शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

नंदीबैलाचा विनोद

शिक्षणाच्या आयचा घो
        (१)

 मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी पाच वर्षांपूर्वी शिक्षणाच्या आयचा घो नावाचा चित्रपट काढला होता. त्यापासून कोणी काय बोध गेला हा संशोधनाचा आणि वेगळा विषय असला तरी आमच्या शिक्षण खात्याने अत्यंत विनोदी असा तुघलकी कारभार करून या चित्रपटाचा सिक्वल काढला आहे. फक्त या सिक्वलमध्ये प्रत्येक पात्र हे तुमच्या आमच्या घरातील प्रत्येकाचे मूल असणार आहे. याची देही याची डोळा ज्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे झाल्याचे पाहायचे आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट घडतो आहे. त्याचे निर्माते आहेत दस्तुरखुद शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कारभार करणारे सगळे कारभारी शिक्षण सचिव.
काय टाळकं चालवलं आहे आमच्या या शिक्षण खात्यानं? तर शाळेचे अभ्यासाचे दिवस कमी करून पाच दिवसांचा आठवडा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांना यापुढे शनिवार व रविवारी सुट्टी दिली जाणार आहे. लोक भारतीचे अध्यक्ष व आमदार कपिल पाटील यांनी मंत्रालयात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेवून पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी केली आणि नंदी बैलाप्रमाणे मुंडी हालवत शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहिर केला आहे. तसे लेखी आदेश शिक्षण सचिवांनी उपसंचालकांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे सर्वच शाळांना शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण सचिवांच्या डोक्यात काय राजकीय नेत्यांचे विचार भरले आहेत की दगडं? कसलाही विचार न करता सह्याजीरावाची भूमिका करून आदेश काढून मोकळे? एवढा ढ शिक्षण सचिव राज्याला लाभला हे या राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. दुर्दैवाने मुंबईतील वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे ही दुबळी आणि राजकीय नेत्यांच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. त्यामुळे सरकारच्या या धोरणाविरोधात एक अवाक्षर छापण्याचे धाडस त्यांच्यात नाही. आज आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते गेल्या दहा वर्षांत इतका ढ शिक्षणमंत्री आणि माठ शिक्षण सचिव जन्माला आला नसेल.
या विरोधात फार मोठे आंदोलन उभे राहण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम सरकारने चालवले आहे. भावी पिढी काय अनपढ, अडाणी आणि बेअक्कल करायचे व्रत शिक्षण विभागाने घेतले आहे? आठवीपर्यंत मुलांना नापास करायचे नाही. त्यांची परिक्षा घ्यायची नाही. शिक्षकांनी नीट शिकवायचे नाही. पालकांना वेठीस धरायचे. मुले शहाणी होणार कशी? आज अनुदानित आणि शासकीय शाळांची अत्यंत दुरावस्था आहे. पाचवी ते सातवीतल्या विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नाही. मुलांना नापास करायचे नाही हे तत्व बाळासाहेब थोरात यांनी आणले, त्यांचीच री राजेंद्र दर्डा यांनी ओढली. आता त्याच्या पुढचा मूर्खपणा विनोद तावडे यांच्या कारकीर्दीत होत आहे. मुलांना नापास करायचे नाही म्हणून त्यांना शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांची संपली काय? मग शिक्षकांचे पगारी अनुदान, पगारावरचा जो खर्च शासन करते तो कशासाठी? या मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या पुढेपुढे करण्यासाठी शिक्षकांची भरती केली जाते?
आपल्या राज्यात विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघ आहे. यामुळे मुलांचे शिक्षणाचे नुकसान होणार आहे. याची एकाही शिक्षक आमदाराला जाणिव नाही? कशासाठी तुम्हाला तिथे प्रतिनिधीत्व दिले आहे? आमदार म्हणून मिरवण्यासाठी तुम्हाला शिक्षक मतदारसंघातून पाठवले आहे? बिनकामाची भरती सगळी आहे. शिक्षकांच्या हक्काबद्दल हे शिक्षक आमदार भांडत असतात. पण शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल कधीही बोलत नाहीत. कोण एक कपिल पाटील नावाचे आमदार याबाबत आवाज उठवतात आणि त्यांचे ऐकून आमचे विनोद तावडे यांचे शिक्षण खाते कसलेही डोके न चालवता निर्णय घेते. पाच दिवसांचा आठवडा करून अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे काय? विनोद तावडे यांच्या बनावट डिग्रीचे प्रकरण काही दिवसांपूर्वी गाजले होते. त्यांचे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त नाही असा वाद सुरू होता. त्यामुळे सगळी शिक्षण व्यवस्थाच अमान्य करण्याची त्यांची प्रवृत्ती वाढली आहे काय? नव्या नियमाप्रमाणे शाळांनी शनिवार, रविवारची सुट्टी देऊन पाच दिवसांचा आठवडा केला तर शालेय शिक्षण विभागाची काहीही हरकत नाही. मात्र, शाळांनी नियमानुसार आखून दिलेल्या तासिका पूर्ण केल्या पाहिजेत, असा स्पष्ट निर्वाळा या विभागाचे सचिव नंदकुमार यांनी दिला आहे. दोन दिवस सुट्टी घेवून नक्की कोणाचा फायदा होणार आहे? राज्यातील सगळ्या शाळा पाच दिवसांच्या झाल्या तर नेमुन दिलेला अभ्यासक्रम कसा पूर्ण केला जाणार आहे? अभ्यासक्रमाचे एक शास्त्र आहे. नियोजन आहे. कोणत्या टर्ममध्ये किती अभ्यास असला पाहिजे, एकूण सुट्ट्या आणि असलेला अभ्यासक्रम याचे सविस्तर गणित आपण उद्याच्या अंकात वाचणार आहोत. पण आज किती सुट्टी मिळते त्यावर नजर टाकली तर लक्षात येईल की तब्बल सहा महिने शिक्षक फुकट पगार घेतात. मे महिन्याची किंवा उन्हाळी सुट्टी ही ५८ दिवस असते. दिवाळी सुट्टी ही १७ दिवस असते. इतर वार्षिक सणांच्या सुट्ट्यांची संख्या आहे १३. याशिवाय रविवारी आलेले सण वगळता येणार्‍या रविवारच्या ४५ सुट्ट्या होतात. असे १३३ दिवस शाळांना सुट्टी राहते. या दिवशी विद्यार्थी शाळेत येत नाहीत. याशिवाय घटक चाचण्या (यूनीट टेस्ट) एकूण ४ आणि दोन सत्र परिक्षा यामध्ये ६१ दिवस जातात. कारण परिक्षांच्या काळात शिकवले जात नाही. त्यामुळे वर्षांच्या ३६५ दिवसातील १९४ दिवस हे अभ्यास न शिकवता जातात. उरतात फक्त १७१ दिवस. म्हणजे प्रत्येक सत्रात ८५ दिवस हातात येतात. यामध्ये संपूर्ण अभ्यास कसा शिकवला जाणार? ही आजची परिस्थिती आहे. आता आणखी ५२ शनिवार सुट्टी पडली तर शिक्षणाचे किती वाटोळे होईल? जरा तरी अक्कल आहे काय? चालवा डोके? नीट विचार करा आणि पेटून उठा आता या शिक्षण खात्याविरोधात. हाकला या बिनकामाच्या माणसांना असे म्हणायची वेळ आली की नाही ते सांगा.
( शिक्षणाचे तास, किती अभ्यासक्रम किती दिवसात घ्यायचा याचे तपशिल उद्याच्या लेखात वाचा आणि नीट विचार करा. या गोष्टीला आज विरोध केला नाही तर उद्याची आपली पिढी आपल्या हातातून गेलेली असेल. अपूर्‍या ज्ञानाची असेल)
काय टाळकं चालवलं आहे आमच्या या शिक्षण खात्यानं? तर शाळेचे अभ्यासाचे दिवस कमी करून पाच दिवसांचा आठवडा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांना यापुढे शनिवार व रविवारी सुट्टी दिली जाणार आहे. लोक भारतीचे अध्यक्ष व आमदार कपिल पाटील यांनी मंत्रालयात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेवून पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी केली आणि नंदी बैलाप्रमाणे मुंडी हालवत शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहिर केला आहे. तसे लेखी आदेश शिक्षण सचिवांनी उपसंचालकांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे सर्वच शाळांना शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण सचिवांच्या डोक्यात काय राजकीय नेत्यांचे विचार भरले आहेत की दगडं? कसलाही विचार न करता सह्याजीरावाची भूमिका करून आदेश काढून मोकळे? एवढा ढ शिक्षण सचिव राज्याला लाभला हे या राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. दुर्दैवाने मुंबईतील वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे ही दुबळी आणि राजकीय नेत्यांच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत. त्यामुळे सरकारच्या या धोरणाविरोधात एक अवाक्षर छापण्याचे धाडस त्यांच्यात नाही. आज आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते गेल्या दहा वर्षांत इतका ढ शिक्षणमंत्री आणि माठ शिक्षण सचिव जन्माला आला नसेल. या विरोधात फार मोठे आंदोलन उभे राहण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम सरकारने चालवले आहे. भावी पिढी काय अनपढ, अडाणी आणि बेअक्कल करायचे व्रत शिक्षण विभागाने घेतले आहे? आठवीपर्यंत मुलांना नापास करायचे नाही. त्यांची परिक्षा घ्यायची नाही. शिक्षकांनी नीट शिकवायचे नाही. पालकांना वेठीस धरायचे. मुले शहाणी होणार कशी? आज अनुदानित आणि शासकीय शाळांची अत्यंत दुरावस्था आहे. पाचवी ते सातवीतल्या विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नाही. मुलांना नापास करायचे नाही हे तत्व बाळासाहेब थोरात यांनी आणले, त्यांचीच री राजेंद्र दर्डा यांनी ओढली. आता त्याच्या पुढचा मूर्खपणा विनोद तावडे यांच्या कारकीर्दीत होत आहे. मुलांना नापास करायचे नाही म्हणून त्यांना शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांची संपली काय? मग शिक्षकांचे पगारी अनुदान, पगारावरचा जो खर्च शासन करते तो कशासाठी? या मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या पुढेपुढे करण्यासाठी शिक्षकांची भरती केली जाते? आपल्या राज्यात विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघ आहे. यामुळे मुलांचे शिक्षणाचे नुकसान होणार आहे. याची एकाही शिक्षक आमदाराला जाणिव नाही? कशासाठी तुम्हाला तिथे प्रतिनिधीत्व दिले आहे? आमदार म्हणून मिरवण्यासाठी तुम्हाला शिक्षक मतदारसंघातून पाठवले आहे? बिनकामाची भरती सगळी आहे. शिक्षकांच्या हक्काबद्दल हे शिक्षक आमदार भांडत असतात. पण शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल कधीही बोलत नाहीत. कोण एक कपिल पाटील नावाचे आमदार याबाबत आवाज उठवतात आणि त्यांचे ऐकून आमचे विनोद तावडे यांचे शिक्षण खाते कसलेही डोके न चालवता निर्णय घेते. पाच दिवसांचा आठवडा करून अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे काय? विनोद तावडे यांच्या बनावट डिग्रीचे प्रकरण काही दिवसांपूर्वी गाजले होते. त्यांचे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त नाही असा वाद सुरू होता. त्यामुळे सगळी शिक्षण व्यवस्थाच अमान्य करण्याची त्यांची प्रवृत्ती वाढली आहे काय? नव्या नियमाप्रमाणे शाळांनी शनिवार, रविवारची सुट्टी देऊन पाच दिवसांचा आठवडा केला तर शालेय शिक्षण विभागाची काहीही हरकत नाही. मात्र, शाळांनी नियमानुसार आखून दिलेल्या तासिका पूर्ण केल्या पाहिजेत, असा स्पष्ट निर्वाळा या विभागाचे सचिव नंदकुमार यांनी दिला आहे. दोन दिवस सुट्टी घेवून नक्की कोणाचा फायदा होणार आहे? राज्यातील सगळ्या शाळा पाच दिवसांच्या झाल्या तर नेमुन दिलेला अभ्यासक्रम कसा पूर्ण केला जाणार आहे? अभ्यासक्रमाचे एक शास्त्र आहे. नियोजन आहे. कोणत्या टर्ममध्ये किती अभ्यास असला पाहिजे, एकूण सुट्ट्या आणि असलेला अभ्यासक्रम याचे सविस्तर गणित आपण उद्याच्या अंकात वाचणार आहोत. पण आज किती सुट्टी मिळते त्यावर नजर टाकली तर लक्षात येईल की तब्बल सहा महिने शिक्षक फुकट पगार घेतात. मे महिन्याची किंवा उन्हाळी सुट्टी ही ५८ दिवस असते. दिवाळी सुट्टी ही १७ दिवस असते. इतर वार्षिक सणांच्या सुट्ट्यांची संख्या आहे १३. याशिवाय रविवारी आलेले सण वगळता येणार्‍या रविवारच्या ४५ सुट्ट्या होतात. असे १३३ दिवस शाळांना सुट्टी राहते. या दिवशी विद्यार्थी शाळेत येत नाहीत. याशिवाय घटक चाचण्या (यूनीट टेस्ट) एकूण ४ आणि दोन सत्र परिक्षा यामध्ये ६१ दिवस जातात. कारण परिक्षांच्या काळात शिकवले जात नाही. त्यामुळे वर्षांच्या ३६५ दिवसातील १९४ दिवस हे अभ्यास न शिकवता जातात. उरतात फक्त १७१ दिवस. म्हणजे प्रत्येक सत्रात ८५ दिवस हातात येतात. यामध्ये संपूर्ण अभ्यास कसा शिकवला जाणार? ही आजची परिस्थिती आहे. आता आणखी ५२ शनिवार सुट्टी पडली तर शिक्षणाचे किती वाटोळे होईल? जरा तरी अक्कल आहे काय? चालवा डोके? नीट विचार करा आणि पेटून उठा आता या शिक्षण खात्याविरोधात. हाकला या बिनकामाच्या माणसांना असे म्हणायची वेळ आली की नाही ते सांगा.( शिक्षणाचे तास, किती अभ्यासक्रम किती दिवसात घ्यायचा याचे तपशिल उद्याच्या लेखात वाचा आणि नीट विचार करा. या गोष्टीला आज विरोध केला नाही तर उद्याची आपली पिढी आपल्या हातातून गेलेली असेल. अपूर्‍या ज्ञानाची असेल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: