- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून एक लक्षात आले आहे की आता मतदार गद्दारी करणार्या लोकांना कधीही स्थान देणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गद्दारांना आणि स्वार्थी नेत्यांना मोठा झटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही. उरण पनवेलमध्ये राम ठाकूर, प्रशांत ठाकूर यांनी केलेली गद्दारी मतदार कधीही विसरणार नाही.
- मुळात पाठीत खंजीर खुपसणे आणि गद्दारी करणे हीच राम ठाकूर यांची आणि काँग्रेसची खासीयत आहे. शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या 1984 च्या उरणच्या आंदोलनात मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे लग्नाची वरात काढायचे ठरले. त्यावेळी राम ठाकूरांसारख्या गद्दारांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी पोलिसांना माहिती पुरवली की पौष महिन्यात लग्न नसते, लग्नाची वरात म्हणून मोर्चा काढला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी लग्नाच्या वरातीवर गोळीबार केला आणि शेकापक्षाचे पाच आंदोलक हुतात्मे झाले. या पाच जणांच्या मृत्यूला राम ठाकूरांसारखे गद्दार लोक जबाबदार आहेत. त्यांच्या बगलबच्यांना आणि चिरंजीवांना आता आगामी काळात हद्दपार करण्याचे काम मतदार केल्याशिवाय राहणार नाहीत.
- गद्दारी ही राम ठाकूर यांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षात असतानाही आपल्याला तिकीट मिळाले नाही या स्वार्थी हेतुने पक्षाचे काम न करता काँग्रेसला मतदान करा असा प्रचार राम ठाकूर यांनी केला होता. ही या ठाकूरांची दुसरी गद्दारी होती. परंतु असे गद्दार हे देशासाठी आपल्या गावासाठी घातक असतात याची जाणिव मतदारांना झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही गद्दारांना मतदारांनी थारा दिलेला नाही. 2009 च्या निवडणुकीत झालेली चूक मतदार सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे आता पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांचा पराभव निश्चित झालेला आहे. आता फक्त किती फरकाने तो करायचा हेच अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा महिने अगोदर नरेंद्र मोदी यांचा उल्लेख देशाचे भावी पंतप्रधान म्हणून केला जात होता. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ते ओळखले जात होते. त्याचप्रमाणे पनवेलचे भावी आमदार म्हणून इथल्या मतदारांनी बाळाराम पाटील यांना स्विकारले आहे. कारण आता जनतेची फसवणूक करणार्या, विकासापासून वंचित ठेवणार्या प्रशांत ठाकूर यांना हद्दपार करण्याचे मतदारांनी निश्चित केलेले आहे. कारण प्रशांत ठाकूर ही गद्दार राम ठाकूर यांची औलाद आहे, प्रशांत ठाकूर यांच्या नसानसात गद्दारीचे रक्त सळसळते आहे. त्या बेईमान रक्ताला आता इथली जनता थारा देणार नाही.
- 2004 च्या लोकसभा निवडणुकीत गद्दारी केल्यानंतर राम ठाकूर काँग्रेसमध्ये घुसले. आपण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसमध्ये जातो असा बहाणा केला. पण दहा वर्षात प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडविण्याचे काम या पितापुत्रांनी केले नाही. प्रकल्पग्रस्तांशी गद्दारी करून फक्त सिडको आणि जेएनपीटीचे ठेके मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये राम ठाकूर गेले आहेत. ही गद्दारी आता सहन केली जाणार नाही असा प्रकल्पग्रस्तांनी निर्णय घेतलेला आहे. दहा वर्षात केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना प्रकल्पग्रस्तांसाठी या हरामखोरांनी काहीही केलेले नाही याची जाणिव आता प्रकल्पग्रस्तांमध्ये झालेली आहे. इथल्या प्रकल्पग्रस्तांना नोकर्या देण्याऐवजी बाहेरच्या राज्यातून कामगार आणून इथल्या लोकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम राम ठाकूर आणि प्रशांत ठाकूर या बापबेट्यांनी केले. त्यामुळे इथल्या प्रकल्पग्रस्तांशी केलेली ही गद्दारी पितापुत्रांना महागात पडणार आहे. कारण गद्दारांना जनता आता दारातही उभी करणार नाही.
- दहा वर्ष प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणार्या या काँग्रेसच्या ढोंगी पुढार्यांना पनवेलची जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सगळ्या पक्षांचे दरवाजे आता बंद करून राजकीय कारकीर्द संपविल्याशिवाय इथला मतदार गप्प बसणार नाही.
- काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसशी गद्दारी केली. बॅ. अ. अंतुलेंसारख्या वरिष्ठ नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राम ठाकूर यांनी केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार देता आला नाही. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडल्यानंतर मित्र पक्षात असतानाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकरांशी गद्दारी करण्याचे काम राम ठाकूर यांनी केले. राम नवमीचा मुहूर्त साधत ठिकठिकाणी जावून काँग्रेसच्या मतदारांना सांगितले की राष्ट्रवादीला मतदान करू नका शिवसेनेला मतदान करा. आपल्याच मित्र पक्षाची अशी फसवणूक करणार्या लोभी पितापुत्रांना आता इथली जनता कदापि माफ केल्याशिवाय राहणार नाही.
- मैत्रीचा धर्म काय असतो हे राम ठाकूर यांच्यासारख्या गद्दारांना कधीच समजणार नाही. शेतकरी कामगार पक्षाने जो प्रामाणिकपणा या निवडणुकीत दाखवला त्याचे भरघोस यश शेतकरी कामगार पक्षाच्या पदरात पडलेले आहे. उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापक्षाच्या उमेदवाराला भरघोस आघाडी मिळाली आहे. उरण मतदारसंघातून तब्बल साडेबावीस हजारांची तर पनवेलमधून बारा हजारांची आघाडी शेतकरी कामगार पक्षाने घेवून आपली ताकद दाखवून दिलेली आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस साफ झालेली आहे. चाळीस हजारांनी काँग्रेस मागे पडलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गद्दार काँग्रेसला उरण पनवेलची जनता थारा देणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. या दोन्ही मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्षणीय मतांनी विजयी होवून उरण पनवेल काँग्रेसमुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. उरण पनवेलचा विकास कोण करू शकत असेल तर तो फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतो असा ठाम विश्वास मतदारांमध्ये निर्माण झालेला आहे. देशात नरेंद्र मोदी असले तरी उरण पनवेलमधील मोदी हे शेकापक्षाचे नेतेच असतील. देशभरात नरेंद्र मोदींची लाट आली तरी या दोन मतदारसंघात शेकापक्ष दिमाखात राहिला. कारण नरेंद्र मोदी आणि शेकापक्षाचा विचार हा विकासाचा आहे. विकासाच्या मुद्यावर शेकापक्षाला इथल्या मतदारांनी स्विकारले आहे.
- आता प्रशांत ठाकूर यांना वाचविण्यासाठी अण्णा हजारे येणार नाहीत. आता प्रशांत ठाकूर यांना वाचविण्यासाठी अशोक चव्हाण येणार नाहीत. आता मतदार त्यांना विचारेल की तुम्हाला 2009 ला संधी दिली तेव्हा गेल्या पाच वर्षात केलेले एक तरी विकासकाम दाखवा. दाखवायला आहे काय त्यांच्याकडे? घंटा?
- आमदार विवेक पाटील यांनी केलेली, बाळाराम पाटील यांनी केलेली, जे एम म्हात्रे यांनी केलेली कामे आपण केली म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला तर इथली जनता आता प्रशांत ठाकूर यांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. कारण आता मतदार शहाणा झालेला आहे.
- नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी आपण अन्न सुरक्षा विधेयक आणून मतदारांना जवळ करू असा भ्रम काँग्रेसला झाला. पण ही फसवणूक मतदारांच्या लक्षात आली. कारण अन्न सुरक्षेपूर्वीच अंत्योदय योजनेसारख्या अनेक योजना वाजपेयी सरकारने आणल्या होत्या. त्या बंद करण्याचे काम काँग्रेसने केले. हे गोरगरीब जनतेला समजले आहे. मतदारांना पैसे वाटून, धान्य वाटून त्यांना भिक घेण्याची सवय लावणारे हे काँग्रेसचे नेते आहेत. पण मतदारांना, नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे राहून, स्वबळावर खरेदी करण्याची हिम्मत देणारी शक्ती नरेंद्र मोदींकडे आहे. कारण त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. तीच दृष्टी आज शेतकरी कामगार पक्षाकडे आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशांत ठाकूर यांना कोणत्या तोंडाने आणि काय म्हणून जनतेला सामोरे जायचे हा प्रश्न पडणार आहे. खरा नेता तोच जो सर्वमान्य आहे आणि कुठूनही निवडून येवू शकतो. नरेंद्र मोदी बडोद्यातूनही निवडून आले आणि वाराणसीमधूनही निवडून आले. आमदार विवेक पाटील यांचे तसेच आहे. पनवेलमधूनही ते यापूर्वी तीन वेळा निवडून आले आणि नंतर उरणमधूनही ते निवडून आले. कारण जनतेचा कार्यक्षम नेत्यांवर विश्वास असतो. आता विश्वासू नेत्यांनाच मतदार निवडून देतील आणि गद्दारांना हाकलून देतील.
मंगळवार, २० मे, २०१४
आता गद्दारांना थारा नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा