- शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेली ही घोषणा इतकी हास्यास्पद आहे की त्यांना सांगावेसे वाटते जन्म दाखल्या बरोबरच प्रत्येक बालकाला दहावी पास असल्याचे प्रमाणपत्र देण्याची योजना शिक्षण खात्याने सुरू करावी.
- विनोद तावडे यांनी शिक्षण खात्याचा कारभार सुरू केल्यावर त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. कॉंग्रेस सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा यांनी केलेली घाण ते काढतील अशी अपेक्षा होती. पण विनोद तावडे हे त्यांच्यापुढे एक पाउल पुढे टाकायला निघाले आहेत. कॉंग्रेसने आठवी पर्यंत मुलांना नापास करायचे नाही असे आदेश काढून बेरोजगार आणि बिनडोक मुलांचा कारखाना काढला. त्या कारखान्याचे विस्तारीकरण करून विनोद तावडे यांनी शिक्षणाचाच विनोद करून टाकला आहे.
- मुलगा शिकला काय, नाही शिकला काय काही फरक पडणार नाही. लग्नात मुलगा किमान दहावी शिकलेला आहे हे सांगण्यासाठी जन्माबरोबरच दहावी पासचे दाखले देण्याचे काम आता विनोद तावडे यांनी सुरू करावे असे वाटते.
- अर्थात ही घोषणा विनोद तावडे यांनी केलेली आहे. ती प्रत्यक्षात अमलात येईलच असे नाही. कारण गेल्यावर्षीही त्यांनी बाटू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापिठाची स्थापना करणार असल्याचे सांगितले होते. त्या गोष्टीचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला आहे. घोषणा केलेले काहीही करायचे नाही आणि नव्या नव्या घोषणा देवून सामान्यांना संभ्रमात पाडायचे एवढेच विनोद आता शिक्षणमंत्री करताना दिसत आहेत असे वाटते.
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५
जन्माच्या दाखल्याबरोबरच दहावीचे प्रमाणपत्र मिळावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा