडणुका 2014 ला होतील हे गृहीत धरून त्याच्या तीन चार वर्ष अगोदर किंबहुना 2009 निवडणुकांमध्ये भाजपला अपयश आल्यानंतर केले गेलेले होते.
  • मोदी विजयामुळे पोटभरू डाव्या बुद्धिमंतांचे पित्त खवळणे साहजिक आहे. त्यातही काँग्रेसच्या वळचणीला राहणार्‍यांना, उद्या पोट कसे भरावे याची चिंता पडल्यामुळे मोदींच्या विरोधात ते रान उठवत राहणारच. परंतु प्रामाणिक डाव्या विचारवंतांनाही या ब्रँडचे वैशिष्ट्य लक्षात आलेले नाही वा लक्षात येऊनही त्याचे प्रामाणिक विश्लेषण करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी कोणतीही कृती केली तर त्याकडे तिरकस नजरेने पाहणे, नावे ठेवणे, कुत्सीतपणाने पाहणे असले प्रकार घडताना दिसत आहेत. अजून पाच दिवसही झालेले नाहीत. तरीही ते काही चांगली पावले टाकत आहेत. त्याकडे सकारात्मकपणे पाहणे आणि त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यावर फालतू टिकाटिपण्णी करण्याचे काम डाव्या विचारांकडून होत आहे. यामुळे डावा विचार अधिक संपत जाणार आहे हे कधी यांच्या लक्षात येणार? काँग्रेस टिका करते म्हणून आणि काँग्रेसच्या वाहिन्यांवर फुकट बोलायला संधी मिळते म्हणून डाव्या, समाजवादी विचारांच्या नेत्यांनी त्यावर टिका करणे हे हास्यास्पद होते आहे. तर दुसरीकडे स्वत:ला उजव्या म्हणवून घेणार्‍या  उजव्या बुद्धिजीवींमध्ये विजयाचा उन्माद दिसत आहे. परंपराग्रस्त विचारधारेवर भारतीयांचे शिक्कामोर्तब झाल्याचा ग्रह त्यांनी करून घेतला आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही विचारधारा आपल्या परंपरेला कुरवाळीत मोदींच्या विजयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असल्याने, एका अर्थाने दोघेही प्रतिगामीच आहेत.
  •    मोदींनीही देशाच्या पूर्वपरंपरेचाच वापर करीत पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. परंतु हे करताना त्यांनी परंपरेचा धागा वर्तमान जीवनपद्धतीशी सफाईने जुळवला. यामध्येच त्यांच्या नेतृत्वाचे यश आहे. सध्याच्या भारतीय नागरिकाची नस त्यांनी उत्तम पकडली. या भारतीय नागरिकाच्या मनातील सुप्त व उघड प्रेरणांना थेट आवाहन करील असे प्रचारतंत्र आखले. त्याला तंत्रज्ञानाची जोड देत एकाच वेळी धर्म व तंत्रकुशलता यांचा धागा गुंफला. तंत्रज्ञान व धर्मनिष्ठा या दोन टोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रप्रेमाचा वापर केला. भारतातील कोट्यवधी नागरिकांमध्ये आशा जागवली, उत्साह निर्माण केला व भाजपला मत देण्यास भाग पाडले. हे प्रचाराचे तंत्र असले तरीही ते निवडणुकीसाठी आवश्यक होते. ते धाडस त्यांनी दाखवले हे विशेष. असे धाडस दाखवण्याची अन्य किती पक्षांची हिंमत आहे? सोयीचे राजकारण करणार्‍या पक्षांना हे कदापि शक्य होणार नाही. मी हिंदू राष्ट्रवादी आहे,असे स्पष्टपणे सांगत मोदींनी प्रचाराला सुरुवात केली. हिंदू राष्ट्रवादी काय करू शकतो, याचा आविष्कार गुजरात मॉडेलमधून लोकांसमोर उभा केला. त्यांचा प्रचार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार होता. अंगारे धुपारे देणार्‍या, मंत्र तंत्र करणार्‍या आणि जादूटोना करणार्‍या मध्ययुगातील वेशभूषा करून लोकांना नादी लावणार्‍या भंपक बुवा-बापूंसारखा हा हिंदू राष्ट्रवादी नव्हता.  टाटा-अंबानींसारख्या उद्योजकांकडून वाहवा मिळवणारा होता. टाटा, अंबानी यांचा माणूस म्हणून केजरीवाल यांनी त्यांच्यावर प्रखर टिका केली. पण ही माणसे अस्सल भारतीय आहेत. भारताच्या विकासात टाटा, अंबानी यांचे योगदान विसरून कसे चालेल? आज लाखो लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या लोकांच्या माध्यमातून रोजगार मिळवत आहेत. अशा अस्सल भारतीयांना जवळ करणे यात चूक काय? विदेशी कंपन्यांना, विदेशी नेतृत्त्व स्विकारणार्‍यांना याचे मोठेपण कसे समजणार?
  • नरेंद्र मोदींनी प्रचारात थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर केला. व्यवस्थापनशास्त्रातील भाषेत बोलणारा असा हा हिंदू राष्ट्रवादी नेता आहे. तो बजरंगी वा तोगडियावादी नव्हता तर उद्योजक होता. गुजराती माणूस मुळातच व्यापारी प्रवृत्तीचा असतो. फायदा तोटा याचा विचार त्यांनी केला असणारच. हिंदुत्वाचा अभिमानी असला तरी तो दैववादी नव्हता. कर्मकांडाला प्रोत्साहन देणारा नव्हता याचा विचार कोणी केलाच नाही. नरेंद्र मोदी यांचा विचार हा प्रयत्नपूर्वक संपत्ती निर्माण करण्यावर भर देणारा होता आणि आहे. त्यालाच मतदारांनी कौल दिला आहे हे तथाकथीत डाव्या आणि उजव्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
  •  धार्मिक अहंगंडामुळे प्रचलित हिंदुत्ववाद्यांमध्ये प्रकट होणारी, जगातील अन्य देशांबद्दलची तुच्छतावृत्ती या राष्ट्रवादी हिंदूमध्ये दिसत नव्हती. त्यामुळेच शपथविधी समारंभालाही सर्व शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित केले गेले. जगातील प्रगतिशील व बलवान राष्ट्रांबद्दल आस्था नरेंद्र मोदींच्या वागण्यात होती त्याची ही परिणीती आहे. सर्व उत्तरे आम्हाला मिळाली आहेत, अशी खुळचट मुरली वाजवण्याची धडपड नव्हती, तर जगाकडून शिकण्याची वृत्ती होती. मोदी ब्रँडची ही वैशिष्ट्ये तरुणाईला भावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवमतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला. ही निवडणूक अमेरिकन पद्धतीनेच झाली. संपूर्ण देशाने एका व्यक्तीला मतदान केले. त्यांनी दिलेले उमेदवार कोण आहेत याचा विचार न करता मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून मतदार बाहेर पडला. ते मतदान श्रीरंग बारणेंना नव्हते की अनंत गीतेंना नव्हते. पण मोदींचा प्रतिनिधी असल्यामुळे या उमेदवारांमध्ये प्रत्येकाने मोदी पाहिला आणि त्यांना विजय मिळाला.
  •    परंपरा आणि आजचे युग याचा मेळ मोदींनी उत्तम रीतीने साधला.  असा मेळ साधण्यात मोदी ब्रँडची ताकद नव्हती. ती ताकद होती निर्णय घेण्याच्या व काम करून दाखवण्याच्या कार्यशैलीत. गुजरातमध्ये ती ठसठशीतपणे दिसली. अन्य राज्यांतून गुजरातमध्ये पोटापाण्यासाठी जाणार्‍या लक्षावधी मजूर व कारकुनांनी ती आपापल्या राज्यांत पोहोचवली. उत्तर प्रदेशातील घराघरात मोदी पोहोचले ते केवळ अमित शहांमुळे, नव्हे तर स्थलांतरित मजुरांनी केलेल्या प्रचारामुळे. ब्ल्यूप्रिंटची बोलबच्चनगिरी करणारे नेते बरेच होते, पण ती प्रत्यक्षात उतरवणारे हिंदू राष्ट्रवादी मोदी एकटेच होते. आज आपले लोक निरनिराळ्या ठिकाणी जातात. जिथे असतील तिथला गोडवा आपल्या गावी जावून गातात. पण त्यातून सरकारची प्रतिमा चांगली करणारी कोणतीही कृती होत नाही. कारण त्यांना अनेक असुविधांना तोंड द्यावे लागते. नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये बाहेरून येणार्‍यांना तशा सुविधा दिल्या त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगली प्रतिमा होत गेली.
  • प्रगतीकडे घेऊन जाणारे बदल घडवणार्‍या मोदींच्या कार्यशैलीला जोड मिळाली, ती प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पाहण्याच्या वृत्तीची. तरुणाई व मध्यमवर्गाबरोबर खेड्यापाड्यांतील भारतीय या वृत्तीमुळे भारून गेले. गेली बारा वर्षे प्रत्येक पातळीवर मोदींना प्रखर विरोध झाला. त्यांचे सैतानीकरण केले गेले. सरकारी चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे होता. त्यांना अटक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. त्यांची अटक हेच एकमेव लक्ष्य असल्याचे कपिल सिब्बल यांनी 2009च्या निवडणूक निकालानंतर उघडपणे सांगितले. सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली एसआयटी, अशा अनेक तपास यंत्रणांनी खोदून खोदून चौकशी केली. कित्येक तास उलटतपासणी केली. पण मोदींविरुद्ध लहानसाही पुरावा मिळू शकला नाही. मोदींनी या सर्वाला शांतपणे तोंड दिले. या संघर्षाचे कौतुक तरूणाईने केले आणि हा विजय त्यांच्या पदरात टाकला.
  •      देशातील काँग्रेसनिष्ठ बुद्धिजीवी वर्गाने त्यांना सैतान ठरवले. अन्य पक्षांनी वाळीत टाकले. इतकेच काय, स्वपक्षीयांनीही प्रत्येक पायरीवर अडचणी उभ्या केल्या. पण मोदी सर्वांना पुरून उरले. मार्केटमधील प्रत्येक आव्हान परतवून लावीत स्वत:चे प्रॉडक्ट लोकांच्या मनावर ठसवणार्‍या कर्तबगार सीईओप्रमाणे मोदींनी राजकीय वाटचाल केली. आज देशाला अशा माणसाची गरज आहे. अशा निर्णयक्षम नेतृत्त्वाची गरज आहे हे तरूणाईने दाखवून दिले. इच्छाशक्तीच्या या जबरदस्त आविष्काराकडेच कोट्यवधी नवमतदार खेचले गेले. सत्र न्यायालयाने क्लीन चिट देताच नवमतदारांमध्ये मोदींचा शेअर एकदम वधारला. हा माणूस रड्या नाही. तो लढवय्या आहे. त्वेषाने लढणारा आहे. लढणार्‍या माणसाचे कौतुक कोणीही करणारच. हिंदू असल्याचा जसा त्याला अहंगंड नाही, तशीच हिंदू असल्याबद्दल खंतही नाही. एका पातळीवर हा हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगतो.
  • आपला ब्रँड सर्व थरांतील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदींनी विविध प्रतिमांचा चाणाक्षपणे  वापर करून घेतला. हिंदू राष्ट्रवादीम्हणून सुरुवात केल्यावर, गरिबीला कुठे धर्म असतो, असा सवाल करीत निवडणूक प्रचाराला विकासाच्या टप्प्यावर नेले.
  •    परंपरा व आजचे युग याचा मेळ मोदींनी उत्तम रीतीने साधला. तथापि, केवळ असा मेळ साधण्यात मोदी ब्रँडची ताकद नव्हती. ती ताकद होती निर्णय घेण्याच्या व काम करून दाखवण्याच्या कार्यशैलीत. गुजरातमध्ये ती ठसठशीतपणे दिसली. अन्य राज्यांतून गुजरातमध्ये पोटापाण्यासाठी जाणार्या लक्षावधी मजूर व कारकुनांनी ती आपापल्या राज्यांत पोहोचवली. उत्तर प्रदेशातील घराघरात मोदी पोहोचले ते केवळ अमित शहांमुळे, नव्हे तर स्थलांतरित मजुरांनी केलेल्या प्रचारामुळे. ब्ल्यूप्रिंटची बोलबच्चनगिरी करणारे नेते बरेच होते, पण ती प्रत्यक्षात उतरवणारे हिंदू राष्ट्रवादीमोदी एकटेच होते.
  • प्रगतीकडे घेऊन जाणारे बदल घडवणार्या मोदींच्या कार्यशैलीला जोड मिळाली, ती प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पाहण्याच्या वृत्तीची. तरुणाई व मध्यमवर्गाबरोबर खेड्यापाड्यांतील भारतीय या वृत्तीमुळे भारून गेले. गेली बारा वर्षे प्रत्येक पातळीवर मोदींना प्रखर विरोध झाला. त्यांचे सैतानीकरण केले गेले. सरकारी चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे होता. त्यांना अटक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. त्यांची अटक हेच एकमेव लक्ष्य असल्याचे कपिल सिब्बल यांनी 2009च्या निवडणूक निकालानंतर उघडपणे सांगितले. सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली एसआयटी, अशा अनेक तपास यंत्रणांनी खोदून खोदून चौकशी केली. कित्येक तास उलटतपासणी केली. पण मोदींविरुद्ध लहानसाही पुरावा मिळू शकला नाही. मोदींनी या सर्वाला शांतपणे तोंड दिले. हे त्यांचे लढवय्येणपण सर्वाना आवडले. त्यामुळे नरेंद्र मोदी हा एक वेगळा पॅटर्न प्रत्येक पक्षाला वाटू लागला आहे. पणे केवळ अंधानुकरण आणि स्टाईल वापरून यश मिळत नाही तर कर्तृत्त्वही सिद्ध करावे लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: