सिंधू म्हणजे सागर, समुद्र, महासागर. जो अथांग असतो. ज्याला कोणतेही मापदंड नसते. जो सर्वसमावेशक आहे. जो शांत आहे. आपली मर्यादा ओलांडणारा नाही. पण खवळला तर सर्वांना धडकी बसवेल असा तो सागर. हे सगळे सागराचे गुण आमदार विवेक पाटील यांच्यात आहेत. ते सर्वसमावेशक असे आहेत. सर्वांना आपले करणारे आहेत. कोणतीही मर्यादा न ओलांडणारे संयमी आहेत. पण अन्यायाविरोधात मात्र सागराप्रमाणे खवळणारे आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर, कामगारांच्या प्रश्नावर, डान्सबारच्या प्रश्नावर जेव्हा ते आक्रमक होतात तेव्हा खवळलेल्या सागराप्रमाणे ते भासतात. म्हणूनच या मालिकेला विवेकसिंधू हे नाव दिले आहे. सागराच्या पोटातून नवरत्नांचा जन्म होतो. ही नवरत्ने सगळ्या जगाला मोहवणारी अशी असतात. तशी नवरत्ने पनवेल उरण आणि रायगडातून शोधून काढण्यासाठी क्रीडा महोत्सव, स्पोर्टस अॅकेडमीची स्थापना करण्याचे काम आमदार विवेक पाटील यांनी केलेले आहे.
- समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधात जे आदर्श नेत्याचे गुण वर्णन केले आहेत ते आमदार विवेक पाटील यांना तंतोतंत लागू पडतात. उदाहरणार्थ
- “ पुसो जाणे, सांगो जाणे। अर्थांतर करू जाणे।
- सकळीकांचे राखो जाणे। समाधान॥” या उक्तीप्रमाणे येणार्या प्रत्येकाचे ऐकून, विचारपूस करून, त्याला काय हवे आहे हे समजून घेवून त्याच्या प्रश्नांचा, समस्यांचा योग्य उपाय करून त्याचे समाधान करण्याचे कर्तृत्व हे आमदार विवेक पाटील यांच्यात आहे. त्यामुळे एका योगीपुरूषाकडून जे घडते ते आमदार विवेक पाटील यांच्याकडून घडताना दिसते. त्यांच्याकडे आले म्हणजे ते प्रश्न हमखास सुटणार हा विश्वास प्रत्येकाला आहे. कामगार असोत वा नागरिक. सर्वांच्या प्रश्नांचे समाधान करण्याचे कसब आमदार विवेक पाटील यांच्यात आहे. हे सगळे निस्पृहपणे केले जाणारे कार्य आहे. महाराष्ट्रात गेली अनेकवर्ष होमिओपॅथी डॉक्टरांचा प्रश्न प्रलंबित होता. अन्य उपचारपद्धतीच्या तुलनेत होमिओपॅथी उपचार पद्धतीला राज्यात कमी लेखले जात होते. सरकारी सेवेत या डॉक्टरांना सामावून घेतले जात नव्हते की त्यांना अॅलोपॅथी औषधांची शिफारस करण्याची परवानगी नव्हती. ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर उपचारासाठी येत नव्हते. होमिओपॅथी डॉक्टर जाण्यास तयार होते पण सरकार त्यांना परवानगी देत नव्हते. संपूर्ण जगाने ही उपचारपद्धती मान्य केलेली असताना महाराष्ट्रातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय होत होता. हा प्रश्न आमदार विवेक पाटील यांनी विधानसभेत उचलून धरल्यामुळे सरकारला या डॉक्टरांची दखल घेणे भाग पडले. यामुळे महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टरांचा फायदा होणार आहे. ही काम करण्याची पद्धती अत्यंत सर्वसमावेशक अशी आहे. यामध्ये कोणतेही राजकारण असू शकत नाही. समाजाचे भले करणे एवढाच यात भाव असतो. ‘सर्वेपि सुखिन:संतु, सर्वेसंतु निरामय:’ हे जे आमदार विवेक पाटील यांचे दर्शन घडते ते योगपुरूषाला साजेसे असे आहे.
- उत्तम राज्यकर्त्यांचे वर्णन करताना समर्थ रामदासांनी म्हटले आहे की,“ दीर्घ सूचना आधी कळे। सावधपणे तर्कप्रबळे।
- जाणजाणोनी निवळे। येथायोग्य॥” कोणत्यावेळी कोणता निर्णय घेतला पाहिजे याचे उत्तम ज्ञान, अभ्यास असलेले हे व्यक्तिमत्व आहे. खारघरच्या टोलनाक्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणत्याही प्रकारे टोलनाका रद्द होवू शकणार नाही. त्या अटीवरच तर सरकारने या रस्त्याचे काम केलेले आहे. पण हा टोल स्थानिकांना जाचक ठरता कामा नये. इथे आमदार विवेक पाटील यांनी अत्यंत विवेकबुद्धीने काम केलेले आहे. दूरदृष्टीने जाणून त्यांनी विधानसभेत इशारा दिला होता की जर हा टोलनाका झाला तर खारघर, पनवेल, उरणमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कोल्हापूरात गेली दोन वर्ष तोडफोड, जाळपोळ, बंद, मोर्चे सुरू आहेत. टोलनाक्यांचा प्रश्न सतत चिघळत आहे. तशीच किंबहुना त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती महामार्गावर निर्माण झाली तर मुंबईत येण्याचा मार्ग बंद होईल. केवळ त्याचा फटका नवीमुंबई, पनवेल आणि रायगडला बसणार नाही तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील. हा गर्भीत इशारा दिल्याने सरकारला विचार करण्यास भाग पाडले. उतावळेपणाने बाकीच्या नेत्यांप्रमाणे टोलनाका रद्द करा असे फसवे आमिष सामान्यांना दाखवले नाही. हा टोलनाका कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही हे वास्तव आहे. पण त्याचा फटका स्थानिकांना बसू देणार नाही हा विश्वास आहे. स्थानिकांना या टोलनाक्यातून सवलत देण्यात यावी ही आग्रही भूमिका आमदार विवेक पाटील यांनी मांडली. एमएच-6, एमएच-43, एमएच-46 या मालिकेतील वाहनांना या टोलनाक्यातून वगळावे अशी आग्रही भूमिका घेतल्याने काँग्रेसलाही विचार करायला भाग पाडले. जे काँग्रेसचे आमदार टोलनाका रद्द करणार म्हणून सामान्यांना फसवत होते, त्यांनाही आपली भूमिका बदलावी लागली. कारण आमदार विवेक पाटील यांनी केलेला विवेक बुद्धीने केेलेला हा निर्णय होता. हे उत्तम नेत्याचे गुण आहेत. समर्थांनी वर्णन केलेल्या नेत्याप्रमाणे ते आहेत.
- समर्थांनी वर्णन केलेेले शब्द आणखी एकाबाबतीत आमदार विवेक पाटील यांना लागू पडतात. ते म्हणजे,“ ताळमेळ तानमाने। प्रबंद कविता जाड वचने। मज्यालासी नाना चिन्हे। सुचती जया॥” मज्यालासी चिन्हे म्हणजे सभाधीटपणाची लक्षणे. सभेमध्ये जे चातुर्य लागते अशी लक्षणे ज्याच्याकडे आहेत तो. आमदार विवेक पाटील सभागृहातील आणि जाहीर अशा सभा जिंकतात याचे कारण त्यांच्याकडे सभेतील असणार्या प्रत्येकाचे समाधान करण्याचे चातुर्य आहे. हे ज्या नेत्याकडे असते तोच नेता यशस्वी असतो. तोच नेता म्हणवून घेण्यास योग्य असतो. आपला सर्वांना बरोबर घेवून जाणारा मुद्दा ठासून सांगण्याचे, पटवून सांगण्याचे सामर्थ्य आणि चातुर्य आमदार विवेक पाटील यांच्यात आहे. त्यामुळेच राज्य सरकारला डान्सबार बंदीचा कायदा करावा लागला. डान्सबार बंदी उठवल्यानंतरही त्यावर फेरविचार करून ती बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण हे समाजहितासाठी नाही. समाजासाठी ते कसे घातक आहे हे त्यांनी विधानसभेत प्रत्येकाच्या मनावर ठसवले. यावेळी त्यांच्यातील जो सभाधीटपणा, वाकचातुर्य दिसून आले त्याने संपूर्ण विधानसभा स्तब्ध झालेली होती. काय करायला लागलो आहोत आपण? कशासाठी चालवले आहेत हे डान्सबार? सरकारला विचार करायला लागला. हे विवेकबुद्धीचे यश आहे. ही विवेकबुद्धी आमदार विवेक पाटील यांचे ठायी आहे. त्यामुळे ते खर्या अर्थाने नेते म्हणून शोभतात.
- कोणतीही गोष्ट करायची म्हणजे त्यासाठी पूर्ण माहिती असली पाहिजे. त्याचा पूर्ण अभ्यास असला पाहिजे. ज्याची माहिती नसेल ती माहिती आधी करून घेतली पाहिजे. या गोष्टींवर आमदार विवेक पाटील यांचा कटाक्ष असतो. प्रत्येकाने अभ्यास करावा. मेहनत करावी. पूर्ण माहिती घेवूनच कोणतेही कार्य हातात घ्यावे. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न हे प्रामाणिक असावेत. यासाठीच त्यांनी ‘अविश्रांत मेहनत व प्रामाणिकपणा हेच यशाचे गमक ’ हे ब्रिदवाक्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयावर कोरले आहे. इथेही समर्थांनी दासबोधात केलेले वर्णन लागू पडते. समर्थ रामदास म्हणतात,“ आधीं च सिकोन जो सिंकवी। तो चि पावें श्रेष्ठ पदवी। गुंतल्या लोकांस उगवी। विवेकबळे॥ किती समर्पक वर्णन आहे हे आमदार विवेक पाटील यांना लागू होणारे. नेते नेहमीच आदेश सोडतात. पण आमदार विवेक पाटील हे कधी आदेश सोडत नाहीत तर आपण हे करूया असे सांगून स्वत: प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. त्यासाठी स्वत: ते शिकून घेतात. नंतर ते दुसर्याला शिकवतात. मार्गदर्शन करतात. हे करताना अत्यंत सहजसोपे करून आपल्या विवेकबुद्धीला पटेल अशा पद्धतीने करून सांगतात. हे उत्तम नेत्याचे गुण आहेत. त्यामुळेच आमदार विवेक पाटील जीथे अचानक जातात तिथे आपोआप गर्दी जमते. कार्यकर्त्यांचे कोंडाळे जमते. अमूक एकाठिकाणी आमदार विवेक पाटील जाणार आहेत, असा निरोप न देताही ते येणार असल्याची कुणकूण कार्यकर्त्यांना लागते. याचे कारण सुगंध कधी लपून रहात नाही. दुरून नुसती वार्याची झुळूक जरी आली तरी रातराणीचा गंध माणसाला धुंद करून सोडतो. त्यासाठी रातराणीचे झाड वाकवावे लागत नाही. इतर सुगंधी फुलांप्रमाणे रातराणीचे फूल कधी हातात घेवून हुंगावे लागत नाही. रातराणी आपले अस्तित्व आपोआप दाखवून देते. कारण तिच्यातील गुण महत्त्वाचे आहेत. नेमका असाच प्रकार आमदार विवेक पाटील यांच्यात आहे. हे उत्तम नेत्याचे गुण आहेत. हे उत्तम महंताचे गुण आहेत, तसेच हे उत्तम योग्याचे गुण आहेत.
- 2
बुधवार, १८ जून, २०१४
विवेकसिंधू-2 नेत्याचे, महंताचे, योग्याचे गुण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा