रविवार, ८ मार्च, २०२०

राजकारणातील स्वतंत्र प्रतिभेच्या महिला







महिलांचे सक्षमीकरण, महिलांना आरक्षण, महिला प्रवर्ग, सरपंचपदाचे, नगराध्यक्षपदाचे आरक्षण झाले तरी बºयाच ठिकाणी महिलांच्या नावावर पुरुष कारभार करताना दिसतात. नगरसेविकेचा पती स्वत: नगरसेवक म्हणून मिरवत असतो. सरपंच महिलेचा पती सरपंच म्हणून सगळी कामे करत असतो. त्यामुळे त्या फक्त खुर्चीची शोभा वाढवण्यासाठी आणल्या आहेत काय? असा सवाल असतो, पण हा पडद्यामागचा कारभार थांबला पाहिजे. स्त्रियांना स्वतंत्रपणे काम करता आले पाहिजे. त्यासाठी राजकारणातील काही स्वतंत्र प्रतिभेच्या महिला नेतृत्वांवर नजर टाकली, तर त्यांचा आदर्श नव्याने राजकारणात येणाºया महिला घेऊ शकतील. त्या कुठल्या पक्षाच्या आहेत यापेक्षा त्या स्वतंत्रपणे काम करू शकतात, हे महत्त्वाचे आहे, म्हणूनच राजकारणात काम करायचे असेल, तर महिलांनी प्यादे न होता वजीर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.इंदिरा गांधी : भारतीय राजकारण आणि लोकशाहीत इंदिरा गांधी हे फार उंचीवर असलेले नाव. वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरीने राजकारणात काम करूनही वडिलांच्या छायेत स्वत:ची वाढ त्यांनी खुंटू दिली नाही. महत्त्वाकांक्षा, जिद्द या जोरावर त्यांनी सर्वोच्च पद प्राप्त केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीही त्यांनी मिळवली, हे केवळ त्यांच्यातील प्रखर निर्णयक्षमतेच्या जोरावरच. त्यामुळे स्त्रियांना महिलांना राजकारणात प्रवेश करायचा असेल, तर हा एक दीपस्तंभ आहे. कोणाच्या पदरामागून राजकारण करण्यापेक्षा असे स्वतंत्रपणे आपली प्रतिमा निर्माण करण्याचे राजकारण महिलांनी केले पाहिजे. पक्षाचा विचार, नेत्यांचा विचार हे सगळे मान्य करायचे आणि स्वत:चा विचार रुजवायचा हे फार मोठे कौशल्य त्यांच्यात होते. त्यामुळेच आणीबाणीचा दणका देऊन देशाला, प्रशासनाला पळवण्याचे काम त्यांनी केले होते. आणीबाणीच्या काळात वीस कलमी आर्थिक योजना, दूरदृष्टी, दूरनिर्धार, शिस्त ही जी तत्त्वं त्यांनी अवलंबिली होती, त्यामुळे नोकरशहांना कामाला लावले होते. वेळेवर न येणारे कर्मचारी, अधिकारी, दांडीबहादूर कर्मचारी यांना त्यांनी शिस्तीचा दणका दिला होता. आपल्याला शिस्त नको म्हणूनच नोकरशहा त्यांच्या विरोधात १९७७ ला गेला होता. त्याचा परिणाम त्यांना पराभव पत्करावा लागला, पण त्या पराभवाने न खचता दोन वर्षांत पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचे काम त्यांनी केले. हे एक महिला करू शकते हे फार मोठे उदाहरण देशातील महिलांनाच नाही, तर जगातील महिलांपुढे आहे, म्हणूनच राजकारणातील महिलांनी सरपंच, नगरसेवक अशा कोणीही असो, आपल्या मागे कारभार करणाºया पुरुषांना रोखा आणि हा आदर्श घेऊन माझे निर्णय मला घेऊ द्या, असे ठणकावून सांगितले पाहिजे.सुषमा स्वराज : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी केंद्रीय मंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भुषवलेल्या सुषमा स्वराज या पेशाने वकील आणि स्वतंत्र प्रतिभेच्या होत्या. आपले विचार स्पष्ट, वागण्याची दिशा स्पष्ट आणि स्वत:ला पटेल तो निर्णय स्वत: घेण्याचे कसब असणाºया नेत्या. आज हीच गरज महिलांची आहे. आपल्याला तिकीट मिळाले आहे म्हणून नेते सांगतील ते, आपल्या नावावर नेत्यांनी काहीही करावे असे जे प्रकार राजकारणात चालतात, त्याला कुठे तरी लगाम बसवायचा असेल, तर महिलांनी सुषमा स्वराज यांच्यासारखे असले पाहिजे. अत्यंत सडेतोड असे व्यक्तिमत्त्व. विरोधकांना नामोहरम करण्याची ताकद होतीच, पण अत्यंत अभ्यासूपणे वागून विरोधकांशी जमवून घेण्याचे कामही त्या करत असत. विरोधासाठी विरोध न करता तत्त्वासाठी जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनच सुषमा स्वराज यांच्याकडे पाहावे लागेल. या प्रतिभावंत नेतृत्वाचा आदर्श राजकारणात नव्याने येणाºया महिलांनी ठेवलाच पाहिजे.डॉ. शालिनीताई पाटील : माजी मंत्री आणि महाराष्ट्रातील एक धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. शालिनीताई पाटील यांची ओळख आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी म्हणून नाही, तर कर्तबगार, अभ्यासू आणि स्वतंत्रपणे विचार करणाºया उच्चशिक्षित नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राजकारणात आपल्यावर कोणी कुरघोडी करू नये यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे. अगदी शरद पवारांपासून त्यांना अनेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी न जुमानता संघर्ष केला. मराठा आणि आर्थिक आरक्षणाचा मुद्दा गेल्या पाच-सहा वर्षांत गाजतो आहे, पण तो किती तरी अगोदर सर्वात प्रथम शालिनीतार्इंनी उपस्थित करून क्रांतीसेना नावाची संघटना स्थापन केली होती. आज जे आरक्षणासाठी झटत आहेत, त्यांनीच त्यांना तेव्हा विरोध केला होता आणि राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा संघर्ष कधीच थांबला नाही. नियोजनबद्ध काम कसे करायचे याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. स्वत:ची मते मांडायला शिकले पाहिजे. आपल्या खुर्चीमागून कोणी काम करणार असेल, तर त्याला थांबवण्यासाठी हा आदर्श समोर असला पाहिजे.डॉ. नीलम गोºहे : शिवसेनेच्या नेत्या आणि गेली अनेक वर्षे विधान परिषदेवर आमदार आणि सध्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोºहे या स्वतंत्र प्रतिभेच्या महिला आहेत. राजकारणात कसे असावे याचे त्या एक छान उदाहरण आहे. पक्षाचे धोरण, ध्येय राबवताना कुठेच कमी पडत नाहीत, पण त्याहीपलीकडे एक महिलांसाठी काम करणाºया समाजसेविका ही त्यांची फार मोठी ओळख आहे. महिला अत्याचार आणि कोणतीही महिलांबाबत वाईट घटना घडली की, त्या लगेच रस्त्यावर उतरतात. राज्याच्या कानाकोपºयात कुठेही जाऊन संबंधित पोलीस ठाण्याला भेट देतात, पीडितांना मदत करतात. यासाठी त्यांना कोणाच्याही परवानगीची गरज लागत नाही. त्यांचे विचार स्पष्ट आहेत, कार्य करण्याची पद्धती स्पष्ट आहे, त्यामुळे त्या धडाडीने स्वतंत्रपणे काम करू शकतात. शिवसेनेच्या महिला आघाडीची फार मोठी ताकद आज त्या आहेत.सुप्रिया सुळे : देशातील सर्वात मोठे नेते अशी ओळख असलेल्या शरद पवार यांच्या कन्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे, पण वडिलांचा आदर्श, मार्गदर्शन असले तरी स्वतंत्रपणे काम करणाºया त्या नेत्या आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणाºया आणि आपला पक्ष कसा वाढवायचा, सगळ्यांना कसे बरोबर घेऊन जायचे याचे बाळकडू जरी त्यांना मिळाले असले, तरी संघटनात्मक पातळीवर त्या स्वतंत्रपणे अत्यंत कल्पकतेने काम करत असतात. खासदार होण्यापूर्वीपासून बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी जे स्थानिक पातळीवरून काम केले आहे, ते त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचे उदाहरण आहे. त्या केवळ शरद पवारांच्या कन्या म्हणून निवडून आल्या नाहीत, तर त्यांच्यातील चमक मतदारांनी ओळखली आहे, म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी त्यांचे कर्तृत्व दाखवून दिले म्हणून त्यांना जनाधार लाभला आहे. महाराष्ट्रातील उल्लेखनीय महिला शक्तींमध्ये त्यांचे नाव घ्यावेच लागेल.पंकजा मुंडे : कल्पवृक्ष कन्येसाठी म्हणून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना राजकारणात आणले, पण आपल्या कार्यक्षमतेने त्यांनी त्या कल्पवृक्षाला वटवृक्ष बनवण्याचे काम केले. स्वत:च्या बळावर निवडणूक लढण्याबरोबरच राज्यभर नव्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या धडाडीने जात होत्या. अत्यंत खंबीर आणि जमावाला काबूत आणण्याची फार मोठी ताकद त्यांच्यात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळीही दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही लाखोंच्या जनसमुदायाला सावरण्याचे काम त्यांनी केले. भगवानगडावरची सभा असो वा गोपीनाथगडावरची प्रचंड गर्दी. त्यांना ऊर्जा देण्याचे आणि वडिलांचे, पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी धाडसाने वावरणारे नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. निवडणुकीत कितीही चिखलफेक झाली, तरी न डगमगता त्यांनी लढा दिला. पराभवाने न खचता पुन्हा आपल्या कामासाठी कंबर कसून तयार होणारे हे व्यक्तिमत्त्वही महिलांसाठी आदर्श असेच आहे.महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक महिला आहेत. सर्वांचा उल्लेख करता येणे शक्य नाही, पण या प्रातिनिधिक महिलांकडून ऊर्जा घेतली, तर महिलांच्या नावाने कारभार करणाºया ग्रामीण भागतील नेत्यांना महिला नेतृत्व लगाम घालू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: