- पहिले वर्ष दीड वर्ष चांगले गेल्यानंतर अचानक मोदी सरकार विरोधात सगळे विरोधक एकवटले. प्रत्येक गोष्टीशी संबंध जोडून त्या सरकारवर टिका केली जाऊ लागली. अगदी कन्हैय्यापासून केजरीवालपर्यंत सगळे पुढे आले. त्याचा लाभ कॉंग्रेस घेण्याचा प्रयत्न करू लागली. सुरवातील समर्थन करणारे शरद पवारही विरोधात ठाकले. हा नेमका बदल कशामुळे घडला? वर्षभरात असे काय घडले की कालचे चांगले लोक आज वाईट वाटू लागले? याचे कारण सुरवातीला नरेंद्र मोदी यांनी सकारात्मकतेने आणि त्यांच्याजवळ असलेल्या कामांचा सपाटा लावला. देश स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहीमेपासून सुरूवात केली. त्यामुळे आता आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येणार नाहीत. मोदी फक्त चांगली कामे करत राहतील या भ्रमात कॉंग्रेस राष्ट्रवादीवाले राहिले. परंतु भुजबळांचे प्रकरण समोर आले आणि पाठोपाठ सोनिया गांधींचे हेलिकॉप्टर उडू लागले तसे सगळे विरोधक सरसावले. आपलीही काही खैर नाही. आता हे सरकार वाईट आहे म्हणून ओरडायला सुरूवात करूया असा प्रकार सुरू झाला.
- ऑगस्टा वेस्ट लॅण्ड कंपनी कडून खरेदी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे इटलीतील न्यायालयाने नमूद केल्यामुळे सोनिया गांधी आणि कांग्रेस पक्षासमोर मोठे धर्म संकट उभे राहिले आहे. हे आपल्याचा पापाचे फळ आहे हे माहित असूनही नरेंद्र मोदी सरकारला वेठीस धरण्याचा चंग कॉंग्रेसने मांडला. त्यामुळे कोणत्याही कारणाने कामकाज चालू द्यायचे नाही हा एकच अजंडा या सरकारपुढे होता.
- उत्तराखंडच्या मुद्यावरुन राज्यसभेत गोंधळ घालणार्या कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी भाजपला त्यामुळे आयते कोलीत मिळाले आहे. इटलीच्या न्यायालयाने तत्कालीन कॉंग्रेस सरकारवरच ठपका ठेवला आहे. संबंधित व्यवहारात महत्वाची कागदपत्रे भारताने स्पष्ट केली नाहीत असा कथित आरोपच इटलीच्या न्यायालयाने केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसजनांच्या पाचावर धारण बसली आहे. सोनिया गांधींपासून सगळे छोटे मोठे हवालदिल झाले आहेत. ही चौकशी लागली तर आपलाही भुजबळ होणार काय याची भिती या कॉंगी नेत्यांना वाटते आहे.
- तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँन्टोनी यांनी हेलीकॉप्टर व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची कबूली दिली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावे या प्रकरणात घेतली जात आहेत. सोनिया गांधी यांनी या बाबत आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. देशात आतापर्यत अनेक घोटाळे व भ्रष्टाचार झाले. त्यातून काय बाहेर आले? येणार्या काळात चौकशीचे आदेश दिले जातील व त्यातून जे काय सत्य आहे ते पुढे येईलच असे नाही. म्हणूनच ही चौकशी झाली पाहिजे. यावरून राजकारण करणार्यांना धडा शिकवला पाहिजे. यापूर्वी एन्रॉन, बोफोर्सचे काय झाले? भ्रष्टाचारावर जेवढी चर्चा होते, त्याच्या काही पटीत देखील भ्रष्टाचारा विरोधात कारवाई होत नाही. हेलिकॉप्टर प्रकरणाची सरकारने चौकशी करून जे दोषी असतील त्यांना शासन करावे, अशी सामान्यांची इच्छा आहे. कारण भ्रष्टाचाराचे भूत हे कमी व्हायला पाहिजे. ते मोदी सरकारने करावे ही अपेक्षा आहे.
- आज वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी मोदी सरकारने सुरू केली तर आपण तहहयात तुरूंगात जाऊ अशी भिती कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे ही चौकशी लांबेल कशी, त्याला कलाटणी कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे देशात एखादी दंगल, जाळपोळ आणि हिंसाचार घडवण्याचा विचारही या प्रवृत्ती करू शकतात. दंगे करण्याची कॉंग्रेसची खासीयत आहे. जेणे करून चौकशी लांबणीवर पडेल आणि हे सरकार निष्क्रिय ठरेल हे या विरोधकांना हवे आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील सरकारचे भ्रष्टाचाराचे प्रकार समोर आले होते. आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा असे अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार या राज्यात घडले. त्यावेळी चक्क मंत्रालय पेटवण्याचा प्रकार झाला. सर्वत्र सुरक्षितता असताना अचानक मंत्रालयाला आग कशी काय लागू शकते? कोणीही त्याचा विचार केला नाही. पण भ्रष्टाचाराचे पुरावे जाळून टाकण्यासाठी तत्कालीन सत्ताधार्यांनी हे प्रकार केले होते. आता हातात सत्ता नसल्यामुळे तसे काही करता येत नाही. त्यामुळे कन्हैय्यासारखी भुते घ्यायची आणि धर्मांध, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी- प्रतिगामी, सेक्युलर- फेक्युलर अशा गप्पा सुरू करायच्या. पण मोदी सरकारने अशा प्रकारांना बळी न पडता चौकशी करावी आणि जे दोशी असतील त्या सगळ्यांना कठोर शासन करावे. परदेशातील काळा पैसा येईल तेव्हा येईल पण या देशात भ्रष्टाचार आणि काळा पैसा निर्माण करण्यांना धडा शिकवणे हे प्रथम कर्तव्य आहे.
रविवार, १५ मे, २०१६
कारवाई व्हायलाच पाहिजे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा