रविवार, १५ मे, २०१६

भ्रष्ट कारभाराची चौकशी करा


  •   यूपीए सरकारच्या काळात टूजी स्पेक्ट्रम हा दूरसंचार घोटाळा झाला होता. ए राजा सारखे कॉंग्रेसचे दलाल खाजगी कंपन्यांचे हित साधण्यासाठी असा प्रकार करत होते. त्याचेच अनुकरण बीएसएनएलचे कर्मचारी ग्रामीण आणि निमशहरी भागातून करून दलालांची भूमिका वठवत आहेत. खायचं एकाचं आणि झोपायचं दुसर्‍या बरोबर अशी या नालायक अधिकारी कर्मचार्‍यांची वागणूक झालेली आहे. त्याचीच परिणीती म्हणजे शाहूपुरी दत्तनगर एक्स्चेंजच्या कर्मचार्‍यांचे सामुहीक पलायन हा प्रकार आहे. 
  • तब्बल दोन दिवस इंटरनेट यंत्रणा बंद असताना हे कर्मचारी रजेवर, सुट्टीवर जाउच कसे शकतात? अत्यंत बरबटलेले आणि भ्रष्ट झालेल्या या कर्मचार्‍यांची तातडीने चौकशी करून त्यांना तुरुंगात डांबण्याची गरज आहे. गतीमान अशा संगणक युगात दोन दोन दिवस यंत्रणा बंद ठेवण्याचे काम हे लोक करूच कसे शकतात? यंत्रणा बंद असताना काम न करता आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण न करता गप्प बसणार्‍यांना पगार घेण्याचा अधिकारच कसा पोहोचतो?
  • दोन दिवस इंटरनेट यंत्रणा बंद असल्यामुळे आणि सोमवारी अधिकारी कर्मचारी केव्हा येतील याची कसलीही खात्री देता येत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अनेकांचे व्यवहार व्यवसाय हे इंटरनेटच्या माध्यमातून चालतात. बीएसएनएलवर अवलंबून राहता येत नसल्यामुळे अनेकांना खाजगी सेवा घेणे क्रमप्राप्त होते आहे. त्यामुळे या खाजगी कंपन्यांचे हित साधणे हेच काम हे कर्मचारी करत आहेत हे स्पष्ट होत आहे. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. कारण नसताना यंत्रणा बंद ठेवणे हा देशद्रोह आहे. हा देशद्रोह सातार्‍यातील दत्तनगर एक्स्चेंजचे कर्मचारी करत आहेत. सरकारचे उत्पन्न बुडवत आहेत. नागरिकांना, ग्राहकांना लुबाडत आहेत. या सगळ्या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.
  •    सातारा शाहूपुरी दत्तनगर एक्स्चेंज म्हणजे भ्रष्टाचाराचे आगार झाले आहे. गेली पंधरा वर्ष हा भ्रष्टाचाराचा कारभार या एक्स्चेंजमधून होतो आहे. जसजसा काळ बदलतो आहे तसतसा नवा भ्रष्टाचाराचा फंडा या लोकांनी शोधून काढला आहे. त्यामुळे दत्तनगर टेलिफोन एक्स्जेंज म्हणजे एक संस्थान बनवले आहे. ठराविक लोक याठिकाणी बदली घेऊन केवळ पैसे कमावण्यासाठी येत असतात. इथल्या कर्मचार्‍यांची बदली तिकडे लांब छत्तीसगड नाहीतर नक्षलग्रस्त भागात करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे यंत्रणा बंद पडल्यावर व्यवस्थेविरोधात तिथले लोक कसे पेटून उठतात हे त्यांना समजेल. त्यांचा कामचुकारपणा कमी होईल.
  •      साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी हे कर्मचारी टेलिफोन कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज भरल्यावर लवकर कनेक्शन देण्यासाठी पैस खात होते. दोन दोन वर्ष फोन मिळत नाही. अर्जंट हवा असेल तर पाचशे रूपये द्या, हजार रूपये द्या अशी मागणी करून कनेक्शन द्यायचे. दुसरीकडे जिल्हा अभियंता थापा मारायचे की आमची सेवा सुधारली आहे, एका दिवसात कनेक्शन देण्याची सुविधा आमच्याकडे आहे, इतके सक्षम असे मनुष्यबळ आमच्याकडे आहे वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात अर्ज भरला, डिपॉझिट भरले तरी कनेक्शन मिळायला पैसे दिल्याशिवाय मिळत नसत. त्यानंतर सगळ्या घरांतून पैसे मिळाल्यावर कनेक्शन दिल्यावर टॅगचे शॉर्टेज आहे असे सांगून जादा पैसे दिले तर टॅग मिळेल असे सांगून हे दत्तनगरचे कर्मचारी पाचशे ते हजार रूपये काढत असत. तो टॅग लावला तरच टेलिफोनच्या मेन लाईनवरून तुमचा फोन सुरू होतो. त्यामुळे हा टॅग घोटाळा त्यांनी सुरू केला. त्यानंतर टॅगच्या माध्यमातून पैसे कमावून झाल्यानंतर नवीन कनेक्शन देताना टेलिफोनचे बॉक्स शिल्लक नाहीत सांगायचे. जुने बॉक्स बसवायचे. ते खराब आहेत हे लक्षात आल्यावर हजार रूपये भरा नवा बॉक्स देतो काढून असे सांगून ग्राहकांना लुटायचे. टेलिफोनचे कनेक्शन आणि डिपॉझिट हे वायर, टॅग, बॉक्स या सगळ्यासाठी असते. पण सरकार दरबारी हे पैसे जमवायचे आणि त्याचा पुन्हा रिसेल करण्याचा धंदा या कर्मचार्‍यांनी सुरू केला. त्यानंतर एका कर्मचार्‍याने नवा फंडा काढला. केबल तुटली की केबलचा तुटवडा आहे असे सांगून तुकडे जोडून जुन्या वायरी काढायच्या आणि ग्राहकांना कनेक्शन द्यायचे. त्यानंतर फोनवर नीट ऐकू येत नाही, खरखर आहे अशी ग्राहकांची तक्रार आल्यावर वायर बदलायला पाहिजे सांगून पैसे काढायचे. ही वायर बदलण्याची जबाबदारी टेलिफोन खात्याची आहे. एक्स्जेंजमध्ये वायरची बंडल पडलेली असतात पण तरीही वायर शिल्लक नाही सांगून ग्राहकांना बाहेरून वायर आणून कनेक्शन देतो असे सांगून वायर विकण्याचा धंदा सुरू केला. टेलिफोन खात्याला बदनाम करून हे कर्मचारी ग्राहकांना लुटत असतानाच गेल्या दहा वर्षात खाजगी कंपन्यांचा पर्याय निर्माण झाला. अनेक खाजगी कंपन्या मार्केटमध्ये आल्यामुळे त्यांच्यातील स्पर्धेला लाभ उठवण्यासाठी या कंपनीचे दलाल म्हणून काम करण्याचे प्रकार सुरू झाले. खाजकी कंपन्यांचा आणि बीएसएनलचा असा दुहेरी पगार या लोकांना सुरू झाला. त्यासाठी वारंवार इंटरनेट आणि टेलिफोन यंत्रणा बंद पाडण्याचा सपाटा दत्तनगर एक्स्चेंजकडून होताना दिसत आहे. या सगळ्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: