आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस म्हणजे उरण पनवेलकरांना एक पर्वणी असते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नुसता सळसळत असतो. विविध सामाजिक उपक्रम साजरे करून आमदार विवेक पाटील यांचेवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. प्रत्येक कार्यकर्ता हिरीरीने कामाला लागलेला असतो. हे सगळं उत्स्फूर्तपणे असते. कारण आमदार विवेक पाटील यांच्याकडून एक प्रकारची उर्जा प्रत्येकाला मिळत असते. याचे कारण आमदार विवेक पाटील यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू कामगिरी करणारे व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य, कला, क्रीडा, सहकार, सामाजिक न्याय, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात ते चौफेर कामगिरी करताना दिसतात. त्याचबरोबर समाजातील चुकीच्या गोष्टींना कडाडून विरोध करण्याचे धाडस त्यांच्याकडे आहे. त्यासाठी संघटन करून एकत्रित लढा देण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. आंदोलन यशस्वी करण्याचे तंत्र आमदार विवेक पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला आशीर्वाद घेताना दिसतो. समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधात विवेक लक्षण नावाचा जो समास लिहिला आहे तो जणू काही आमदार विवेक पाटील यांना पूर्णपणे लागू होतो.“ प्रबंदाची पाठांतरे। उत्तरासी संगीत उत्तरे। नेमक बोलता अंतरे। निववी सकळांची॥” या ओवीप्रमाणे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीवर, समस्येवर, प्रश्नावर नेमके आणि समर्पक असे उत्तर त्यांच्याकडे असते. प्रत्येकाचे समाधान होईल असा तोडगा काढण्याची विवेकबुध्दी त्यांच्याकडे आहे. आपल्याला आई वडिलांनी ठेवलेले नाव समर्पक करणे हे फार महत्त्वाचे असते. नाव राम आहे पण वागत असेल रावणासारखा तर तो आईवडिलांप्रमाणेच देवाचाही अपमान आहे. परंतु आमदार विवेक पाटील हे नावाप्रमाणेच विवेकाने वागतात. सर्वांना आनंद देतात. त्यामुळे विवेकानंद हे नाव त्यांना खर्या अर्थाने शोभते. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी आणण्याच्या हालचाली आत्ता केल्या. आत्ताच्या पावसाळी अधिवेशनातच त्यावर बंदी घातली गेली. पण ही बंदी घालण्याचे पहिले श्रेय जाते ते आमदार विवेक पाटील यांना.नवी मुंबई, मुंबई, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात डान्सबार वाढत होते. या डान्सबारच्या नादाला युवावर्ग लागला होता. जमिनी विकून आलेला पैसा, बापकमाईचा पैसा अशा वाममार्गाला उधळला तर या युवकांचे काय होईल? त्यांचे भवितव्य काय होईल? त्यांच्या आयाबहिणी कोणाकडे पाहतील? हे लक्षात आल्यावर या डान्सबार विरोधात पहिला आवाज महाराष्ट्रात उठवला तो आमदार विवेक पाटील यांनी. लाखो महिलांचा भव्य मोर्चा काढला आणि मुंबईकडे जाणारी गृहमंत्री आर आर पाटील यांची गाडी या मोर्चाने अडवली. डान्सबारवर बंदी घातल्याशिवाय गप्प बसणार नाही असे गृहमंत्र्यांना आमदार विवेक पाटील यांनी लाखो आयाबहिणींच्या साक्षीने सांगितले. गृहमंत्र्यांकडून डान्सबारवर बंदी घालण्याचे वचन घेतले तेव्हाच आमदार विवेक पाटील गप्प बसले. त्यानंतर थोड्याच दिवसात हा प्रश्न विधानसभेत मांडला गेला आणि राज्य सरकारला डान्सबारवर बंदी घालण्यास भाग पाडले. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आमदार विवेक पाटील यांच्या प्रयत्नाने बंदी घातली खरी. पण डान्सबारचालक न्यायालयात गेले. न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले. जुलै 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. याचे कारण राज्य सरकारने आपली बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडली नाही. डान्सबारमुळे काय होते हे स्पष्टपणे सांगण्यात राज्य सरकार कमी पडले आणि त्यामुळे ही बंदी उठली. पण त्यानंतर मात्र आमदार विवेक पाटील हे हट्टाला पेटले. राज्यसरकारने जर हा प्रश्न प्रभावीपणे मांडला असता तर ही बंदी उठली नसती याचे शल्य मनात घेवून त्यांनी सरकारच्या मागे लागून ही बंदी घातलीच पाहिजे असा सातत्याने आग्रह धरला. सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. सरकारवर दबाव टाकला. त्यामुळे जाता जाता का होईना या सरकारला विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनादरम्यान डान्सबारवर बंदी घालावी लागली. हे एखाद्या गोष्टीच्या मागे लागून काम पूर्ण करण्याचे कौशल्य प्रत्येक कार्यकर्त्याला भारावून टाकते. त्यामुळे आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस हा काही त्यांचा स्वत:चा रहात नाही तर तो एखादा उत्सव होवून जातो. आमदार विवेक पाटील यांचे विधानसभेत केलेले काम, त्यांनी अभ्यासपूर्ण मांडलेले प्रश्न, भाषणे हे नेहमीच सर्व सदस्यांना भारावून टाकणारे असे असतात. कारण सर्वसामान्य आमदार जेव्हा वर्तमानात जगत असतात तेव्हा आमदार विवेक पाटील हे काळाच्या पुढे जावून काही नवे घडवू पहात असतात. त्यामुळे दूरदृष्टी असणारा, काळाच्या पुढे जाणारा असा नेता म्हणून विवेक पाटील यांचे उदाहरण देता येईल. राष्ट्रकूल स्पधेंत महाराष्ट्रातील काही खेळाडूंनी यश मिळवले. त्यांचा सत्कार आणि अभिनंदनाचा ठराव राज्यसरकारने मांडला. तेव्हा आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, या खेळाडूंनी प्रचंड संघर्ष, मेहनत करून यश संपादन करायचे आणि नंतर सरकारने त्यांचे कौतुक करायचे. त्यांचे कौतुक, अभिनंदन हे करायलाच पाहिजे पण त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांना मदत होईल असे क्रीडा धोरण राज्य सरकारने आखले पाहिजे. तळागाळांत, ग्रामीण भागात असे अनेक गुणवंत खेळाडू संधीच्या प्रतिक्षेत असतात. त्यांचा शोध घेण्याचे काम सरकारने केले पाहिजे. पनवेलची कर्नाळा स्पोर्टस अॅकेडमी ज्याप्रमाणे क्रीडापटू घडवते, ग्रामीण भागातील खेळाडूंचा शोध घेते, त्यांना प्रशिक्षण देते त्याप्रमाणे क्रीडा प्रशिक्षण संस्था आपल्याकडे उभारण्याची गरज आहे. राज्याने हा कर्नाळा पॅटर्न स्विकारला पाहिजे. आमदार विवेक पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेने मुख्यमंत्रीही भारावून गेले. राज्याच्या क्रीडा धोरणात कर्नाळा पॅटर्न आणण्याचे त्यांनी यावेळी मान्य केलेच. पण क्रीडा धोरण ठरविण्याच्या समितीवर आमदार विवेक पाटील यांची नेमणूक केली. हे कर्तृत्त्व त्यांनी त्यांच्या विचारी, दूरदृष्टीच्या आणि अभ्यासपूर्ण कामगिरीने सिद्ध करून दाखवले. आज कर्नाळा स्पोर्टस अॅकेडमी जलतरण, तायक्वांदो, रायफल शूटींग अशा अनेक खेळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहे. ही सगळी दहा पंधरा वर्षांपूर्वी रोवलेली बिजं आता अंकुरायला लागली आहेत. मिशन ऑलिंपिक 2020 हे स्वप्न जेव्हा साकार होईल, देशाला, राज्याला, रायगड जिल्ह्याला, पनवेलच्या कर्नाळा स्पोर्टस अॅकेडमीच्या नावावर जेव्हा ऑलिंपिकचे पदक असेल तेव्हा ते श्रेय खर्या अर्थाने आमदार विवेक पाटील यांचे असेल. कारण त्यांना तातपुरते असे काही करायचे नसते. जे काही करायचे ते कायमस्वरूपी आणि चांगले करायचे. दूरदृष्टी ठेवून करायचे हे त्यांचे कायम धोरण राहिले आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट यशस्वी होताना दिसते. कोणत्याही खेळाडून कुठेही कामगिरी केली की सर्वात पहिले कौतुक आमदार विवेक पाटील करतात. त्यांना प्रचंड आनंद होतो. त्या खेळाडूचे, त्याच्या प्रशिक्षकाचे ते भरभरून कौतुक करतात. त्यातून त्या खेळाडूंना प्रचंड उर्जा मिळत असते. आपल्या पाठिशी आमदार विवेक पाटील नावाची शक्ती आहे. आता आपल्याला मागे वळून बघण्याचे काहीच कारण नाही असा विश्वास प्रत्येक खेळाडूच्या चेहर्यावर असतो. त्यामुळे ते अधिकाअधिक सरस कामगिरी करत जातात. कलाकारही आमदार विवेक पाटील यांच्या आशीर्वादासाठी सतत भुकेलेले असतात. अनेक नाट्य कलावंत, सिने कलावंत आम्ही कर्नाळा कला क्रीडा आणि सांस्कृतीक महोत्सवात आमची कला सादर केली त्यामुळे मोठे झालो हे अभिमानाने सांगतात. हे व्यासपीठ आम्हाला मिळाले म्हणून आम्ही मोठे झालो हे कौतुकाने सांगताना आमदार विवेक पाटील यांच्या ऋणात राहण्याचे कबूल करतात. संपूर्ण महाराष्ट्रात आदेश भावोजी म्हणून लोकप्रिय झालेला आदेश बांदेकर हे कर्नाळाचे यशस्वी प्रॉडक्ट आहे. आदेश बांदेकर आता झी टिव्हीसारख्या कार्यक्रमांतून, मालिकांमधून, सिनेमातून दिसत असला तरी त्यांचे लक्ष कायम आपल्या कर्नाळा स्पोर्टस अॅकेडमी, आमदार विवेक पाटील यांच्याकडे आहे. आज शिवसेनेच्या मोठ्या पदावर आदेश बांदेकर असले तरी आपणास घडविणारा, पाठराखण करणारा नेता आमदार विवेक पाटील आहेत हे ते अभिमानाने सांगतात. आमदार विवेक पाटील यांच्यासारखे थोडे लोक असतील तरी ते राज्याचा, देशाचा चेहरामोहरा बदलून टाकतील. त्यामुळे बर्याचवेळा आमदार विवेक पाटील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील कामाची शैली सारखी वाटते. पक्ष वेगळे असले तरी चांगले काम करण्याची प्रत्येकाची शैली असते. आज नरेंद्र मोदीही विकासपुरूष म्हणून ओळखले जातात. आमदार विवेक पाटीलही कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात. दूरदृष्टी, विकासकामे, प्रत्येक समस्येवर तोडगा असणे ही जी नरेंद्र मोदींची शैली आहे, नेमकी तीच शैली आमदार विवेक पाटील यांच्याकडे आहे. नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले. परंतु केंद्रात, राज्यात कुठेही सत्ता नसताना आमदार विवेक पाटील यांनी जो विकास करून दाखवला आहे, हे त्याच्याही पुढचे पाऊल म्हणावे लागेल. आज महाराष्ट्राला अशा नेत्यांची गरज आहे. आमदार विवेक पाटील यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, विकासकामे केलेली आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट आली तरीही आमदार विवेक पाटील यांचा उरण आणि बाळाराम पाटील यांचा पनवेल मतदारसंघ हा वादळातील दीपस्तंभाप्रमाणे स्थिर राहिला. काँग्रेससारखे महाकाय पक्ष पार झोपले. समाजवादी, बहुजन समाजवादी, राष्ट्रवादी हे सगळे झोपले. पण शेतकरी कामगार पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली. पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवारापेक्षा तब्बल 40 हजार मतांचे मताधिक्य घेतले. तसाच प्रकार उरणमध्येही झाला. आपला मतांचा गठ्ठा स्थिर ठेवण्याचे काम आमदार विवेक पाटील यांच्या कर्तृत्त्वाने दाखवून दिले. मतदारांनी दिलेला कौल सांगतो की सत्तेत असो वा नसो इथले आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटीलच राहतील. कारण विकास पोहोचवण्याचे काम हेच नेते करू शकतात. हा कर्तृत्वाचा विश्वास आहे. कारण आमदार विवेक पाटील यांनी केलेला विकास हा दूरदृष्टी आणि दूरनिर्धाराने केलेला विकास आहे. 1
बुधवार, १८ जून, २०१४
विवेकसिंधू-1 दूरदृष्टी, दूरनिर्धार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा