जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेकडून पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगामला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हटले जाते. इथे भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. भारताच्या नंदनवनाला चाळीस वर्षांपूर्वी खांडववनाची अवस्था आली होती. पण कलम ३७० हटवल्यानंतर इथली परिस्थिती बदलली आणि पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले असतानाच धर्मांध क्रूर प्रवृत्तीच्या जेहादींनी पुन्हा घुसखोरी करून दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली. अर्थात, याला भारतातून प्रोत्साहन देणारे काही महाभागही आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धर्म, जात आणि नाव विचारून, पंतप्रधान मोदींवर टीका करत या दहशतवाद्यांनी गोळीबार करून निष्पाप पर्यटकांची हत्या केली. त्यांना चांगली अद्दल घडवण्याची ती वेळ आलेली आहे.
इंडिया आघाडीचा विशेषत: काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा जम्मू कश्मीर निवडणुकीत अजेंडाच होता की, पुन्हा ३७० कलम लागू करू. त्यामुळे या शक्तींचा पाठिंबा या दहशतवादी गटांना असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. संसदेवरील हल्ल्यातील अफझल गुरूची पाठराखण करणारा कन्हैय्या आणि त्याला दत्तक घेऊन काँग्रेसचा स्टार प्रचार करणाºया राहुल गांधींची प्रवृत्ती ही अशा दहशतवादाला छुपा पाठिंबा देण्याची आहे हे अनेकदा दिसून आलेले आहे. अशाच फुटीरतावादी फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांच्या मांडीला मांडी लावून भारतविरोधी धोरण ठेवणारे आपले स्वकीय आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे सर्वात प्रथम उमर अब्दुल्लांचे सरकार बरखास्त केले पाहिजे. त्यांचे समर्थन करणाºया इंडिया आघाडीतील घटक पक्षांना तंबी देण्याची आवश्यकता आहे. या स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केल्याशिवाय पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही. सातत्याने फितुरीने भारतीय इतिहासात घात केलेला आपण पाहिला आहे. त्यामुळे या फितुर आणि फुटीरतावाद्यांचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे. त्यानंतर घुसून मारले पाहिजे. आता संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याची हीच ती वेळ आहे. पाकव्याप्त काश्मीर काढून घेण्याची ही योग्य वेळ आहे. त्याचप्रमाणे बलुचिस्तान पाकिस्तानपासून मुक्त करून तिथल्या नागरिकांना संरक्षण देण्याची कारवाई आता करावीच लागेल.
प्यारसे रहोगे तो खीर देंगे, कश्मीर मागोगे तो चीर देंगे, ही घोषणा आदरणीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी दिली होती. इंडिया आघाडीने भरपूर खीर खायला घातली आहे, त्यामुळे आता घुसून तोडायची वेळ आलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सहनशिलतेलाही काही मर्यादा असते. विरोधी पक्षांनी यावरून राजकारण सुरू केले आहे, त्यांना कसलीही जबाबदारी नाही. त्यामुळे संजय राऊतांसारखी फुटकळ माणसे सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. विजय वडेट्टीवारसारखे काँग्रेसचे नेते सरकारने चूक कबूल करावी असे बेताल वक्तव्य करतात, याची ऐकतानाच लाज वाटते. या गोष्टींचे कसले राजकारण करता? मुंबईत २६/११ला हल्ला झाला होता तेव्हा काँग्रेसने चूक कबूल केली होती का? तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी उभे होते. पण आत्ताच्या विरोधकांना देशहिताचे काहीही पडलेले नाही. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे की, या लोकांची तोंडे कायमची बंद होतील अशी कठोर कारवाई पाकिस्तानवर केली पाहिजे. त्यामुळे आता जोरदार हल्ला करून दहशतवादापासून काश्मीर मुक्त केले पाहिजे. काश्मीरचा तुकडा पाडणाºया प्रवृत्तीचे समर्थन असणाºया, काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लादण्याची इच्छा असणाºया काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार बरखास्त केले पाहिजे. देशविरोधात वक्तव्ये करणाºया इंडिया आघाडीच्या नेत्यांना तंबी देण्याची वेळ आलेली आहे.
संकट काळात सर्वांनी एक व्हायचे असते आणि शत्रूशी सामना करायचा असतो. पण याचे भान न राखता विरोधी पक्ष टीका करण्यात धन्यता मानत आहेत. दीर्घकाळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे अशा घटनांचे राजकारण करणे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. अशा विरोधकांना आपल्या ठोस कृतीतून पंतप्रधानांनी उत्तर देण्याची हीच ती वेळ आहे. आता कसल्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता पाकला उत्तर देण्याची हीच ती वेळ आहे. इस्राईल, रशिया ज्याप्रमाणे आपल्या शेजारी देशांना धडा शिकवते त्याचे अनुकरण करण्याची हीच ती वेळ आहे. उमर अब्दुल्ला यांनी काश्मीरच्या निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याचा शहानिशा करण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये फडकणारा तिरंगा त्यांना खुपतो आहे. म्हणूनच आता वेळ आलेली आहे की, पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याची हीच ती वेळ आहे.
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ७ पर्यटकांचा मृत्यू झाला. डोंबिवली, पुणे, पनवेलमधील या पर्यटकांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. ही झालेली जखम कधीही भरून येणारी नाही. त्यामुळे त्यासाठी घुसून, वेचून, टिपून सगळ्या दहशतवाद्यांना मारणे हाच उपाय आहे. ज्याप्रमाणे नक्षलवाद्यांना संपवण्यात यश येत आहे, त्याप्रमाणे काश्मीरमधील दहशतवादी संपवण्यासाठी विशेष आॅपरेशनची आता वेळ आलेली आहे. कन्हैय्या कुमारसारखे काँग्रेस नेत्यांना दहशतवाद्यांचा पुळका येणार असेल तर अशा प्रवृत्तींनाही धडा शिकवावा लागेल. काश्मीरमधील दहशतवाद्यांचे प्रेरणास्थान असलेल्या जेएनयूसारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जेएनयूसारख्या संस्थांमधून अफझल गुरूला शहीद ठरवले जाते, त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. अशा दहशतवाद्यांचे समर्थन करणाºया संस्थांवर कारवाई करून स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करावा लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा