रविवार, १८ मे, २०१४

पितापुत्रांच्या द्वेषमूलक राजकारणाचा अस्त होणार


  • लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या बाजूने ज्याप्रमाणे मतदारांनी कौल दिलेला आहे, त्यावरून सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की आता मतदार जागृत झालेला आहे. आता या देशात द्वेषाचे राजकारण मतदार खपवून घेणार नाही. मतदारांची फसवणूक करण्याचे प्रयत्न मतदार सहन करणार नाही. काँग्रेसने या निवडणुकीत आणि निवडणुकीपूर्वी जवळजवळ वर्षभर अगोदरपासून नरेंद्र मोदी यांचा एवढा द्वेष केला की त्या द्वेषमूलक राजकारणाला मतदारांनी चोख उत्तर देवून मोदींच्या पाठीशी राहण्याचे काम केले आहे.
  • आज गल्ली ते दिल्ली काँग्रेसने हेच केले आहे. विकासकामे नाहीत, फक्त द्वेष करायचा. जनतेची फसवणूक करायची. काय काम केले हे काँग्रेसच्या नेत्यांकडे सांगायला नसल्यामुळे खालच्या पातळीवर येवून टिका करायची. या असंस्कृत आणि विकृत राजकारणाला मतदार कंटाळले आणि त्यांनी काँग्रेसला हद्दपार केलेले आहे. 
  • सध्या पनवेलचे लोकलनेते राम ठाकूर, त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर यांनी असेच द्वेषाचे राजकारण केलेले आहे. खालच्या पातळीवर येवून त्यांनी शेतकरी कामगार पक्षावर टिका केलेली आहे. प्रशांत ठाकूर यांनी कसलीही विकासकामे केलेली नाहीत, काही चांगले काम केलेले नाही. आता साडेचार वर्ष झाल्यावर आपण आमदार म्हणून काय केले हे सांगण्यासारखे प्रशांत ठाकूर यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे सतत शेतकरी कामगार पक्ष, आमदार विवेक पाटील यांच्यावर टिका करण्याचे काम त्यांनी चालवले आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत इथला  मतदार या ठाकूर पितापुत्रांना आणि त्यांच्या कोंडाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे इथली जनता म्हटल्याशिवाय राहणार नाही.
  • खोटे बोललेले जनतेला समजणार नाही हा जो भ्रम राम ठाकूर यांना झालेला आहे त्या भ्रमाचा भोपळा आगामी निवडणुकीत मतदार फोडतील आणि पनवेलमधून असलेली ही बाटग्यांची ठाकूर काँग्रेस हद्दपार करतील. या द्वेषाच्या राजकारणात, फसवणुकीच्या राजकारणात उरण पनवेलमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शेकापक्षाच्याच पाठीशी राहून काँग्रेसला चांगला धडा शिकवला आहे.
  • शेकापचे युवा कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती राजेंद्र पाटील यांनी तर निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला आव्हान दिले होते. उरण पनवेलमध्ये शेकापला जास्तीत जास्त मतदान होईल आणि तसे नाही झाले तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करणार नाही. अर्थात हे आव्हान स्विकारण्याची धमक खोटे बोलणार्‍या ठाकूर पितापुत्रांमध्ये नव्हती. इथेच त्यांचा नैतिक पराभव मतदारांनी केलेला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांचे चंबुगबाळे आवरून इथला मतदार त्यांना घरी बसवेल आणि विकासकामे करणार्‍या बाळाराम पाटील यांना विधानसभेवर पाठवेल. कारण बाळाराम पाटील, आमदार विवेक पाटील यांनी कधी द्वेषाचे राजकारण केलेले नाही. सतत विकासकामांवर भर दिला. सत्ता नसली तरी कामे कशी करायची याची चांगली धमक या नेत्यांमध्ये असल्यामुळे आगामी काळात उरण आणि पनवेलमधून शेतकरी कामगार पक्षाचेच आमदार निवडून देण्याचा निर्धार मतदार करतील यात शंका नाही.
  • प्रशांत ठाकूर नागरिकांना, पनवेलकरांना मूर्ख समजतात याचा संताप पनवेलकरांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. जी कामे प्रशांत ठाकूर यांनी केलेलीच नाहीत ती कामे आपण केली असे बिनधास्त सांगून खोटे बोलणार्‍या प्रशांत ठाकूर यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याप्रमाणे देशपातळीवर काँग्रेस नरेंद्र मोदींचा द्वेष करीत आली, मोदींनी केलेला विकास मान्य केला नाही त्याप्रमाणेच प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. गुजरातचा विकास काँग्रेसमुळे झाला असे बिनधास्त काँग्रेस नेते सांगत आले. मग अन्य राज्यांचा का झाला नाही? गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे तर अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. असे असतानाही त्याठिकाणी विकास का झाला नाही? त्यामुळे मोदी द्वेषाने खोटे राजकारण करणार्‍या आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेणार्‍या काँग्रेसला धडा मतदारांनी शिकवला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत उरण पनवेलमध्ये होणार आहे. जी कामे आमदार विवेक पाटील यांनी केली, जी कामे बाळाराम पाटील यांनी केली, जी कामे शेकापचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी केली ती खोटे बोलून आपण केली हे सांगणार्‍या फसवणुकीच्या राजकारणाला आता विराम मिळण्याचे दिवस आलेले आहेत.
  • पनवेलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा जे एम म्हात्रे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केले. या जागेवरील झोपड्या हटवून त्या झोपडपट्टीधारकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी आमदार विवेक पाटील यांनी 35 लाख रूपये खर्च केले आणि या जागेवर आंबेडकर भवन उभे करण्याचा मार्ग मोकळा केला. सरकारी पातळीवर सगळ्या मंजुर्‍या आमदार विवेक पाटील यांनी मिळवल्या. संदीप पाटील नगराध्यक्ष असताना आराखडे, नकाशे मंजूर होवून कार्यादेशही दिला आणि काम सुरू झाले. हे सगळे इथल्या जनतेने पाहिलेले असताना प्रशांत ठाकूर हे सरळ खोटं बोलून मीच केलं मीच केलं म्हणून जनतेला फसवायला चालले आहेत. नागरिकांना हे ठाकूर मूर्ख समजतात काय? स्वत:ला काही करता येत नाही आणि दुसर्‍याने केलेले ते मी केले सांगणे आणि उलट त्याच्यावर टिका करणे हे द्वेषाचे राजकारण आता पनवेलमधून बंद करायचे आहे. चांगल्या घरात जन्म घेतलेली कोणतीही व्यक्ती अशा तर्‍हेचे घृणास्पद कृत्य करू शकत नाही. अंगात त्यासाठी प्रामाणिकपणाचे रक्त असावे लागते. त्या रक्ताचा आणि चांगल्या संस्कारांचा अभाव प्रशांत ठाकूर यांच्यात असल्यामुळे ते असे द्वेषाचे आणि खोटे राजकारण करत आहेत. शेकापक्षाचा हा वाढलेला हत्ती त्यांना घाबरवत आहे. त्यामुळे शेकापक्षाच्या गंडस्थळावर हल्ला करा सल्ला हे द्वेषातून देत आहेत. त्याचा परिणाम महेंद्र घरत सारखा एक किरकोळ जंतू आपल्या विषाने वाटेल ते घाणेरडे शब्द बरळू लागतो. यावरून महेंद्र घरत प्रशांत ठाकूर यांची लायकी काय आहे हे जनतेला समजलेले आहे. पनवेलमधून या घाणीला भोपाळच्या घातक कचर्‍याप्रमाणे हद्दपार केल्याशिवाय इथला मतदार गप्प बसणार नाही.
  • प्रशासकीय इमारतीला मंजूरी आणि सर्व प्रक्रीया आमदार विवेक पाटील यांनी पूर्ण केलेल्या आहेत. असे असतानाही ही इमारत उभी होत आहे म्हणून खोटे फोटो छापून पनवेलकरांची फसवणूक करण्याचे काम प्रशांत ठाकूर यांनी केलेले आहे. ज्या इमारतीचे भूमिपूजनच अजून झालेले नाही ती इमारत उभी होत आहे म्हणून खोटा फोटो टाकून प्रशांत ठाकूर यांनी आपल्या अंगात कसे खोटे रक्त सळसळते आहे हे दाखवून दिले. या विषारी रक्ताला आता पनवेलची जनता जाब विचारणार आहे. फोटोत दाखवलेली प्रशासकीय इमारत कुठे आहे ते दाखवा मगच आमच्या दारात मते मागायला या. खोटं बोलून, जनतेची फसवणूक करून 2009 ला निवडून आलात आता हे पुन्हा शक्य होणार नाही, हे इथला मतदार ठाकूर पितापुत्रांना ठणकावून सांगेल. 
  • कितीही टिका केलीत तरी शेतकरी कामगार पक्ष विकासकामांपासून हटणार नाही. नरेंद्र मोदींनी गेली दहा वर्ष टिका होत असतानाही आपला विकासरथ कधी हटू दिला नाही. त्याचप्रमाणे आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील काँग्रेसवाले टिका करतात म्हणून आपल्या विकासकामे करण्यापासून मागे हटणार नाहीत. ही विकासकामेच त्यांना यशाचा मार्ग दाखवतील. विकासकामात अडथळे आणणार्‍या प्रशांत ठाकूर यांना खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय राहणार नाहीत. पनवेलमधून आता द्वेषमूलक राजकारण आगामी काळात हद्दपार केले जाईल हे निश्‍चित. ज्याप्रमाणे रायगडात बॅ. अंतुलेंनी राम ठाकूरांचा विरोध झुगारून ओरीजनल काँग्रेसने शेकापक्षाच्या पाठीशी राहण्याचे आव्हान केले त्याचप्रमाणे पनवेलमधील ओरीजनल काँग्रेसही पितापुत्रांच्या विषारी बाडग्या काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: