मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

राजकीय सहमती कायम राहिली पाहिजे


पहलगाम दहशतवादी हल्ला ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा विरोधी पक्ष ‘कोणत्याही प्रत्युत्तरात्मक कारवाईसाठी’ मोदी सरकारसोबत उभा असल्याचे दिसून येते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाºया विरोधी पक्षांच्या दृष्टिकोनात हा एक मोठा बदल आहे. सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राजकारणासाठी हे निश्चितच एक सकारात्मक लक्षण आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सरकार बहुमताने स्थापन होते, परंतु सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या राहतात. राहुल गांधी परिपक्व होत आहेत. पण त्यांनी त्यांच्या अवतीभवती राहणाºयांपासून सावध राहिले पाहिजे. ज्याप्रकारे काँग्रेसचे फुटकळ नेते विजय वडेट्टीवारांसारखे बरळतात त्यांना समजावले पाहिजे. तसेच आपल्या आघाडीतील घटक पक्षातील संजय राऊतांसारख्या बेछूट बेलगाम आरोप करणाºयांपासून सावध राहिले पाहिजे.


आपापल्या राजकीय विचारसरणींवर टिकून राहूनही त्यांनी राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर एकमताने पुढे जावे, जेणेकरून देश आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकेल. कायदेमंडळांचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर जास्त मानली जाते, परंतु सत्य हे आहे की, एका हाताने टाळी वाजत नाही. पक्षीय राजकारणामुळे प्रेरित अवांछित संघर्षासाठी कोणत्याही एका पक्षाला जबाबदार धरता येणार नाही. मागील लोकसभेच्या शेवटच्या सत्रांमध्ये आणि नवीन लोकसभेच्या आतापर्यंतच्या अधिवेशनांमध्ये कायदेविषयक कामाच्या आकडेवारीवर काही दावे केले जात असले तरी, सत्य हे आहे की अर्थसंकल्पापासून ते महत्त्वाच्या विधेयकांपर्यंत सर्व गोष्टींवरील चर्चा राजकीय संघर्षात अडकल्या आहेत. केवळ विरोधासाठी विरोध करणारी प्रवृत्ती, चर्चा न करता सभागृहाबाहेर मीडियासमोर होणारी नौटंकी थांबली पाहिजे. अभ्यासोनी प्रकटावे अशी भूमिका असली पाहिजे.

गेल्या लोकसभेत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून विक्रमी संख्येने सदस्यांचे निलंबन हे विरोधकांची गोंधळ घालण्याची सवय आणि सत्ताधारी पक्षाची असहिष्णुता किती प्रमाणात वाढली आहे, याचा मोठा पुरावा आहे. विडंबन म्हणजे जेव्हा अनेक विरोधी सदस्य निलंबनामुळे सभागृहाबाहेर होते, तेव्हा व्यापक परिणाम असलेली अनेक विधेयके काही मिनिटांतच मंजूर झाली. मोदी सरकारच्या आधीच्या मनमोहन सरकारच्या काळातही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील संबंध आणि संसदीय चर्चेची पातळी आदर्श नव्हती. मनमोहन सरकारच्या काळात संसदेतील बहुतेक वेळ घोटाळ्यांवरून गोंधळात घालवला जात असे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील ताणलेले संबंध संसदीय लोकशाही आणि देशाच्या हिताचे नाहीत. आपल्या नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, राजकारणात ‘मतभेद’ स्वाभाविक आहेत, परंतु ‘मनभेदांना’ जागा नसावी.


गेल्या १०-११ वर्षांत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील ‘मनाभेद’ राजकीय वैरात रूपांतरित झाले आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकमेकांच्या नेतृत्वावर केलेले तीक्ष्ण वैयक्तिक टीका हे पुरावे आहेत की, राजकीय विरोध आता वैयक्तिक कटुतेत बदलला आहे. ही कटुता मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात गुजरातमध्ये झालेल्या दंगलींपासून सुरू झाली. वास्तविक स्वातंत्र्यानंतर गेल्या अकरा वर्षांत घोटाळा नसलेले, भ्रष्टाचार विरहीत सरकार आहे ही देशासाठी चांगली बाब आहे. पण घोटाळ्यांमुळे सत्तेपासून दूर फेकले गेलेले आकांडतांडव करून संसदेचे कामकाज होऊ देत नाहीत, तेव्हा प्रश्न पडतो की हेच का ते लोक आहेत, जे संविधान धोक्यात आले म्हणून बोलत होते? हेच तर संविधानाप्रमाणे कामकाज चालू देत नाहीत हे जनता पाहत आहे.

यूपीए सरकारच्या काळात मोदी आणि अमित शाह यांच्यावर दंगलींसाठी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात आलीच नाही तर मोदींना ‘मौत का सौदागर’ असेही म्हटले गेले. तेव्हापासून सुरू झालेल्या वैयक्तिक वैमनस्याचा परिणाम असा झाला की, सोनिया आणि राहुल मोदींचे लक्ष्य बनले. सोनियांना ‘राजमाता’ आणि राहुल गांधींना ‘शहजादा’ असे संबोधले गेले. हे प्रकरण एकतर्फी नव्हते. राहुल ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणा देत राहिले आणि कधीकधी नीरव मोदीच्या संदर्भात मोदी आडनावावर टीका करून स्वत:वर मानहानीचे खटले दाखल करत राहिले.


भाजप आणि काँग्रेसमधील संबंधांमध्ये कटुता अधिक दिसून येते, परंतु सत्ताधारी पक्षाचे इतर विरोधी पक्षांशी असलेले संबंधही सौहार्दपूर्ण नाहीत. ईडी, सीबीआय, आयकर यांसारख्या केंद्रीय संस्थांच्या ‘राजकीय गैरवापर’ विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले, पण त्यांची निराशा झाली. असे नाही की पूर्वी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत, परंतु अशी परिस्थिती क्वचितच पाहायला मिळाली आहे. भारताच्या संसदीय इतिहासात, धोरणात्मक मतभेद असूनही आणि संकटाच्या वेळी सरकारची अप्रत्यक्ष मदत असूनही देशाच्या हितासाठी एकमताने मार्ग काढण्याची उदाहरणे आहेत, परंतु ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण एकमेकांना देशविरोधी मानण्याच्या मानसिकतेपासून मुक्त असतो आणि परस्पर कटुतेऐवजी आदराची भावना असते.

वेगवेगळ्या पक्षांचे असूनही आणि अनेक मुद्द्यांवर धोरणात्मक मतभेद असूनही, पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चंद्रशेखर आणि विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी परस्पर आदरयुक्त संबंधांद्वारे मांडलेले संवाद आणि समन्वयाचे उदाहरण पक्षीय राजकारणात मार्गदर्शक ठरू शकते. गेल्या दशकातील राजकीय परिस्थिती त्याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसते. पाकिस्तान आणि चीनशी असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधांपासून ते कोविड आणि ट्रम्पच्या टॅरिफ वॉरपर्यंत प्रत्येक आघाडीवरील आव्हानांसाठी विरोधी पक्ष सरकारला जबाबदार धरतो, तर अशा प्रकरणांमध्ये परस्पर सल्लामसलतीद्वारे धोरणे आणि रणनीती आखण्याची गरज आहे. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात आणलेल्या कोणत्याही विधेयकाला विरोधकांनी फारसे समर्थन दिलेले नाही. विरोधकांनी प्रत्येक कायदा ‘जनविरोधी’ असल्याचे म्हटले आणि तो मंजूर होताच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.


यातील एकही विधेयक सार्वजनिक हिताचे नव्हते का? कटू राजकीय संघर्षांच्या या दीर्घ मालिकेच्या पार्श्वभूमीवर, पहलगाम मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकाच सुरात बोलत असल्याचे ऐकणे एक सुखद आश्चर्य होते, परंतु देशाच्या हितासाठी या अपवादाला परंपरा बनवण्याची आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमताने काम करण्याची गरज आहे. पहलगाम घटनेवर निराधार विधाने करणाºया आणि त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीत झालेला एकमत बिघडत चाललेल्या पक्षांच्या नेत्यांना लगाम लावावा, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. टीव्ही चॅनेलवरील चर्चेत सर्व पक्षांचे प्रवक्ते पहलगामवर झालेला राजकीय एकमत कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुन्हा एकमेकांवर हल्ला करण्यास तयार आहेत. अर्थातच पहलगाममधील सुरक्षेतील त्रुटींसाठी उत्तरे मागण्याचा विरोधकांना राजकीय अधिकार आहे, कारण प्रत्यक्षात चूक झाली आहे, परंतु संवाद आणि समन्वयाची प्रक्रिया सहमतीसाठी सुरू राहिली पाहिजे. आपल्याकडे बहुपक्षीय लोकशाही आहे. प्रत्येक पक्ष आणि नेता केवळ सत्तेसाठी राजकारण करतो, परंतु हे कधीही विसरता कामा नये की, राजकारण देशासाठी असले पाहिजे, देशाच्या एकतेत बाधा येणार नाही याची काळजी विरोधकांनी घेतली पाहिजे आणि जबाबदारीने वागले पाहिजे.

युगादी (अक्षय्य तृतीया)


वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा भारतीय हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपली एकूणच संस्कृती ही कृषिप्रधान असल्याने शेतकºयांच्या दृष्टीने हा शेतीचा मुहूर्त करणारा आणि चांगले पीक यावे म्हणून असलेला उत्तम मुहूर्त आहे. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. बरेचसे शब्द मराठी ग्रामीण भाषेत बोलताना त्याचे अपभृंश होतात, त्यातून कोणी आकीती म्हणते. पण हा एक अत्यंत चांगला आणि पवित्र असा दिवस मानला जातो.


या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. १८ पुराणे लिहून झाल्यानंतर आता आपले काम पूर्ण झाले असे समजून कामातून निवृत्ती घेण्याचा विचार व्यासांनी केला होता. परंतु जोपर्यंत महाभारत लिहित नाही आणि त्यातील गीतोपदेश जगापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला पूर्णत्व येणार नाही असे भगवंतांनी त्यांना सांगितले. परंतु आता मी थकलो आहे, लिहिण्याची ताकद नाही असे त्यांनी भगवंतांना सांगितले. तेव्हा भगवंतांनी तुला उत्तम लेखनिक देतो असे सांगितले आणि श्री गणेशाला त्यांच्याकडे पाठवले. श्री गणेश हा पहिला स्टेनो टायपीस्ट, पहिला संगणक, पहिला लेखनिक आणि वेगाने काम करणारा पहिला फॉर्म्युला आहे. त्या श्रीगणेशाने व्यासकृत महाभारत लिखाणास सुरुवात केली तो हा दिवस.

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.


वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.

कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (‍अविनाशी) होते.’ या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.


जैन धर्मातही या दिवसाचे खूप महत्त्व आहे. भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते व त्यानंतर ते एकदा ग्रहणासाठी निघाले, परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजून पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगºयाची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात. हरभºयांनी ओटी भरली जाते. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी चैत्रगौर उठवली जाते आणि पुन्हा देवघरात आणली जाते.


अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाºया काळाला महायुग असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा १२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. बलरामाचे शस्त्र हे नांगर आहे. त्यामुळे तो शेतकºयांचा देव आहे. मातीत आळी घालणे व पेरणी ही कामे आवर्जून या दिवशी करतात. अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापुरात आषाढात बेंदूर असतो. त्यामुळे आकीतीला आळं अन् बेंदराला फळं हे शेतकºयांचे नियोजन असते. यादिवशी घातलेल्या वेलांना बेंदराच्या दरम्यान फळं येतात. काकडी, भोपळा, दोडका, दुधीभोपळा याचे विपूल पीक येते. या दिवशी घातलेल्या लाल भोपळ्याच्या वेलाला आलेले भोपळे वर्षभर विविध सणांसाठी, देवदिवाळीला घारगे बनवायला वापरले जातात.


महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

याशिवाय हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरड्या इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.


या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कायार्चे फळ अक्षय्य (न संपणारे) असे मिळते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाºया देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाºया त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही.

- प्रफुल्ल फडके/संस्कृती


९१५२४४८०५५

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

आता माफी नाही


पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले, ती मानवतेला कलंकित करणारी अशी क्रूर घटना आहे, ज्याचे उदाहरण क्वचितच सापडते. जिहादी दहशतवाद्यांनी यापूर्वी अनेक घटना घडवल्या आहेत, परंतु किमान भारतात हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा लोकांचा धर्म कळल्यानंतर मारले गेले आहे.


अर्थात हे स्पष्ट आहे की, दहशतवादी धार्मिक कट्टरतेने प्रेरित होते. दहशतवाद्यांनी केलेल्या अशा हत्यांमागील एक हेतू भारतात हिंदू-मुस्लीम फूट निर्माण करणे होता. भारतातील लोकांनी आपला आणि पाकिस्तानचा हेतू पूर्ण होऊ न देण्यासाठी तयारी केली आहे हे चांगले आहे. पहलगाम घटनेचा ज्या प्रकारे निषेध केला, काळ्या पट्ट्या बांधून नमाज पठण केले आणि या घटनेने इस्लामला बदनाम केले आहे असे म्हटले, ते स्वागतार्ह आहे. भविष्यातही देशात सलोखा राखला जाईल याची खात्री करणे ही सर्व समुदायांची जबाबदारी आहे.

पहलगामची घटना ही त्या काही दहशतवादी घटनांसारखी आहे, ज्यांनी दहशतवादाविषयी जगाचा विचार बदलला. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी स्थानिक दहशतवाद्यांसह ही घटना घडवून आणली, जेणेकरून काश्मीरचे वातावरण बदललेले नाही आणि तिथे शांतता परत येत नाही हे दाखवता येईल. काश्मीरमधील सामान्य होत असलेली परिस्थिती पाकिस्तानला आवडली नाही आणि त्यांनी पहलगाम हल्ला घडवून आणण्याचा कट रचला. पाकिस्तानमधील दहशतवादी काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत राहतात.


काहींना पकडले जाते, काहींना मारले जाते आणि काही काश्मीरच्या दहशतवाद्यांमध्ये सामील होऊन दहशतवादाला प्रोत्साहन देतात. ही प्रक्रिया थांबत नाहीये, कारण काश्मीरमध्ये अजूनही काही लोक आहेत, जे जिहादी मानसिकतेने ग्रस्त आहेत आणि पाकिस्तानातील दहशतवादाच्या मदतीने धर्माच्या नावाखाली काश्मीर मुक्त करतील असा भ्रम आहे. म्हणूनच ते दहशतवादाच्या मार्गावर चालत राहतात. यासाठी पाकिस्तान त्यांना केवळ भडकावत नाही, तर शस्त्रास्त्रे आणि प्रशिक्षणासह सर्व प्रकारची मदतदेखील करतो. या मूठभर लोकांना ओळखणे तेव्हाच शक्य असते, जेव्हा काश्मीरमधील लोक उघडपणे त्यांच्या विरोधात उभे राहतात. पहलगाम घटनेनंतर अनेक लोक उभे राहिले, परंतु हे देखील सत्य आहे की, पर्यटकांवर कहर करणारे दहशतवादी लपण्यात यशस्वी झाले. शेवटी, कोणीतरी त्यांना मदत केली असेल. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय त्यांची ही मजल गेलेली नाही.

भारत सरकार देशाला आणि जगाला सतत संदेश देत होते की, काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत आहे. यासाठी तेथे जी-२० परिषद आणि विधानसभा निवडणुकांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात होते, परंतु काश्मीरमध्ये सर्व काही सामान्य नव्हते. तेथे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांच्या कारवाया सुरूच होत्या. म्हणूनच तेथे दहशतवादी घटना घडत होत्या, ज्यामध्ये सैन्यालाही लक्ष्य केले जात होते. या घटनांच्या तळाशी जाण्याची गरज होती. पहलगाम घटनेवरून असे दिसून येते की, काश्मीरमधील काही दहशतवादी घटक शांततेच्या बाजूने असल्याचे भासवू लागले होते, ज्यांना आर्थिक फायद्यांमुळे पर्यटकांच्या आगमनाची कोणतीही अडचण नव्हती, परंतु ते भारताशी असलेले शत्रुत्व आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणे सोडत नव्हते. अशा सर्व घटकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक होते. दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्यानंतरही, दहशतवादाच्या प्रत्येक समर्थकाला निवडकपणे तोडून टाकायला हवे होते, जेणेकरून ते दररोज दोन ते अडीच हजार पर्यटक येत असलेल्या पहलगाममध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था का केली गेली नाही? पहलगामपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानने पुरस्कृत केलेल्या दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यात आले. उरी येथील हल्ल्यानंतर सीमेपलीकडे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर हवाई हल्ला करण्यात आला. भारताच्या या लष्करी कारवायांपासून पाकिस्तानने धडा घेतला नाही. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली ते पुन्हा आपल्या जुन्या मार्गांवर परतले आहेत.


भारताने सिंधू पाणी करार स्थगित करून आणि इतर निर्णय घेऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने म्हटले आहे की, या करारातून माघार घेणे म्हणजे युद्ध पुकारण्यासारखे आहे. सध्याच्या रचनेत, पाकिस्तानला जाणारे पाणी ताबडतोब थांबवणे शक्य नाही, परंतु भारत त्यासाठी वचनबद्ध आहे आणि तयारीदेखील करत आहे. पाकिस्तानमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत भारताला पाकिस्तानवर दबाव कायम ठेवावा लागेल. पाकिस्तानने हे समजून घेतले पाहिजे की, भविष्यात परिस्थिती काहीही असो, त्याला भारताकडून पूर्वीइतके पाणी मिळणार नाही.

पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची धमकीदेखील दिली आहे, ज्याचा त्याने कधीही आदर केला नाही. या कराराच्या विरोधात जाऊन, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत राहिला, नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत राहिला आणि दहशतवाद्यांना घुसखोरी करत राहिला. शिमला करारानंतरही कारगिलमध्ये घुसखोरी झाली आणि कोणाला माहीत आहे किती दहशतवादी हल्ले झाले. जर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला तर भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला नियंत्रण रेषेवरून जुन्या आंतरराष्ट्रीय सीमेवर परत ढकलू शकते. लक्षात ठेवा की, हा भारतीय संसदेचा ठराव आहे की व्याप्त काश्मीर परत घेतला जाईल.


पहलगामची घटना इतकी भयानक आहे की, तिचा बदला घेतला जाईल हे निश्चित आहे. तो सर्जिकल स्ट्राईकच्या स्वरूपात घेण्यात येईल की पाकिस्तानचे कंबरडे मोडणारी मोठी लष्करी कारवाई होईल की इतर कोणत्याही स्वरूपात हे काळच सांगेल, परंतु पहलगाममध्ये झालेला नरसंहार विसरता येणार नाही आणि विसरता कामा नये. पाकिस्तानला माफ करता येणार नाही. इतकेच नाही, कारण पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानच्या जनरल, नोकरशहा आणि राजकारण्यांनी दिलेला प्रतिसाद अश्लील, चिथावणीखोर, दहशतवादाचे उदात्तीकरण करणारा आणि निर्लज्जपणे त्याचे समर्थन करणारा होता.

 जागतिक व्यापार संघटनेचे पुनर्वसन आवश्यक


दुसºया महायुद्धानंतर जागतिक नेत्यांनी समान अटींवर व्यापार करणाºया भविष्याची कल्पना केली. यासाठी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली, जी जागतिक व्यापार सुलभ करण्यासाठी, व्यापार विवाद सोडवण्यासाठी आणि व्यापार धोरणांचे नियमन करण्यासाठी काम करते. WTO करारांच्या तरतुदी विकसनशील देशांना विशेष अधिकार देतात. अशा परिस्थितीत न्यायाचे काम करणारी जागतिक व्यापार संघटना ही कमकुवत झालेली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संघटनेचे अस्तित्व मर्यादित केल्याने जागतिक व्यापार अस्ताव्यस्त होताना दिसत आहे. यासाठी जागतिक व्यापार संघटनेचे पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे.


उदाहरणार्थ, भारतासारखे विकसनशील देश काही उद्योगांमध्ये उच्च टॅरिफ (आयात शुल्क) ठेवू शकतात. त्या बदल्यात विकसित देशांना बौद्धिक संपदा हक्क, सेवा व्यापार उदारीकरण आणि कृषी नियमांमध्ये सवलती देण्यात आल्या. ही परिस्थिती श्रीमंत देशांसाठी अधिक फायदेशीर आहे. सध्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने टॅरिफ वॉर सुरू केले आहे, ज्यामुळे भू-राजकीय तापमान वाढत आहे. टॅरिफ वॉर कोणत्याही देशाच्या हिताचे काम करणार नाही, अगदी अमेरिकेचेही नाही. यामुळे जागतिक व्यापारात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होत आहे, ज्याचा परिणाम विविध देशांच्या अर्थव्यवस्थांवरही होत आहे.

चांगली गोष्ट अशी आहे की, अमेरिका भारतासह काही देशांशी द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करत आहे. असा करार करणारा भारत हा पहिला देश बनण्याची शक्यता आहे. जर सर्व देशांना अमेरिकेसोबत स्वतंत्र व्यापार करार करावे लागले तर जग जागतिक व्यापार व्यवस्था तयार होण्यापूर्वी जिथे होते तिथे परत येईल. पुढे काहीही झाले तरी, जर ट्रम्प यांनी त्यांच्या मनमानी टॅरिफ धोरणाला लगाम लावला नाही, तर जगातील आर्थिक संकट वाढेलच, पण अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा नाराही पोकळ ठरेल.


ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ लादण्याचे परिणाम भूतकाळातील अनुभवांवरून समजू शकतात. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते. चीनने याबद्दल डब्ल्यूटीओकडे तक्रार केली. अशा व्यापार वादांचे निराकरण करण्यासाठी डब्ल्यूटीओकडे अपील प्रक्रिया आहे, ज्यामध्ये न्यायाधीश त्यांचे निर्णय देतात, परंतु अमेरिकेने या न्यायाधीशांच्या नियुक्तीवर बंदी घालून वाद निवारण प्रणालीला अपंग केले, ज्यामुळे डब्ल्यूटीओद्वारे पूर्वी सोडवल्या जाणाºया जागतिक व्यापार वादांची संख्या आता तीन पटीने कमी झाली आहे. यामुळे १६६ सदस्य देश असलेल्या जागतिक व्यापार संघटनेबद्दल असे म्हटले जात होते की, ट्रम्प यांनी या संस्थेचे दातच काढून घेतले आहेत.

डब्ल्यूटीओचे प्रभावी अस्तित्व नसल्याने, शुल्कांचे हानिकारक चक्र आता शुल्क युद्धाचे रूप धारण करत आहे. शुल्क युद्धामुळे व्यापार महाग होईल आणि ग्राहकांना उपलब्ध असलेल्या वस्तू महाग होतील. अमेरिकन ग्राहकांनाही तोटा सहन करावा लागेल. जर डब्ल्यूटीओ मजबूत झाला नाही तर चीन, कॅनडा इत्यादी देशांनी प्रतिशोधात्मक शुल्क लादल्यामुळे अमेरिकन कुटुंबांना दरवर्षी सुमारे १ लाख रुपये अधिक खर्च करावे लागतील, १८० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यापार प्रभावित होईल आणि अमेरिकेतील सुमारे ३.३ लाख नोकºया जाऊ शकतात.


ट्रम्प हे समजू शकत नाहीत की डब्ल्यूटीओ केवळ अमेरिकन लोकांच्या हिताचे रक्षण करत नाही तर अमेरिकन ग्राहकांना धोकादायक आर्थिक परिणामांपासून देखील वाचवते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की २००२ मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पेनसिल्व्हेनिया आणि ओहायो सारख्या राज्यांमध्ये मते मिळविण्यासाठी स्टीलवर शुल्क लादले होते, त्या बदल्यात युरोपियन युनियनने देखील अमेरिकन वस्तूंवरील कर वाढवला होता, ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांचे नुकसान झाले.

अमेरिकेतील लोकांच्या नोकºया गेल्या आणि स्टीलवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना महागडे स्टील खरेदी करावे लागले. त्यावेळी डब्ल्यूटीओने हस्तक्षेप करून टॅरिफ चुकीचे घोषित केले आणि बुश प्रशासनाला ते रद्द करण्यास भाग पाडले. आज ट्रम्प तीच चूक पुन्हा करत आहेत. जर अमेरिकेचा टॅरिफवरील हट्टीपणा वाढला, तर सर्व प्रभावित देश एकत्रितपणे एक निष्पक्ष आणि मजबूत व्यापार व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढे जाऊ शकतात. टॅरिफ युद्ध वाढल्यास, जर युरोपियन युनियन, चीन, कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि जपानसारख्या देशांनी स्वत:ची व्यापार व्यवस्था तयार केली, तर जागतिक व्यापारात अमेरिकेच्या ताकदीवर विपरित परिणाम होईल.


ट्रम्प यांनी हे समजून घेतले पाहिजे की, त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक व्यासपीठावर अमेरिकेची विश्वासार्हतादेखील कमी होईल. व्यापारासाठी नेहमीच स्पष्ट आणि न्याय्य नियम आवश्यक असतात जेणेकरून देश एकमेकांशी निष्पक्ष पद्धतीने व्यापार करू शकतील. सर्व देशांनी परस्पर संवादाद्वारे व्यापाराशी संबंधित समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत. व्यापार संबंधांमध्ये अराजकता वाढू नये म्हणून मजबूत कराराद्वारे परस्पर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, कोणताही देश व्यापार युद्धाला चालना देणारे आणि जागतिक व्यापार अस्थिर करणारे मनमानी निर्णय घेऊ शकत नाही. जागतिक व्यापारातील असंतुलन आणि ध्रुवीकरणाची प्रक्रिया थांबवण्यासाठी, डब्ल्यूटीओला पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करावे लागेल. परस्पर सहकार्य आणि पारदर्शक व्यापार नियमांद्वारेच स्थिर आणि न्याय्य जागतिक व्यापार व्यवस्था निर्माण करता येईल.

रविवार, २७ एप्रिल, २०२५

पाकीस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने काही राजनैतिक पावले उचलण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करणे. याशिवाय, राजनैतिक उपस्थिती कमी करणे, पाकिस्तानींचे व्हिसा रद्द करणे आणि अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.


भारताविरुद्ध द्वेषाच्या आधारावर पाकिस्तानची स्थापना झाली आणि अस्तित्वापासूनच त्याने भारताशी कटू संबंध ठेवले आहेत. कटुतेच्या या दीर्घ अध्यायात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष युद्धे आणि सतत पुरस्कृत दहशतवाद असूनही, भारताने १९६० मध्ये अस्तित्वात आलेल्या सिंधू पाणी कराराला कधीही स्थगिती दिली नाही, परंतु पहलगामनंतर तसे करण्यास मागेपुढे पाहिले नाही. या स्थगितीच्या अंमलबजावणीशी संबंधित जर आणि पण, या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करताना, हे निश्चित आहे की जर ते अपेक्षेप्रमाणे अंमलात आणले गेले तर आधीच अडचणींना तोंड देत असलेला पाकिस्तान मदतीसाठी ओरडू लागेल.

पाकिस्तानच्या शेतीचा मोठा भाग या कराराद्वारे पुरवल्या जाणाºया पाण्यावर अवलंबून आहे. पाणी थांबविल्याने कृषी उत्पादनात घट होऊ शकते आणि अन्न सुरक्षेचे नवीन संकट निर्माण होऊ शकते. अनेक पाकिस्तानी शहरेदेखील या पाण्यावर चालतात, त्यामुळे त्यांचा वेग थांबणे स्पष्ट आहे. सिंधू पाणी करार हा जगातील सर्वात उदार आणि एकतर्फी फायदेशीर करारांपैकी एक मानला जातो, ज्याचा जवळजवळ संपूर्ण फायदा पाकिस्तानला मिळाला आहे.


यापूर्वीही ते पुढे ढकलण्याच्या चर्चा अनेक वेळा झाल्या होत्या, परंतु त्या येत राहिल्या, कारण पाकिस्तानी सैन्य आणि राज्यकर्त्यांच्या दुष्कृत्यांची किंमत पाकिस्तानच्या लोकांना चुकवावी लागेल असा भारताचा कधीच हेतू नव्हता. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतरही, या कराराच्या स्वरूपात थोडे बदल करण्यात आले होते, जेणेकरून भारतालाही काही फायदे मिळतील, परंतु त्यानंतरही ते मागे टाकण्याचे पाऊल उचलण्यात आले नाही. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, परंतु पहलगामनंतर असे दिसते की भारताचा संयम मर्यादा ओलांडत आहे, त्यानंतर हे कठोर पाऊल उचलावे लागले.

राजनैतिक पावले दर्शवितात की भारत कोणतीही कसर सोडणार नाही. यानंतर, लष्करी आघाडीवर काही कृती करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले आहे की, दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली जाईल. गुरुवारी अनेक देशांच्या राजनयिकांशी झालेल्या बैठकीत भारताने जागतिक समुदायाला वास्तवाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय समुदायाने पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि भारताला सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. भारताच्या प्रतिक्रिया आणि हालचालींवरून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण स्पष्टपणे दिसून येते. सर्जिकल किंवा एअर स्ट्राईकसारख्या काही कृतीची अटकळ बांधली जात आहे.


भारताच्या पावलांना उत्तर म्हणून पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची आणि सिंधू पाणी कराराला ‘युद्ध कारवाई’ म्हणून प्रतिसाद देण्याची धमकी दिली आहे. या सर्वांमध्ये प्रश्न उद्भवतो की जेव्हा पाकिस्तान ढासळत्या अर्थव्यवस्थेपासून ते फुटीरतावादापर्यंत अनेक आव्हानांना तोंड देत आहे, तेव्हा पहलगाम हल्ल्यासारखे काहीतरी करण्याचे धाडस का केले? येथे हे दुर्लक्षित करता कामा नये की पहलगाममधील भयानक हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या अलीकडच्या विषारी भाषणाच्या एका आठवड्यात करण्यात आला. जर आपण याची कारणे तपासली तर आपल्याला आढळेल की पाकिस्तान सध्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी अमेरिकन उपयुक्ततेच्या केंद्रस्थानी असलेला पाकिस्तान आता अमेरिकन धोरणांमध्ये मार्जिनवर पोहोचला आहे.

आखाती देशांमध्ये इस्लामिक ओळख आणि एकतेच्या लाटेवर स्वार असलेल्या पाकिस्तानलाही पश्चिम आशियातील भारताच्या वाढत्या प्रभावाचा मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या अत्यंत महत्त्वाच्या भारत भेटी आणि पंतप्रधान मोदींच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान पाकिस्तानने भारतावर खोलवर घाव घातला आहे हे दुर्लक्ष करता येणार नाही. हे स्पष्ट आहे की, स्वत: भारताबाबत आपल्या देशाचे धोरण ठरवणाºया पाकिस्तानी लष्कराला हे सत्य पचवता येणार नाही की, एकेकाळी त्याचे आश्रयदाते असलेले हे पक्ष भारताकडे झुकत आहेत.


पाकिस्तानमधील वाढत्या फुटीरतावादामुळे लष्करासमोरील आव्हानेही वाढली आहेत. गेल्या महिन्यातच, बलुचिस्तानमध्ये लष्करी कर्मचाºयांना घेऊन जाणाºया ट्रेनच्या अपहरणामुळे लष्कराला लाजिरवाणे वाटले. अशा परिस्थितीत, त्यांना पुन्हा एकदा भारतविरोधी कार्ड खेळावे लागले. जनरल मुनीर यांचे अलीकडील भाषण याचे स्पष्ट उदाहरण आहे, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा हिंदू-मुस्लीम ओळख, द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिंबा आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

पहलगाम हल्ला हा त्यांच्या या वैचारिक दृष्टिकोनाची ठोस अभिव्यक्ती आहे. हा हल्ला या अर्थानेही वेगळा आहे की, पूर्वी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी फक्त भारतीय सरकार किंवा लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले होते, ते म्हणाले होते की त्यांचा लढा भारतीय राज्य आणि त्यांच्या व्यवस्थेशी आहे, परंतु यावेळी निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. म्हणूनच भारतानेही सिंधू पाणी करार स्थगित करून हाच संदेश दिला की आता ही लढाई नागरिकांच्या पातळीवरही पोहोचली आहे आणि जनतेलाही पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या दुष्कृत्यांचे चटके सहन करावे लागतील. भारताचा संदेश स्पष्ट आहे की जर पाकिस्तानी जनता आपल्या लष्करी दलांसह विषारी जिहादी युद्ध लढत राहिली तर पाकिस्तानला आमच्या लष्करी दलांसह युद्ध लढता येणार नाही. जर राजकीय नेतृत्वाची दिशाभूल होत राहिली तर त्यांना त्याची किंमतही चुकवावी लागेल. पहलगाम हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संतापामुळे, ज्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये विविध राज्यांचे नागरिक होते, संपूर्ण भारताला आणखी एकत्र केले आहे. याशिवाय, व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्याने देखील भारतासाठी सर्व पर्याय खुले केले आहेत.

शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

पाकीस्तानी सैन्याला शांतता आवडत नाही


पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सध्या संतप्त आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या अलीकडेच झालेल्या विषारी भाषणाच्या काही दिवसांनंतर हा दहशतवादी हल्ला झाला असल्याने, या हल्ल्याचे धागेही त्या भाषणाशी जोडले जात आहेत. पण पाकिस्तानच्या राजकारणात नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक नाही तर लष्कराचे वर्चस्व कायम राहिले आहे. एकाच वेळी भारतद्वेष करून पाकिस्तानी लष्कर हे पाकिस्तानची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असते.


१६ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये परप्रांतीय पाकिस्तानींना दिलेले त्यांचे भाषण खूप गाजले होते. आज या भाषणाचे मुद्दे आणि त्याचे महत्त्वाचे संदर्भ समजून घेणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. मुनीर यांच्या भाषणाचे प्रामुख्याने तीन पैलू आहेत. पहिले, पाकिस्तान अतिशय कठीण काळातून जात असताना हे भाषण देण्यात आले. या अडचणींमध्ये राजकीय ध्रुवीकरण, फुटीरतावाद, पाणीवाटपावरून प्रांतांमध्ये संघर्ष आणि ढासळणारी अर्थव्यवस्था यासारख्या बाबींचा समावेश आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणींमध्ये इतकी अडकली आहे की, ती कशीतरी आयएमएफसारख्या संस्थांच्या दयेवर टिकून आहे.

दुसरे म्हणजे, त्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे परदेशात राहणाºया पाकिस्तानी लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, ज्यांना इम्रान खानचे समर्थक मानले जाते. तिसरा पैलू कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे, की त्यांनी लष्करप्रमुख म्हणून त्यांची सेवा वाढवण्यासाठी एक जुगार खेळला, कारण त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. ते सिद्ध करू इच्छित होते की सैन्यच धैर्याने आणि एकतेने समस्यांना तोंड देत आहे, परंतु त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश आलेले दिसत नाही.


मुनीर यांच्या भाषणाचा सारांश समजून घेतल्यास, त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना दोन वेगवेगळ्या ओळखी म्हणून वर्णन करून पाकिस्तानच्या निर्मितीची आवश्यकता पुन्हा अधोरेखित केली. बलुचिस्तानमधील फुटीरतावादाबद्दल, त्यांनी दावा केला की, ही मोठी समस्या नाही आणि काश्मीरला ‘पाकिस्तानची मान’ असे संबोधून त्याबद्दल संवेदनशीलता व्यक्त केली. जर आपण यातील सर्वात वादग्रस्त भाग पाहिला तर, त्यांनी मुस्लिमांना हिंदूंपेक्षा पूर्णपणे वेगळे असे म्हणत भारतविरोधी भाषणाला एक नवीन सूर दिला.

ते म्हणाले, ‘‘आपल्या पूर्वजांना असे वाटायचे की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा पूर्णपणे वेगळे आहोत. आपला धर्म, आपल्या श्रद्धा, आपल्या परंपरा आणि आकांक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणूनच द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया रचला गेला. आपण दोन वेगवेगळे देश आहोत, जे कोणत्याही प्रकारे एक नाहीत.’’ त्यांनी पुनरुच्चार केला की, ज्या द्विराष्ट्र सिद्धांतावर पाकिस्तानची स्थापना झाली ती भावना भावी पिढ्यांमध्येही रुजवली पाहिजे. मुनीरचा हा दावा आणि द्विराष्ट्र सिद्धांताचे तत्त्व बांगलादेशच्या निर्मितीसह बंगालच्या उपसागरात गाडले गेले आणि ते बलुचिस्तान किंवा खैबर पख्तूनख्वामध्ये दररोज शेवटचे श्वास मोजत आहे. त्याचप्रमाणे, पाकिस्तानसाठी त्यांच्या पूर्वजांच्या संघर्षाची त्यांची कहाणीही बोगस आहे, कारण प्रत्यक्षात हा देश त्यांना ब्रिटिशांकडून एक देणगी म्हणून देण्यात आला होता.


त्यांनी पाकिस्तानला त्रास देणाºया बलुचिस्तान चळवळीला कमी लेखत म्हटले की, तुम्हाला वाटते का की हे १५०० बंडखोर बलुचिस्तान आपल्यापासून हिरावून घेतील? दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करू शकत नाहीत. त्यांचा दावा अनेक तथ्यांमुळे खोटा ठरतो. जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसºया क्रमांकावर आहे. पाकिस्तानी नेत्यांनी राष्ट्रीय सभेत नमूद केले आहे की बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वाचे काही भाग सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत. गेल्या महिन्यातच, बंडखोरांनी लष्करी जवानांना घेऊन जाणाºया ट्रेनचे अपहरण केल्यामुळे बलुचिस्तानमधील परिस्थिती कशी बनली आहे याची संपूर्ण कहाणी सांगते.

भिंतीवरील लिखाण वाचण्याऐवजी, मुनीर बंडखोरांना धडा शिकवण्याबद्दल आणि त्यांच्यावर मात करण्याबद्दल बोलतात, हे विसरून की अयुब खान आणि परवेझ मुशर्रफसारखे लष्करप्रमुखही अशा धमक्या असूनही फार काही करू शकले नाहीत. लक्षात ठेवा की, अयुब आणि मुशर्रफ दोघेही मुनीरपेक्षा खूप शक्तिशाली जनरल होते, कारण ते थेट संपूर्ण सत्ता बळकावून हुकूमशहा बनले होते. हे देखील विसरू नये की, बलुचिस्तानला चिथावणी देण्याचे परिणाम खूप वाईट झाले आहेत. याह्या खानने अयुब खानला अतिशय असभ्य पद्धतीने बाहेर काढले, तर मुशर्रफ यांना शेवटी मोठ्या दुर्दैवाचा सामना करावा लागला. काश्मीरला पाकिस्तानची ‘गळाची नस’ असे वर्णन करताना, मुनीर यांनी त्यांच्या ‘स्वातंत्र्या’प्रति असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला. जर आपण या पैलूची वास्तविकता तपासली तर, काश्मीर हा पाकिस्तानची गळाची नसून लष्कराचा आहे, कारण स्वातंत्र्याच्या नावाखाली लष्कर बजेटचा मोठा भाग हडप करते आणि पाकिस्तानमध्ये आपले वर्चस्व राखते. म्हणूनच, पाकिस्तानी सैन्य कधीही भारताशी चांगल्या संबंधांच्या बाजूने राहिलेले नाही. द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थन आणि हिंदू-मुस्लीम विभाजनाचा नारा यासंदर्भात पाहिला पाहिजे. आपल्या भाषणात इस्लामिक धार्मिक पुस्तकांमधील संदर्भ देऊन, मुनीरने स्वत:ला एक मजबूत नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आणि खरी सत्ता त्यांच्याकडे असल्याचे दाखवून दिले. पंतप्रधानांऐवजी त्यांनी या प्रवासी मेळाव्याला संबोधित केले यावरूनही हे स्पष्ट झाले.


भारतातील जे लोक पाकिस्तानशी संवाद सुरू करण्यास समर्थन देतात किंवा शांततेसाठी आशेचे गाणे गातात त्यांच्यासाठी मुनीर यांचे हे भाषण डोळे उघडणारे ठरेल. काही महिन्यांत, मुनीर यांच्या लष्करप्रमुखपदाच्या सेवेच्या विस्ताराचा निर्णयही घेतला जाईल. १६ एप्रिलच्या भाषणाद्वारे त्यांनी एक प्रकारे त्यासाठी औपचारिक मोहीमही सुरू केली आहे. येत्या काळात या मोहिमेला अधिक गती मिळेल. इंटरनेट माध्यमांवर त्यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या आवाहनापासून ते त्यांना पाकिस्तानचा नेता म्हणणाºयांपर्यंत, अनेक शहरांमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. भारतासोबतच्या वाढत्या तणावात ते हा दावा अधिक जोरदारपणे पुढे नेतील. त्यामुळे काश्मीरला जर पाकिस्तानचा गळा म्हणत असतील तर तर तो गळा आता दाबायची वेळ आलेली आहे.

धार्मिक दहशतवादाचा सर्वात क्रूर चेहरा


‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाºया जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी एक भयानक, वेदनादायक आणि अमानवी दहशतवादी हल्ला झाला, जो पुन्हा एकदा जिहादी दहशतवादाचा घृणास्पद आणि क्रूर चेहरा दाखवतो. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे निष्पाप आणि नि:शस्त्र पर्यटकांना ओळखले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यावरून दिसून येते की, त्यांना केवळ भीती निर्माण करायची नव्हती, तर मोठ्या संख्येने लोकांचे रक्त सांडून जगाचे लक्ष वेधायचे होते. हा आतापर्यंतचा सर्वात घृणास्पद आणि क्रूर हल्ला आणि दहशतवाद आणि सांप्रदायिक द्वेषाचा चेहरा आहे, ज्यामध्ये हिंदू नाव ऐकताच गोळ्या झाडल्या गेल्या. जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मूळ अजेंड्याचा भाग आहे. या घृणास्पद आणि दु:खद घटनेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात असताना आणि भारतीय पंतप्रधान सौदी अरेबियात असताना निष्पाप पर्यटकांचा बळी गेला.


हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. सुरक्षा यंत्रणांचा असा विश्वास आहे की, हल्लेखोर दक्षिण काश्मीरमधील कोकरनागमार्गे किश्तवारमार्गे बैसरन येथे पोहोचले. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा बैसरन आणि आसपासच्या गवताळ प्रदेशात मोठ्या संख्येने पर्यटक मजा करत होते. काही जण खेचरांवर स्वारीचा आनंद घेत होते, तर काही कुटुंबे पिकनिक साजरी करत होती. त्यानंतर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेला पाकिस्तान थेट जबाबदार आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदू आणि भारताविरुद्धच्या द्वेषाचे अश्लील प्रदर्शन जिहादीसारखे केले होते हे दुर्लक्षित करता कामा नये. अबू मुसाचे ते भाषण आणि त्यानंतर लगेचच घडलेले पहलगाम हत्याकांड हे दर्शविते की, पीओकेमध्ये बसलेले दहशतवादी नेते केवळ भारतविरोधी विषारी प्रचार करत नाहीत तर काश्मीर खोºयातील शांतता, विकास आणि सौहार्द बिघडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते येणाºया काळात पुन्हा खोºयात बिघाड करण्याच्या योजनेवरही काम करत आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, खोºयातील पर्यटनाशी संबंधित व्यवसाय ठप्प होणे जवळजवळ निश्चित आहे. शेवटी, अशा भयानक घटनेनंतर कोणता पर्यटक काश्मीरमध्ये येईल?

शांतता आणि समृद्धीच्या दीर्घ काळानंतर, पुन्हा एकदा काश्मीरवर अशांतता आणि दहशतीचे ढग दाटून आले आहेत. पृथ्वीवरील स्वर्गाच्या आभाळाला ग्रहण लागलेले ढग दूर होऊ लागले होते, तेव्हा पहलगाममधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अशी घटना घडवून आणली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एवढा मोठा दहशतवादी हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर देणे केवळ आवश्यकच नाही तर अत्यावश्यकही आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची गंभीरता पाहता गृहमंत्री अमित शाह घाईघाईने श्रीनगरला रवाना झाले असताना, सौदी अरेबियाला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दौरा अर्ध्यावरच सोडून दिल्लीला आले यावरून स्पष्ट होते. दिल्लीत पोहोचताच त्यांनी विमानतळावरच एक बैठक घेतली, ज्यामध्ये अजित डोभाल यांच्याशी गंभीर सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी या दहशतवादी घटनेविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. मोदी आणि शाहा यांच्या कृतीमुळे यावेळी काहीतरी निर्णायक घडेल अशी आशा निर्माण झाली आहे. दहशतवादाची भावना पहलगामच्या सुंदर खोºयाला रक्ताने रंगविण्यासाठी बाहेर पडली असेल, परंतु यावेळी निष्पाप लोकांचे रक्त वाया जाऊ नये. हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतीचा परिणाम आहे, तो त्याच्या इशाºयावर करण्यात आला. पाकिस्तान जळत्या बलुचिस्तानवरून जगाचे लक्ष विचलित करू इच्छित आहे आणि काश्मीरमधील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे हे त्याला आवडत नाही असे मानण्याची ठोस आणि खात्रीशीर कारणे आहेत. भारताने पाकिस्तानच्या वाईट हेतूंबद्दल अधिक सावधगिरी बाळगायला हवी होती. ते पूर्वीही विश्वसनीय नव्हते आणि आताही नाहीत. आता दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाºया पाकिस्तानला निर्णायक धडा शिकवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.


तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण हा दहशतवादाविरुद्ध भारताचा मोठा विजय बनला आहे, ज्यामुळे पाकिस्तानलाही भीती वाटली आहे. मुंबई आणि देशाच्या इतर भागांमध्ये आणि विशेषत: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या संपूर्ण नियोजनामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि त्याच्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांचाच हात होता असे नाही तर आर्थिक आणि इतर प्रकारचे पाठबळही होते. पहलगामची अलीकडील घटना असो किंवा वारंवार घडणाºया दहशतवादी घटना असोत, सर्व पुरावे असूनही, पाकिस्तान या हल्ल्यांमागील आपली भूमिका नाकारत आहे. तथापि, ते दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि झाकी-उर-रहमान लखवीसारख्या दहशतवादी नेत्यांनाही संरक्षण देत आहेत. राणाच्या माध्यमातून पाकिस्तानचे संपूर्ण सत्य उघड झाले आहे. पाकिस्तानला जगासमोर उघड होण्याची भीती होती, म्हणूनच त्याने ही पहलगाम घटना घडवून आणली. पण आता त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्याला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर दहशतवादाविरुद्ध स्वत:ला तयार करावे लागेल, आता भारतीय सुरक्षा यंत्रणांचे खरे मोठे काम येथूनच सुरू करावे लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सीमापार दहशतवाद म्हणजेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी लढण्यात भारताला पाठिंबा देण्याचा आपला निर्धार पुन्हा व्यक्तकेला आहे, त्याचप्रमाणे रशियादेखील भारतासोबत आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अनेक देशांनी भारताला सर्व प्रकारे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. आता पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्याची आणि त्याचे विध्वंसक आणि विनाशकारी हेतू नष्ट करण्याची वेळ आली आहे.

तीन दशकांपासून काश्मीर खोरे दोषी आणि निष्पापांच्या रक्ताची हळदीघाटी राहिले आहे. परंतु २०१४ पासून, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, तेथे शांतता आणि विकासाचे अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे, हे पाकिस्तानला आवडत नाही. काश्मीरसह संपूर्ण जगातून दहशतवाद संपवण्यासाठी पुढाकार घेऊन मोदींची आणखी एक चमत्कार घडवण्याची तयारीही पाकिस्तानसाठी एक मोठे आव्हान बनली आहे. आता पाकिस्तानमध्ये घुसून त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्जिकल हल्ला हा एकमेव मजबूत उत्तर असू शकतो.


या सततच्या हल्ल्यांनंतरही हिंदू समुदाय शांतता आणि करुणेबद्दल बोलत आहे. पण एक मोठा प्रश्न असा आहे की, हे कधीपर्यंत चालू राहील? भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताची वाढती पावले रोखण्यासाठी पाकिस्तान दहशतवादी संघटना आणि दहशतवादाचा आधार घेत आहे. भारत सरकारच्या धोरणामुळे, मजबूत सुरक्षाव्यवस्था आणि सरकारच्या सतर्कतेमुळे पाकिस्तान, त्याच्या दहशतवादी संघटना आणि दहशतवादी त्यांच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. सततच्या अपयशामुळे चिडलेले आणि निराश झालेले दहशतवादी काही नवीन आणि अधिक भयानक दहशतवादी घटना घडवून आणण्यात गुंतले आहेत, आपल्या सुरक्षा संस्थांनी अधिक सतर्क राहण्याची अपेक्षा आहे.

प्रफुल्ल फडके/ अन्वय


९१५२४४८०५५

आहेत का हे भारतीय?


जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील आनंदी वातावरणात अचानक झालेल्या शोकाकूल वातावरणाने प्रत्येक भारतीयाचे मन भरून आले आहे. २८ पर्यटकांच्या हत्येची घटना खूप दु:खद आहे, पण काही लोक या हल्ल्याचा योग्य निषेध करू शकत नाहीत हे पाहूनही दु:ख होते. विशेषत: उबाठा, काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचा निषेध करायच्या ऐवजी सरकारचा निषेध करतात, तेव्हा खूप वाईट वाटते. हे लोक भारतीय म्हणायच्या लायकीचे आहेत का, असा प्रश्न यामुळे पडतो.


ज्या घटनेत लोकांचा धर्म विचारल्यानंतर त्यांना मारण्यात आले, त्याला दहशतवादी घटना म्हटले जात आहे, तर पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्याने ते थेट जिहादचे प्रकरण असल्याचे दिसते. इतकेच नाही तर, संयुक्त राष्ट्रांकडे पाहा जे प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहेत, त्याचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पहलगामच्या घटनेला सशस्त्र हल्ला असे संबोधून तीव्र निषेध केला आहे. प्रश्न असा आहे की, संयुक्त राष्ट्रांना सशस्त्र हल्ला आणि दहशतवादी किंवा जिहादी हल्ल्यात काय फरक आहे हे माहीत नाही का?

याशिवाय, काश्मीरवर प्रचार करणारे आंतरराष्ट्रीय माध्यम २६ भारतीयांच्या मृत्यूवर आपला खेळ सुरू ठेवत आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर बीबीसीची बातमी पाहा, ज्याचा मथळा आहे- भारत-प्रशासित काश्मीरमध्ये बंदूकधा‍ºयांनी २६ पर्यटकांना ठार मारल्यानंतर धक्का आणि संताप, बीबीसीला बंदूकधारी आणि दहशतवादी किंवा जिहादी यांच्यातील फरक माहीत नाही का? अल जझीराची बातमी पाहा, त्याचा मथळा आहे- काश्मीर हल्ला लाईव्ह : पहलगाममध्ये २६ जणांच्या मृत्यूनंतर भारत बंदूकधा‍ºयांचा शोध घेत आहे, प्रश्न असा पडतो की, या माध्यम संस्थांना बंदूकधारी किंवा दहशतवादी किंवा जिहादी यांच्यातील फरक स्पष्ट करण्याची गरज आहे का?


याशिवाय, दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाºयांना हे देखील विचारले पाहिजे की, दहशतवाद्यांची नावे एका विशिष्ट धर्माशी का संबंधित आहेत? दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाºयांना विचारले पाहिजे की, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर का मारले गेले? त्यांना कलमा का म्हणण्यास सांगितले गेले आणि जेव्हा ते कलमा का म्हणू शकत नव्हते, तेव्हा त्यांना गोळ्या का मारल्या गेल्या? प्रश्न असा उद्भवतो की, एका पर्यटकाची सुंता झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याची पँट का काढली गेली? सुंता न झालेली आढळल्यावर त्याला गोळ्या घालून का मारण्यात आले? केवढे हे क्रौर्य म्हणायचे?

जर आपण पाहिले तर दहशतवादाचा धर्म असू शकतो किंवा नसू शकतो, परंतु आपल्या आजूबाजूला घडणाºया घटनांकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की, दहशतवादाचा सर्वात जास्त परिणाम हिंदू धर्मावर होतो. भारतात बहुसंख्य असूनही, हिंदूंना गोळ्या घालून मारले जाते? त्यांना त्यांच्या घरातून स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते. पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना विसरून जा, तिथे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आहे.


अर्थात, एनआयएने पहलगाम प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. परंतु या संपूर्ण घटनेमागील उद्देश समजून घेणे आणि योग्य कारवाई करणे महत्त्वाचे आहे. आपल्या एजन्सींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांना मारले आहे. आपल्या एजन्सींनी, पीडित कुटुंबांनी सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारे आहेत म्हणून त्यांना मारले आहे. जर काळजीपूर्वक पाहिले तर हे भारताच्या निवडून आलेल्या सरकारला थेट आव्हान असल्याचे दिसून येते. मोदी सरकारने तिथले छान पुनर्वसन केल्याने दहशतवादी बेरोजगार झाले आणि लोक सुरक्षित झाले. इथला पर्यटनाचा उद्योग बहरू लागला त्याचे दु:ख दहशतवाद्यांना झाले. त्यामुळे हा हल्ला केला गेला. पण याचे वृत्तांकन करताना वाहिन्यांनी दिलेला रंग आणि त्यावर टीका करताना सरकारला दोषी धरण्याचा काँग्रेसचा पवित्रा हा देशासाठी धोकादायक असा आहे.

गुरुवारी अनेक ठिकाणी बंद पाळ्ण्यात आला. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पण काँग्रेस आणि उबाठाने दहशतवाद्यांचा निषेध न करता सरकारचा निषेध केला हे पाहून संताप आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दहशतवाद्यांचे समर्थक आहात का असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. यशोमती ठाकूर म्हणतात बिहार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने याचे राजकारण केले आहे. शरम वाटली पाहिजे या बार्इंना असे बोलताना. त्यांना विचारले पाहिजे की २६/११चा मुंबईवरील हल्ला २००९च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने घडवला होता का? किती पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणार आहे काँग्रेस? विजय वडेट्टीवारही असेच काहीसे बरळत होते. यांना जराही देशाबाबत प्रेम नाही का? हा हल्ला झाल्याचा आनंद या लोकांच्या चेहºयावर दिसतो आहे असे म्हणावे लागेल. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करायला यांची जीभ रेटत नाही आणि सरकारचा निषेध करतात, यावरून यांची प्रवृत्ती दिसून येते. आपण जसे वागतो तसे जग दिसते, जसा चष्मा लावू तसे दिसते. काँग्रेसने कायम अशा घटनांचे राजकारण केले म्हणून त्यांच्या डोक्यात हे आहे. पण यामुळे जनतेच्या मनातून काँग्रेस पार नामशेष होताना दिसेल यात शंका नाही. आम्हाला पाकधार्जिणे पक्ष या देशात नकोत असा विचार जनता करत आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या ओंजळीने पाणी पिणाºया उबाठानेही विचार करून बोलले पाहिजे आणि स्वत:चा मेंदू वापरला पाहिजे.

आम्ही घाबरत नाही दाखवून देण्याची वेळ


पहलगाम काश्मीरमधील हल्ल्याला प्रत्युत्तर केवळ पाकिस्तानला ठेचून नाही तर आम्ही इथला रोजगार बंद पडू देणार नाही हे दाखवून देण्याची वेळ आहे. दहशतवादाशी सामना करायला आम्ही सज्ज आणि भक्कम आहोत, आम्ही इथले उद्योग, व्यवसाय बंद करणार नाही आणि काश्मीर सोडून पळून जाणार नाही हे ठामपणे जिहादी, पाकिस्तानी दहशतवाद्यांना दाखवून देण्याची आवश्यकता आहे.


काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यावर काश्मीरमध्ये चांगले वातावरण तयार झाले. काश्मीरमध्ये सात दशकांनंतर तिरंगा फडकला आणि विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले. पण याचेच दु:ख काही प्रवृत्तींना झाले. यात पाकिस्तानबरोबरच भारतातील काही दुष्ट जिहादी शक्तीही असू शकतात. काही राजकीय विरोधी पक्षही यात खोडा घालणारे आहेतच. पण हा झालेला हल्ला म्हणजे इथल्या रोजगारावर झालेला हल्ला आहे.

३७० कलम हटवल्यावर भारतातील विविध राज्यांतील उद्योजक व्यावसायिकांनी तिथे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी २५ लाख पर्यटक इथे भेट देऊ लागले. इथे रोजगार वाढू लागला. उलाढाल वाढू लागली. हॉटेल, चित्रपटगृहे विकसित झाली. पर्यटकांना आकर्षित करणारी यंत्रणा वेगाने वाढू लागली आणि इथला विकास होऊ लागला. त्यामुळे इथली जनता आनंदात असल्याचे दहशतवाद्यांना बघवले नाही. काश्मीर उजाड करायचे आणि इथल्या रोजगारावर हल्ला करण्यासाठी पर्यटकांवर हल्ला केला गेला. म्हणूनच तुम्ही कितीही रोजगार बंद करण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही घाबरत नाही. आम्ही इथला रोजगार बंद होऊ देणार नाही. इथला पर्यटन व्यवसाय बंद होऊ देणार नाही हे दाखवून देणे हे खरे युद्ध असेल.


अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा या दणक्यात झाल्या पाहिजेत. त्यासाठी इथली संरक्षण व्यवस्था वाढवली पाहिजे. चोख सुरक्षा व्यवस्थेत इथल्या उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला संरक्षण देणे गरजेचे आहे. आपल्याकडे संरक्षणासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर सरकारने आवाहन करावे की, जे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत, त्यांना विशेष मानधन देऊन या विशेष सेवेत सामील करावे. त्यामुळे विशेष रोजगार निर्माण करता येईल असे दल निर्माण केले पाहिजे. या स्वयंस्फूर्तीने भरती होऊन संरक्षणाचे कार्य हाती घेणाºया तरुणांना सरकारने योग्य मानधन दिले पाहिजे. दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात यांना वीरमरण आले, तर त्यांचा शहीद म्हणून सन्मान करावा आणि काही वर्षे सेवा देऊन विनासायास, सुखरूप परत आलेल्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. सगळा भार आर्मी आणि लष्करावर न टाकता अशा स्वयंसेवकांना, संरक्षणात स्वेच्छेने येणाºया तरुण, निवृत्त यांच्या मदतीने इथली व्यवस्था सुरक्षित करावी. त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकांना रोजगारापासून वंचित होण्यापासून वाचवण्याची गरज आहे.

काश्मीरचा होत असलेला विकास हे पाकिस्तान, जिहादी, दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. तिथले फुटीरतावादी प्रवृत्तीचे सरकारही पाकिस्तानला पोषक धोरण आखते. कारण त्यांच्या अजेंड्यातच ३७० कलम पुन्हा लागू करण्याचे आहे. म्हणूनच हा डाव हाणून पाडला पाहिजे. यासाठी आम्ही घाबरत नाही, आम्ही इथला रोजगार बंद पडू देणार नाही. विकास थांबू देणार नाही हे दाखवण्याची गरज आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर मुंबई थांबली नाही. दुसºया दिवसापासून ती पुन्हा सुरू राहिली आणि जगाने याचे कौतुक केले. तसेच काश्मीरबाबत होण्याची गरज आहे. तरुण, सेवानिवृत्त लष्करी, सीमा सुरक्षा दल, पोलीस कर्मचाºयांना आमंत्रित करून विशेष संरक्षण यंत्रणा निर्माण करून पाकिस्तानला धडा शिकवता येईल. यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची गरज आहे.


यासाठी सरकारला निधी कमी पडत असेल तर देशभरातील देवस्थानांनी जबाबदारी स्विकारली पाहिजे. कश्मिर सुरक्षा निधी निर्माण करुन भारताची एकजूट दाखवण्याची संधी यातून निर्माण होईल. अनेक दानशूर व्यक्ती, उद्योजक अशा कार्याला हातभार लावतील आणि हा खर्च पेलू शकतील. अशी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. यातून एकच दाखवायचे आहे की आम्ही घाबरत नाही, आमचे काश्मीर आम्ही छान ठेवू, अखंड भारताचे प्रतिक म्हणून ते जतन करु.

काश्मीर थांबला नाही हा संदेश पाकिस्तानला, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना आणि याचे राजकारण करून असुरी आनंद मिळवू पाहणाºया काँग्रेससारख्या पक्षांना देण्याची गरज आहे. ३७० कलम हटवून काय फायदा झाला असे तोंड वर करून विचारणाºया काही दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी आता आम्ही घाबरणार नाही, थांबणार नाही हे दाखवून देण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये पर्यटनासंबंधी गुंतवणूक करणाºयांसाठीही सरकारने विशेष सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजेत. तिथल्या रोजगाराला प्रोत्साहन देणाºयांना आमंत्रित करून या नंदनवनाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे दाखवून देण्याची गरज आहे.


- प्रफुल्ल फडके/अन्वय

९१५२४४८०५५

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

ती वेळ आली आहे


जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेकडून पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगामला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हटले जाते. इथे भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. भारताच्या नंदनवनाला चाळीस वर्षांपूर्वी खांडववनाची अवस्था आली होती. पण कलम ३७० हटवल्यानंतर इथली परिस्थिती बदलली आणि पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले असतानाच धर्मांध क्रूर प्रवृत्तीच्या जेहादींनी पुन्हा घुसखोरी करून दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली. अर्थात, याला भारतातून प्रोत्साहन देणारे काही महाभागही आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धर्म, जात आणि नाव विचारून, पंतप्रधान मोदींवर टीका करत या दहशतवाद्यांनी गोळीबार करून निष्पाप पर्यटकांची हत्या केली. त्यांना चांगली अद्दल घडवण्याची ती वेळ आलेली आहे.


इंडिया आघाडीचा विशेषत: काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा जम्मू कश्मीर निवडणुकीत अजेंडाच होता की, पुन्हा ३७० कलम लागू करू. त्यामुळे या शक्तींचा पाठिंबा या दहशतवादी गटांना असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. संसदेवरील हल्ल्यातील अफझल गुरूची पाठराखण करणारा कन्हैय्या आणि त्याला दत्तक घेऊन काँग्रेसचा स्टार प्रचार करणाºया राहुल गांधींची प्रवृत्ती ही अशा दहशतवादाला छुपा पाठिंबा देण्याची आहे हे अनेकदा दिसून आलेले आहे. अशाच फुटीरतावादी फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांच्या मांडीला मांडी लावून भारतविरोधी धोरण ठेवणारे आपले स्वकीय आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे सर्वात प्रथम उमर अब्दुल्लांचे सरकार बरखास्त केले पाहिजे. त्यांचे समर्थन करणाºया इंडिया आघाडीतील घटक पक्षांना तंबी देण्याची आवश्यकता आहे. या स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केल्याशिवाय पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही. सातत्याने फितुरीने भारतीय इतिहासात घात केलेला आपण पाहिला आहे. त्यामुळे या फितुर आणि फुटीरतावाद्यांचा प्रथम बंदोबस्त केला पाहिजे. त्यानंतर घुसून मारले पाहिजे. आता संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याची हीच ती वेळ आहे. पाकव्याप्त काश्मीर काढून घेण्याची ही योग्य वेळ आहे. त्याचप्रमाणे बलुचिस्तान पाकिस्तानपासून मुक्त करून तिथल्या नागरिकांना संरक्षण देण्याची कारवाई आता करावीच लागेल.

प्यारसे रहोगे तो खीर देंगे, कश्मीर मागोगे तो चीर देंगे, ही घोषणा आदरणीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी दिली होती. इंडिया आघाडीने भरपूर खीर खायला घातली आहे, त्यामुळे आता घुसून तोडायची वेळ आलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सहनशिलतेलाही काही मर्यादा असते. विरोधी पक्षांनी यावरून राजकारण सुरू केले आहे, त्यांना कसलीही जबाबदारी नाही. त्यामुळे संजय राऊतांसारखी फुटकळ माणसे सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. विजय वडेट्टीवारसारखे काँग्रेसचे नेते सरकारने चूक कबूल करावी असे बेताल वक्तव्य करतात, याची ऐकतानाच लाज वाटते. या गोष्टींचे कसले राजकारण करता? मुंबईत २६/११ला हल्ला झाला होता तेव्हा काँग्रेसने चूक कबूल केली होती का? तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी उभे होते. पण आत्ताच्या विरोधकांना देशहिताचे काहीही पडलेले नाही. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे की, या लोकांची तोंडे कायमची बंद होतील अशी कठोर कारवाई पाकिस्तानवर केली पाहिजे. त्यामुळे आता जोरदार हल्ला करून दहशतवादापासून काश्मीर मुक्त केले पाहिजे. काश्मीरचा तुकडा पाडणाºया प्रवृत्तीचे समर्थन असणाºया, काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लादण्याची इच्छा असणाºया काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार बरखास्त केले पाहिजे. देशविरोधात वक्तव्ये करणाºया इंडिया आघाडीच्या नेत्यांना तंबी देण्याची वेळ आलेली आहे.


संकट काळात सर्वांनी एक व्हायचे असते आणि शत्रूशी सामना करायचा असतो. पण याचे भान न राखता विरोधी पक्ष टीका करण्यात धन्यता मानत आहेत. दीर्घकाळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे अशा घटनांचे राजकारण करणे म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. अशा विरोधकांना आपल्या ठोस कृतीतून पंतप्रधानांनी उत्तर देण्याची हीच ती वेळ आहे. आता कसल्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता पाकला उत्तर देण्याची हीच ती वेळ आहे. इस्राईल, रशिया ज्याप्रमाणे आपल्या शेजारी देशांना धडा शिकवते त्याचे अनुकरण करण्याची हीच ती वेळ आहे. उमर अब्दुल्ला यांनी काश्मीरच्या निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याचा शहानिशा करण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये फडकणारा तिरंगा त्यांना खुपतो आहे. म्हणूनच आता वेळ आलेली आहे की, पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याची हीच ती वेळ आहे.

या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ७ पर्यटकांचा मृत्यू झाला. डोंबिवली, पुणे, पनवेलमधील या पर्यटकांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. ही झालेली जखम कधीही भरून येणारी नाही. त्यामुळे त्यासाठी घुसून, वेचून, टिपून सगळ्या दहशतवाद्यांना मारणे हाच उपाय आहे. ज्याप्रमाणे नक्षलवाद्यांना संपवण्यात यश येत आहे, त्याप्रमाणे काश्मीरमधील दहशतवादी संपवण्यासाठी विशेष आॅपरेशनची आता वेळ आलेली आहे. कन्हैय्या कुमारसारखे काँग्रेस नेत्यांना दहशतवाद्यांचा पुळका येणार असेल तर अशा प्रवृत्तींनाही धडा शिकवावा लागेल. काश्मीरमधील दहशतवाद्यांचे प्रेरणास्थान असलेल्या जेएनयूसारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जेएनयूसारख्या संस्थांमधून अफझल गुरूला शहीद ठरवले जाते, त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते. अशा दहशतवाद्यांचे समर्थन करणाºया संस्थांवर कारवाई करून स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करावा लागेल.

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

आऊटस्टँडिंग परफॉर्मन्सला आळा घातला पाहिजे!


काम करता करता सिगारेट ब्रेक घेणा‍ºया कर्मचा‍ºयांची संख्या जगभरात खूप मोठी आहे. साधारणपणे चहा, कॉफी किंवा सिगारेट यांच्यासाठी ब्रेक घेणे ही बाब इतकी मोठी मानली जात नाही, पण आता पुढे वारंवार सिगारेट ब्रेकसाठी गेलात, तर खिशाला कात्री लागू शकते. स्पेनमध्ये काही वर्षांपूर्वी ही फार मोठी गोष्ट घडली आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे गरजेचे आहे. सिगारेटप्रमाणेच मोबाइलवर फालतू आणि घरगुती गप्पा मारणे यावरही बंदी घालण्यात आली पाहिजे. कार्यालयीन कामात काम ठेवून मोबाइलवर बोलायला बाहेर पडायचा आऊटस्टँडिंग परफॉर्मन्सही बंद झाला पाहिजे.


स्पेनच्या एका कंपनीने याबाबत एक याचिका कोर्टात दाखल केली होती. सिगारेट ब्रेक घेणा‍ºया कर्मचा‍ºयांची पगारकपात करण्याबाबत स्पेनच्या एका कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणा‍ºया कर्मचा‍ºयांची पगारकपात करण्याचा अधिकार या कंपनीला प्राप्त झाला आहे. याचे अनुकरण संपूर्ण जगभर करण्याची गरज आहे, किंबहुना भारतात तरी ते होणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे काम करण्यापेक्षा टाइमपास करण्याचे प्रमाण जास्त असते. सिगारेट, तंबाखू सेवनाच्या निमित्ताने कामातील दिरंगाईचे प्रमाण वाढत जाते. एक सिगारेट दहा मिनिटे जळत असेल, तर त्यासाठी बाहेर येणे-जाणे यात किमान अर्धा तास वाया जातो. तीच गत तंबाखूची असते. तंबाखू मळायची, तोंडात टाकायची आणि सतरादा बाहेर थुंकायला जायचे. यामध्ये कामात दुर्लक्ष होत असते.

भारतात तंबाखू खाऊन काम करणाºयांची संख्या फार मोठी आहे, किंबहुना तंबाखूमुळे अंतरही कमी होते, म्हणजे साहेब आणि शिपाई एका चिमटीत खातात. शिपाई आपल्या हाताने मळून देतो आणि कर्मचारी, शिक्षक खाताना दिसतात. या सगळ्या गलिच्छ प्रकाराला आळा बसला पाहिजे. इतकेच नव्हे, तर कामाव्यतिरिक्त फोनवर घरगुती विषयावर तासन्तास बोलून पॅसेजमध्ये अनेक कर्मचारी फिरत असतात. घरी बोलायला वेळ नाही, म्हणून आॅफिसच्या कामाच्या वेळेत बोलत राहतात. त्यामुळे दफ्तर दिरंगाई वाढत असते. अशा कर्मचा‍ºयांचाही पगार कापला पाहिजे. खरेतर तंबाखू आणि सिगारेटवर कार्यालयीन वेळेत बंदीच असली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी दारू पिऊन आला, तर तो गुन्हा आहे, तसाच हा गुन्हा ठरवला गेला पाहिजे. कारण त्याचा इतरांना त्रास होत असतो. त्यामुळेच स्पेनच्या कंपनीचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. ही कंपनी आता या निकालाची अंमलबजावणी करत असून, कामाव्यतिरिक्त वेळ घालवणा‍ºया कर्मचा‍ºयांचा पगारकापत असल्याचे ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणा‍ºया गल्प या कंपनीने म्हटले आहे.


एखादा झटपट घेतलेला कॉफी ब्रेक असो किंवा सहका‍ºयासोबत नाश्ता करण्यासाठी लागलेला वेळ, गल्पच्या धोरणांनुसार आता याचा पगार कापण्यात येत आहे. २०१९च्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही नियमावली लागू करण्यात आली होती. कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचा विरोध करत कंपनीला कोर्टात खेचले होते. पण स्पॅनिश कायद्यांनुसार कंपनीसाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. कर्मचा‍ºयांच्या येण्या-जाण्याच्या वेळेची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले. त्याचा परिणाम गेल्या पाच वर्षांत या कंपनीची कामगिरी सुधारली आहे. हे आपल्याला करावे लागेल.

ही देखरेख कर्मचा‍ºयांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी, तसेच कामातील लवचिकता वाढवण्यासाठी करण्यात आली होती. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार, स्पेनमध्ये २०१९ मध्ये तीस लाख तास ओव्हरटाइम करण्यात आला, पण याचा मोबदला कर्मचा‍ºयांना मिळाला नाही. कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्यामुळे, तसेच त्यांना विनामोबदला ओव्हरटाइम करावा लागत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून हा नियम लागू करण्यात आला. हे भारतातही झाले पाहिजे. कामाच्या वेळेत टाइमपास करायचा आणि नंतर ओव्हरटाइमचे बिल पाठवायचे हा प्रकार म्हणजे कंपनीला बुडवण्याचा प्रकार आहे. आज या निर्णयाचा स्पेनमधील सुमारे १० लाख धूम्रपानकर्त्या कर्मचा‍ºयांवर परिणाम झाला आहे, पण यातून काही तरी चांगले निर्माण होईल, अशी अपेक्षा करण्यात आली आणि त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळे जे स्पेनमध्ये घडले, ते भारतात झाले, तर फार मोठी प्रगती होईल. सिगारेट, तंबाखू आणि चहाच्या नावाखाली कर्मचारी किती टाइमपास करतात. त्यामुळे फार मोठी दफ्तर दिरंगाई होत असते. त्यामुळे जनतेचे सार्वजनिक ठिकाणचे नुकसान होत असते. त्यामुळे अशी पगारकपातीची कारवाई या देशातही होणे आवश्यक आहे.


आज परिस्थिती अशी आहे की, आओ-जाओ घर तुम्हारा. त्यामुळे कर्मचारी कार्यालयात कधी येतात, कधी जातात या सगळ्यांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. त्याद्वारे ते किती वेळ काम करतात याची आकडेवारी कंपन्या ठेवू लागल्या. बायोमॅट्रिक थम्ब इम्प्रेशनच्या नोंदीमुळे ब‍ºयापैकी आळा बसला आहे. उशिरा कामावर येऊन आधीच्या वेळेची नोंद करायचे प्रकार आता करता येत नाहीत, पण सिगारेट, तंबाखूच्या निमित्ताने टाइमपास करणारी प्रवृत्ती मात्र मोठी असते. याला आळा बसण्यासाठी भारतातही असा कायदा झालाच पाहिजे. आपल्याकडे काही  वर्षांपूर्वी भाजप सरकारने कोणत्या कामासाठी किती वेळ असला पाहिजे. नागरिकांची कामे किती दिवसांत पूर्ण झाली पाहिजेत, याबाबत एक कायदा केला होता, पण आज त्याचा परिणाम शून्य आहे. कारण त्याची अंमलबजावणी झाली नाही. प्रशासनाने तो कायदा बासनात गुंडाळून ठेवला.

पण गल्प या कंपनीत आपल्या कामाच्या वेळेत जेवण करणाºया किंवा सिगारेट ब्रेकसाठी बाहेर जाणा‍ºया कर्मचा‍ºयांना पूर्ण दिवसाचा पगार देण्यात आला नाही. या कालावधीतले त्यांचे पैसे कापण्यात आले. त्याचा धक्का जगभर बसला, पण त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे. आता स्पेनच्या हाय कोर्टानेही सिगारेट, कॉफी किंवा नाश्त्यासाठी ब्रेक घेणा‍ºया कर्मचा‍ºयांना त्या वेळेचे पैसे देण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणा‍ºया कर्मचा‍ºयांची पगारकपात होऊ लागली. युरोपियन राष्ट्रे ही शिस्तीने मोठी झालेली आहेत. आपल्यालाही शिस्त बाळगून भारत मोठा करता येईल. महासत्तेचे स्वप्न पाहण्यापूर्वी कर्मचारी वेळेत कामाला येतात की नाही, ते वेळेवर काम करतात की नाही, हे पाहिले पाहिजे. रोजच्या दिवसाचे काम रोज वेळेत करतात की नाही, यावर लक्ष दिले पाहिजे.


प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार युरोपीय देशांमध्ये स्पेनचे कर्मचारी सर्वात जास्त काम करतात. पोतुर्गाल किंवा इटली यांच्याप्रमाणे स्पॅनिश लोक आपला जास्तीत जास्त वेळ कार्यालयाच्या ठिकाणी घालवतात, पण तरीही त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ आलेली आहे. आपल्याकडे भारतात मुळातच कामावर उशिरा येण्याची आणि काम कमी करण्याची प्रवृत्ती आहे. त्यातही सीएल, पीएल, मेडिकल लिव्ह अशा विनाकारण रजा घेण्याची प्रवृत्तीही असते. कर्तव्याची जाणीव नाही, पण हक्काची जाणीव आपल्याकडे असते. रजेचा आमचा हक्क आहे, पण कामाचा नाही, अशी प्रवृत्ती आहे. त्यामुळे भारतातही शिस्तीचा कायदा झाला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/अन्वय


९१५२४४८०५५

रस्ते अपघात ही राष्ट्रीय आपत्तीच


भारतातील रस्ते अपघाताचे संकट ही एक फार मोठी समस्या बनत चालली आहे. या राष्ट्रीय आपत्तीशी संबंधित आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. केवळ २०२२ मध्ये रस्ते अपघातात १.६८ लाख लोकांनी आपला जीव गमावला होता. ही संख्या दावोस, मोनाको किंवा अगदी भूतानची राजधानी थिंपूच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तर अनधिकृत आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी सरासरी ३.३ लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात.


ही संख्या आइसलँडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे किंवा दुसºया महायुद्धात मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. रस्ते अपघातांच्या बाबतीत भारताचा क्रमांक खूप वरचा आहे हे स्पष्ट आहे. जगातील ११ टक्के रस्ते अपघात भारतात होतात, तर आयात केलेल्या वाहनांपैकी फक्त एक टक्का अपघात देशात होतात. दररोज ४५० हून अधिक भारतीय रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. हे अशा प्रकारे समजू शकते की दररोज खचाखच भरलेले एअरबस ए३८० विमान अपघातात कोसळत आहे, परंतु हा मुद्दा मथळ्यांमधून गायब आहे. यामध्ये जबाबदारीदेखील निश्चित केलेली नाही.

खराब रस्ते अपघातांचे आणखी वेदनादायक पैलू आहेत. उदाहरणार्थ, जीव गमावणाºयांची कमाल संख्या १५ ते २९ वयोगटातील आहे. बºयाचदा ते त्यांच्या कुटुंबातील कमावते सदस्य असतात किंवा भविष्यातील कमाईची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. रस्ते अपघातात होणाºया प्रत्येक चार मृत्यूंपैकी एक मृत्यू या वयोगटातील लोकांमध्ये होतो. अपघातातील मृत्युंपैकी निम्मे जण दुचाकीस्वार किंवा पादचारी असतात. ही वस्तुस्थिती रस्त्यांवरील सर्वात असुरक्षित लोकांसाठी कमकुवत पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपायांचा अभाव अधोरेखित करते. या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाºयांची संख्या कोणत्याही साथीच्या किंवा दहशतवादी हल्ल्यांपेक्षा खूप जास्त आहे, परंतु या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपक्रम किंवा कोणत्याही सुधारणा सुरू केल्या जात नाहीत. थोडक्यात, रस्ते अपघात ही सर्वात मोठी मानवनिर्मित आपत्ती असूनही, सर्वात जास्त दुर्लक्षित केली जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबाबत सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचा, प्रबोधनाचा प्रयत्न करत आहेत, पण लोकांना उपदेश नको असतात.


रस्ते अपघातांच्या संकटाची मूळ कारणे म्हणजे निकृष्ट अभियांत्रिकी, कमी दर्जाचे प्रकल्प, साइनबोर्ड किंवा दिशाभूल करणारे साइनबोर्ड नसणे आणि अभियंते आणि सल्लागारांची जबाबदारीचा अभाव. सरकार आणि एनएचएआयने ब्लॅक स्पॉट्स चिन्हांकित करणे आणि अपघात प्रवण क्षेत्रांची पुनर्रचना करणे यासारखी पावले उचलली आहेत, परंतु या गोष्टी यशस्वी होताना दिसत नाहीत. सामान्य रस्त्यांपासून ते महामार्गांपर्यंत, उपाय हे एक दूरचे स्वप्नच राहिले आहेत. बºयाच ठिकाणी, योग्य सूचना तर सोडाच, लेन मार्किंग देखील व्यवस्थित केलेले नाही. दुसरा प्रश्न असा आहे की, चालक रस्त्यांवरील सूचक चिन्हांचे पालन करतात का?

जर आपण तपासून पाहिले तर, भारतातील रस्त्यांची पायाभूत सुविधा ही रस्त्यांवर चालताना दिसणारी बेशिस्तपणा इतकी मोठी समस्या नाही. अशा परिस्थितीत, राज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कालांतराने, भारतात रस्त्यांच्या परिस्थितीत आणि वाहनांच्या वेगात मोठे बदल झाले आहेत, परंतु परवाना नियम कमी-अधिक प्रमाणात तेच राहिले आहेत. हाय-स्पीड वाहनांच्या आणि एक्स्प्रेसवेच्या संख्येत वाढ होत असताना परवाना प्रक्रिया अद्यापही गतिमान राहिलेली नाही. देशाच्या बहुतेक भागांमध्ये, ड्रायव्हिंग चाचण्या ही फक्त एक औपचारिकता असते ज्यामध्ये वाहन उलट करणे किंवा मर्यादित क्षेत्रात पार्क करणे यासारख्या कौशल्यांची चाचणी घेतली जाते. अनेक अर्जदारांची प्रत्यक्ष रस्त्यांची परिस्थिती, रात्रीचे वाहन चालवणे, महामार्गांचे विलिनीकरण किंवा आपत्कालीन प्रतिसाद यांसारख्या निकषांवर चाचणी घेतली जात नाही. त्याहूनही वाईट म्हणजे अनेक परवाने कोणत्याही छाननीशिवाय दिले जातात आणि मध्यस्थ लाच देऊन काम पूर्ण करतात. या आघाडीवर प्रशासकीय दिरंगाई दूर करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.


भारताच्या तुलनेत, विकसित देशांमध्ये परवाना प्रक्रिया खूपच व्यापक आणि कडक आहे. जर्मनीमध्ये अनिवार्य वर्ग सूचना, सिम्युलेटरमधील आभासी प्रशिक्षण आणि काही तासांच्या पर्यवेक्षित ड्रायव्हिंगनंतर ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. अशा परिस्थितीत भारताची परवाना रचना केवळ जुनीच नाही तर धोकादायकही बनली आहे. यामुळे नवशिक्या वाहनचालकांना रस्त्यावर येण्याची संधी मिळते आणि अपघातांना आमंत्रण मिळते. अपघात रोखण्याच्या दिशेने पहिले पाऊल असण्याऐवजी, ते त्यांना प्रोत्साहन देण्याचे एक साधन बनले आहे. अशा संगनमताने चालणाºया परवाना प्रक्रियेपासून मुक्तता मिळवणे आवश्यक झाले आहे.

देशातील परवाना प्रक्रिया सुधारण्यासाठी, ती औपचारिकतेतून बाहेर काढून वास्तवाच्या कक्षेत आणावी लागेल. नवीन प्रक्रिया अधिक डिजिटल आणि प्रमाणित असावी आणि अशी असावी की त्यात चुकांना वाव राहणार नाही. सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या सर्व बाबींची सखोल तपासणी केली पाहिजे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप असावा. देशात स्वयंचलित ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक बांधले पाहिजेत जिथे सेन्सर्सद्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग शक्य आहे. परवाना आधार बायोमेट्रिकशी देखील जोडला पाहिजे आणि परवान्यांची डुप्लिकेशन आणि बनावट ओळख टाळण्यासाठी एक केंद्रीकृत डेटाबेस तयार केला पाहिजे. अशा प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये एकसारख्या असाव्यात आणि कामगिरी, नूतनीकरण आणि दंडाच्या तरतुदींचा समावेश असलेल्या एका सामान्य राष्ट्रीय परवाना चौकटीशी जोडल्या पाहिजेत. ड्रायव्हिंग स्कूलचे नियमित आॅडिट व्हायला हवे आणि त्यांच्या कामगिरीचे सार्वजनिक रेटिंग व्हायला हवे.


परवाना देण्यानंतरही, नियमांचे पालन आणि जबाबदारीच्या पातळीवर कोणताही हलगर्जीपणा होऊ दिला जाऊ शकत नाही. कोणत्याही निष्काळजीपणासाठी, चालक आणि संबंधित अधिकाºयांना शिक्षा करणे आवश्यक असेल. ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित आणि जलद पूर्ण करावी. व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीत मानके आणखी उच्च ठेवावी लागतील आणि त्यांच्या नियमित नूतनीकरणावर देखील लक्ष ठेवावे लागेल. नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी एक प्रभावी तक्रार निवारण यंत्रणादेखील स्थापन करणे आवश्यक आहे. या सर्व उपाययोजनांचा एकत्रितपणे अवलंब केल्यास रस्ते अपघात कमी होण्यास मदत होऊ शकते.

सोमवार, २१ एप्रिल, २०२५

उदारमतवादी धोरण स्विकारणे योग्य


आंतरराष्ट्रीय संबंधांचे वाहन केवळ परस्पर हितसंबंधांच्या इंधनावरच पुढे सरकते. जागतिक परिस्थितीत होत असलेल्या बदलांनुसार, देशांना त्यांच्या धोरणांची दिशा बदलावी लागेल, जेणेकरून त्यांचे हितसंबंध पूर्ण होत राहतील. येथे पुन्हा एकदा हे सांगणे योग्य ठरेल की, या जगात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नाही. इथे फक्त हितसंबंध शाश्वत आहेत.


भारतालाही या वास्तवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामध्ये त्याने आर्थिक-व्यावसायिक आणि धोरणात्मक आघाड्यांवर निर्माण झालेल्या लाटांच्या चक्रव्यूहातून स्वत:ला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हितसंबंधांचा संघर्ष अनेक पैलूंमधून पाहता येतो. जसे डोनाल्ड ट्रम्प अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचे जवळचे मित्र म्हणतात, परंतु त्यांनी शुल्क लादण्यास मागेपुढे पाहिले नाही. मोदी आणि शी जिनपिंग यांच्याबाबतीतही असेच काहीसे दिसून आले, जिथे वैयक्तिक संबंधांचे धागे सीमेवर तणाव वाढण्यापासून रोखू शकले नाहीत.

यावेळी, आर्थिक-व्यावसायिक आणि धोरणात्मक आघाड्यांवर उद्भवणाºया आव्हानांसाठी भारताने त्यांची सर्व शक्ती त्यांच्याशी सामना करण्यासाठी केंद्रित करण्याची मागणी केली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक एकता राखणे खूप महत्त्वाचे असेल. अशा परिस्थितीत, सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय शक्तींची जबाबदारी बनते की, त्यांनी असे काहीही करू नये, ज्यामुळे विविध गटांमधील सुसंवाद बिघडतो. अशी विभागणी भाषेच्या किंवा प्रदेशाच्या आधारावर असो किंवा इतर कोणत्याही आधारावर असो.


सध्या काही राजकीय गट मध्ययुगीन इतिहासाचे थर उलगडण्यात व्यस्त आहेत, जे आपल्या हितसंबंधांना हानी पोहोचवू शकतात. मध्ययुगीन काळात दहशतवादी आक्रमकांनी ज्या पद्धतीने हिंदूंच्या प्रार्थनास्थळांचा नाश केला, त्याची वेदना आजही समाजाच्या मनात खोलवर वेदना निर्माण करते हे खरे आहे. एक हिंदू म्हणून कोणालाही याचा राग येतो, पण एक भारतीय म्हणून मी नेहमीच भावनांपेक्षा भारताच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. ही भावना आपल्याला भूतकाळात रमण्याऐवजी वर्तमान आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करते.

भारताचे हित लक्षात घेऊन, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नेत्यांनी ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेली प्रशासकीय व्यवस्था चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश राजवटीतील छळाच्या कटू आठवणीही त्यांचे मन बदलू शकल्या नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाºया महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी मान्य केले की, भारतातील स्थिरतेसाठी, ब्रिटिश सैन्य, पोलीस, नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत सक्रिय असलेल्यांची सेवा सुरू राहील. स्वतंत्र भारतात ब्रिटिश राजवटीची कोणतीही चिन्हे दिसू नयेत ही धारणा पटेलांनी स्पष्टपणे नाकारली. ब्रिटिशांनी भारतावर राज्य केल्यापासून गेल्या १५० वर्षांत, ब्रिटिश विचारसरणी राजकीय क्षेत्रात पसरली होती. अशा परिस्थितीत, पटेल यांनी संसदीय राजकीय व्यवस्थेशी छेडछाड करण्याचा विचार नाकारला. त्यांनी आणि इतर नेत्यांनी कधीतरी ब्रिटिशांना त्यांच्या दहशतीबद्दल आणि जुलुमाबद्दल माफ केले असते यात काही शंका नाही, परंतु भारताच्या हितासाठी त्यांनी या भावनांकडे दुर्लक्ष करणेच योग्य मानले. भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन भागाबद्दलही असाच दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे.


भूतकाळात अनेक भयानक चुका झाल्या आहेत, परंतु आज विकास आणि धोरणात्मक समन्वयासाठी राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे. यासाठी जुन्या जखमा पुन्हा उघडू नयेत. मध्ययुगीन भारतातील इस्लामिक राजवटीत काही व्यक्ती आणि वर्ग इस्लामिक शासकांना विरोध करत असताना, काही त्यांचे सहयोगीही बनले हे तथ्यही दुर्लक्षित करता येणार नाही. मुस्लीमेतर लोकही मुस्लीम झाले. या मुद्द्यांकडे जास्त लक्ष दिल्याने वाद निर्माण होतात. अलीकडेच, आपल्या एका महान नायकाच्या बाबतीत, राणा सांगा यांच्याबाबतीत एका खासदाराने असेच काहीसे केले. अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दालीविरोधात सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखालील पेशव्यांच्या सैन्याच्या बाबतीतही अशीच भीती निर्माण होऊ शकते. इतिहासातील लोकांच्या योगदानाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये खोदकाम केल्याने हिंदूंमधील सामाजिक ऐक्य कमकुवत होऊ शकते. जर एखाद्याला हिंदूंना राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्र करायचे असेल तर त्याला भूतकाळातील जखमा खोदण्यात अडचण येऊ शकते.

पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये जे म्हटले आहे त्यावरून असे दिसून आले की, ते मुघलांना ब्रिटिश किंवा इतर युरोपीय शक्तींप्रमाणेच वसाहतवादी मानसिकता मानतात. हे खरे आहे की, ज्याप्रमाणे काही भारतीयांनी इंग्रजांशी संगनमत केले, त्याचप्रमाणे काही बिगरमुस्लिमांनीही मुघलांना पाठिंबा दिला. त्यांच्याकडे त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात उच्च पदे होती. काहींसोबत वैवाहिक संबंधही बांधले गेले. तथापि, याचा अर्थ असा नाही की, भारतीय राज्याने वेगवेगळ्या वर्गांच्या परंपरांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू नयेत. जरी हिंदू समाजात अनेक सामाजिक विसंगती आहेत, धार्मिक विभाजने असू शकतात, परंतु धार्मिक विभाजनांचे दरवाजे शतकानुशतके बंद झाले आहेत. तर इतर पंथ आणि धर्मांमध्ये असे नाही. सामाजिक सुधारणांना नेहमीच वाव असतो. सुधारणा हीदेखील एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि भारतीय लोकसंख्येमध्ये हिंदू समुदाय सर्वात मोठा असल्याने, सुधारणांद्वारे असे एक आदर्श उदाहरण सादर करण्याची त्यांची जबाबदारी आणखी मोठी होते की, त्यांच्या तत्त्वांमध्ये आणि वर्तनात कोणताही फरक राहणार नाही. हे स्पष्ट आहे की, आपण मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे विचार केला पाहिजे. यासाठी केवळ हिंदूंनीच नव्हे तर संपूर्ण भारताने उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारणे योग्य ठरेल.

भाजप तामिळनाडूत झेंडा फडकवणार


भारतीय जनता पक्ष पारंपरिकपणे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कमकुवत राहिला आहे, परंतु आता भाजप केवळ दक्षिणेतच आपली मुळे मजबूत करू इच्छित नाही तर दक्षिणेकडील राज्यांमध्येही सत्ता काबीज करू इच्छित आहे. पुढील वर्षी एप्रिल २०२६ मध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीबाबत तामिळनाडूमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. भाजप आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांनी २०२६च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी चेन्नईच्या त्यांच्या महत्त्वाच्या भेटीदरम्यान या महत्त्वाच्या राजकीय आघाडीची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, राज्यातील एनडीएचे नेतृत्व एडप्पाडी के पलानीस्वामी करतील. ते पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतील, तर राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आघाडीचा चेहरा असतील. तामिळनाडू भाजपमध्येही मोठा बदल झाला आहे आणि नैनार नागेंद्रन यांना भाजपच्या तामिळनाडू युनिटची कमान मिळाली आहे. २०२६च्या तामिळनाडू निवडणुका भाजपच्या राजकीय प्रवासात एक मैलाचा दगड ठरतील; ते अनेक वर्षांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि कमळ फुलवेल अशी त्यांना आशा आहे.


दक्षिणेत हिंदू मंदिरे आणि संस्कृतीचे वर्चस्व असूनही, भाजपला आतापर्यंत आपला पाया मजबूत करता आलेला नाही हे सर्वज्ञात सत्य आहे. केरळ असो, कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो किंवा तामिळनाडू असो, भाजप आपली मुळे मजबूत करण्यासाठी धडपडत आहे. दक्षिणेत भाजपचे प्रयत्न निष्प्रभ ठरले आहेत हे खरे नाही; वेळोवेळी त्यांच्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळत आहेत. दक्षिणेतील चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने आपला प्रभाव आणि वर्चस्व दाखवले आहे. कर्नाटकात भाजप अनेक वेळा सत्तेत आहे, सध्या आंध्र प्रदेशात सत्तेत भागीदार आहे, तेलंगणामध्येही भाजपने मजबूत पकड निर्माण केली आहे, तामिळनाडू हे एकमेव राज्य आहे जिथे अनेक दशकांपासून अस्तित्व असूनही भाजप सत्तेपर्यंत पोहोचू शकलेला नाही. मोदींचा प्रभाव आणि भाजपकडे प्रचंड संसाधने असूनही, तामिळनाडू जिंकणे भाजपसाठी कठीण झाले आहे. गेल्या ७८ वर्षांत, भाजप-आरएसएसची राष्ट्रवादी विचारसरणी किंवा त्यांच्या हिंदुत्वाच्या आवृत्तीला येथे कधीही स्वीकारण्यात आलेले नाही. ही केवळ भाजपसाठीच नाही तर राष्ट्रीय राजकारणासाठीही एक मोठी वैचारिक लढाई आहे. पण यावेळी, भाजपच्या रणनीती आणि तयारीत तसेच मोदी-शाह यांच्या दृढनिश्चयात आणि हेतूंमध्ये ताकद आहे; तामिळनाडूमध्ये एक आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये भाजपच्या राजकीय रणनीतीमध्ये केलेले बदल आणि रणनीती हे एक मोठे वळण आहे, एक नवीन प्रकाश आहे. राजकारणातील चाणक्य अमित शाह यांचा असा विश्वास आहे की, एनडीए येत्या विधानसभा निवडणुका मोठ्या बहुमताने जिंकेल आणि राज्यात सरकार स्थापन करेल, अर्थात, हे निराधार विधान नाही. भाजपचे नेते अभ्यासाशिवाय बोलत नाहीत.

१९९८ पासून अण्णा द्रमुक आणि भाजपमधील युती निर्माण होत आहे आणि तुटत आहे. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार स्थापन करण्याचे आणि नंतर १३ महिन्यांनी ते पाडण्याचे श्रेयही अण्णा द्रमुकला जाते. जयललिता जिवंत असेपर्यंत जे. एआयएडीएमके भाजप नेतृत्वाच्या जवळ राहिले. १९९९ मध्ये जयललिता यांनी काँग्रेसशी युती केली तेव्हा करुणानिधींनी भाजपसोबत द्रमुकशी हातमिळवणी केली आणि २००४ पर्यंत सत्ता उपभोगली. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अण्णा द्रमुकने पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली, पण तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या जागा जिंकू शकले नाहीत. पण मोदी आणि शाह यांनी नेहमीच या राज्यावर लक्ष ठेवले. तामिळनाडू हे धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील राज्य असल्याने, त्याचे श्रीलंकेशी थेट संबंध आहेत. चीनला श्रीलंकेतून भारतात प्रवेश करायचा आहे. अशा परिस्थितीत, तामिळनाडूमध्ये केंद्रीय सत्तेला आंधळेपणाने विरोध करणारा पक्ष देशाच्या हितासाठी गंभीर प्रश्न उपस्थित करतो आणि अनेक संकटांचे कारण बनू शकतो. यासाठी तामिळनाडूतून सध्याच्या सत्ताधाºयांना हटवणे देशहितासाठी आवश्यक आहे. इंडिया आघाडीतील घ टक पक्ष असलेले बहुतेक जण हे शत्रूला फितूर होणाºया प्रवृत्तीचे आहेत. राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस पाक दहशतवादपुरस्कृत काश्मीरमधील फुटीरतावाद्यांबरोबर आहे, तर ममता बॅनर्जी बांगलादेशींना जवळ करणाºया आहेत. तोच प्रकार तामिळनाडूच्या स्टॅलिनचा आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसºया कार्यकाळात बंगाल, तामिळनाडू आणि केरळ जिंकणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. या राज्यांमध्ये भाजपचा विजय हा एक चमत्कार असेल, परंतु मोदी-शाह असे आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणत आहेत. भाजपसाठी तामिळनाडू हे केवळ राजकीय संघर्षाचे रणांगण नाही हे सर्वज्ञात आहे; एक वैचारिक लढाईही लढावी लागेल. स्टॅलिन सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाला वादग्रस्त बनवल्याने आणि हिंदी लादण्याचा प्रयत्न म्हणून त्रिभाषा तत्त्वाचा प्रचार केल्याने केंद्र सरकार दुखावले आहे. म्हणूनच भाजप त्यांच्या राजकीय तत्त्वांना, योजनांना, कार्यक्रमांना आणि धोरणांना गंभीरपणे आव्हान देणाºया वैचारिक आधारावर या नेत्यांना आणि पक्षांना पराभूत करण्याचा मार्ग शोधत आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटी आणि इतर चर्चांमध्ये सांगत आहेत की, संपूर्ण तामिळनाडू आणि राज्यातील जनता त्यांच्या हृदयात आहे आणि ते त्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी तयार आहेत. तमिळी लोकांची मने जिंकण्याचे काम एकट्या भाजपला शक्य नाही, म्हणूनच त्यासाठी अण्णा द्रमुकचा पाठिंबा आवश्यक आहे.

अण्णा द्रमुक आणि भाजपमधील नवीनतम युतीची घोषणा ही भाजपच्या राजकीय समीकरणांच्या अर्थपूर्ण निकालाचा एक भाग आहे. या युतीला सुरळीत बनवण्याचे आणि पक्षाच्या मताप्रमाणे आकार देण्याचे श्रेय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, कारण यावेळी हे काम इतके सोपे नव्हते. शाह एक मजबूत नेता असल्याने, त्यांना राजकीय गणितही चांगले माहीत आहे. ते समजून घेण्यात तज्ज्ञ आहेत. अमित शाह यांना नेहमीच वास्तवाची जाणीव असते. त्यांच्याकडे तामिळनाडूचे स्पष्ट चित्र आणि स्पष्ट अजेंडा आहे. त्यांना आतापासून एआयएडीएमकेसोबत उदारमतवादी आणि लवचिक राहायचे आहे, पण त्यांना त्याचे ध्येय माहीत आहे. द्रमुक आणि स्टॅलिनचा अहंकार हे त्यांचे मुख्य शस्त्र असेल. जर विकासासाठी जनतेसाठी सत्ता परिवर्तन आवश्यक असेल, तर ते कसे साध्य करायचे हे अमित शाहांपेक्षा चांगले कोणाला माहिती असेल?

रविवार, २० एप्रिल, २०२५

राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रुपांतर


अलीकडेच, देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने अनेक कार्यक्रम झाले. यामध्ये प्रसिद्ध लोकांचा सहभाग दिसून आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाला काळानुसार व्यापक मान्यता मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जोपर्यंत आपण भारतरत्न बाबासाहेबांची मूल्ये आणि तत्त्वे आपल्या जीवनात समाविष्ट करत नाही तोपर्यंत त्याचे व्यापक उद्दिष्ट अपूर्ण राहील. यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचे सार समजून घ्यावे लागेल की त्यांना कोणत्या प्रकारचा आदर्श भारत निर्माण करायचा होता. यासंदर्भात, संविधान सभेतील त्यांचे समारोपाचे भाषण अतिशय उल्लेखनीय म्हणता येईल.


या भाषणात, त्यांनी देश आणि तेथील नागरिकांसाठी राष्ट्रीय एकता आणि आर्थिक प्रगती मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका कशी बजावावी याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. जेणेकरून लोकशाही राष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण होईल आणि लोकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करता येईल. या दृष्टिकोनातून, त्यांच्या सूचना राष्ट्रीय धोरणाला आकार देण्यासाठी कशा आधार बनल्या आणि त्यामुळे भारत विविध क्षेत्रात प्रगती कशी करू शकला हेही विचारात घेणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, आपण केवळ राजकीय लोकशाहीवर समाधानी राहू नये. आपल्याला राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर करावे लागेल. अन्यथा राजकीय लोकशाही फार काळ टिकू शकत नाही. शेवटी सामाजिक लोकशाही म्हणजे काय? यावर त्यांचे मत असे होते, ‘याचा अर्थ असा आहे की, अशी जीवनशैली जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनाची तत्त्वे म्हणून मान्यता देते.’


समानतेचा अभाव अनेक समस्यांना जन्म देईल, परंतु बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समानता नैसर्गिकरीत्या अबाधित राहणे शक्य होणार नाही. हे आदर्श लक्षात घेऊन, डॉ. आंबेडकरांनी मूलभूत हक्कांची हमी दिली. या क्रमाने, सामाजिक परिस्थितीत समानता निर्माण करण्यासाठी अस्पृश्यता निर्मूलन, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण आणि इतर घटनात्मक हमी देण्यात आल्या. संविधान लागू झाल्यापासून, आपल्या लोकशाहीला सामाजिक लोकशाही बनवण्यासाठी लागोपाठच्या सरकारांनी सतत प्रयत्न केले आहेत. दलित आणि इतर वंचित घटकांना हमी देण्याव्यतिरिक्त, गरिबी निर्मूलन आणि जीवनमान सुधारण्यासाठी गृहनिर्माण, पिण्याचे पाणी, रोजगार, शिक्षण आणि स्वयंपाकाचा गॅस यासारख्या योजनांद्वारे त्यांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी, राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.

देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुंतागुंती लक्षात घेता, जेव्हा संविधान अस्तित्वात आले तेव्हा त्यात आठ अनुसूची आणि ३९५ कलमे होती. त्या तुलनेत, इतर देशांची राज्यघटना खूपच लहान आहे. अमेरिकेच्या संविधानात फक्त सात कलमे आहेत. अंमलबजावणीच्या वेळी, कॅनडाच्या संविधानात १४७ कलमे होती, दक्षिण आफ्रिकेच्या संविधानात १५३ कलमे होती आणि आॅस्ट्रेलियन संविधानात १२८ कलमे होती. या पैलूंबद्दल माहिती असलेल्या लोकांनी तक्रार केली की, भारतीय संविधान खूप तपशीलवार आणि कठीण आहे. त्यावर अनेक घटकांनी टीकाही केली. यामध्ये पाश्चात्त्य विद्वान आणि त्यांचे प्रभाव विशेषत: सहभागी होते. टीकाकारांचा असा युक्तिवाद होता की, संविधान इतके लांब आणि शब्दबद्ध आहे की ते सामान्य नागरिकांना समजू शकत नाही. एका टीकाकाराने म्हटले आहे की, त्यात १.४६ लाख शब्द आहेत, तर अमेरिकन संविधान फक्त ४,५४३ शब्दांचे आहे. काही टीकाकारांनी संविधानात शंभरहून अधिक दुरुस्त्या केल्याबद्दल टीका केली आहे.


तथापि, जर आपण गेल्या ७८ वर्षांच्या प्रवासाकडे पाहिले तर अशी टीका अनावश्यक वाटते. याची अनेक कारणे सांगता येतील. लक्षात ठेवा की जगातील सर्वात वैविध्यपूर्ण समाज असलेला भारत खरोखरच एक गतिमान लोकशाही देश आहे. बहुसंख्य हिंदूंमध्ये सुमारे ६,००० जाती आहेत, त्यापैकी ३,५०० जाती ओबीसीअंतर्गत येतात. जातीची ही व्याप्ती इस्लाम, ख्रिश्चन आणि इतर पंथ आणि धर्मांमध्येही पसरलेली आहे. भारतात अनेक भाषा आणि बोलीभाषा प्रचलित आहेत. भारत हे जगातील बहुतेक धर्मांचे मूळ स्थान आहे आणि इस्लाम आणि झोरोस्ट्रियन धर्मासारख्या अनेक पंथ आणि धर्मांचे आश्रयस्थानही राहिले आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य भागात राहणाºया लोकांच्या चेहºयाच्या वैशिष्ट्यांमध्येही काही फरक दिसून येतो. डॉ. आंबेडकर आणि संविधान सभेतील इतर सदस्यांना या वास्तवाची जाणीव होती आणि त्यांनी एक असे संविधान तयार केले ज्याने विविध गटांना एकत्र आणून राष्ट्राला एकसंध ठेवण्यास मदत केली. त्याची अंमलबजावणी संविधान निर्मात्यांच्या प्रयत्नांचे यश दर्शवते.

संविधानातील सुधारणांवर टीका करणाºयांनी हेही समजून घेतले पाहिजे की, संविधानाच्या निर्मात्यांनी हे सुनिश्चित केले की, संविधान काळ आणि परिस्थितीनुसार आकार घेत राहील. त्यांनी संविधान कडक करण्याऐवजी लवचिक बनवले. यासाठी त्यांनी अमेरिकन संविधानाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या जेफरसन यांच्याकडून प्रेरणा घेतली, ज्यांनी म्हटले होते की, आपण प्रत्येक पिढीकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले पाहिजे आणि पुढच्या पिढीला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही.


संविधानाच्या निर्मितीमध्ये मानवी स्वभावाची अद्भुत समज समाविष्ट केल्याबद्दल आपले संविधान निर्माते कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच १९४७ मध्ये ३५ कोटी भारतीयांना लक्षात घेऊन तयार केलेला एक दस्तऐवज आजही १४५ कोटी भारतीयांसाठी प्रासंगिक आहे. त्यांना एकत्र ठेवणे आणि सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाकडे सकारात्मक वाटचाल करण्यास सक्षम करणे.

म्हणूनच, ज्यांना आपल्या संविधानात दोष आढळतात ते केवळ थट्टेचे विषय आहेत आणि त्यांनी स्वत:चे काम करावे. या टीकाकारांना हे माहीत नाही की, आपल्या संविधान निर्मात्यांनी त्यांचे काम इतके चांगले केले की, त्यांनी आपल्याला असे संविधान दिले जे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय एकतेचे पालनपोषण करते.

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

मुद्रा योजना सर्वसामान्यांना वरदान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक हित, स्वयंरोजगार आणि आर्थिक विकास लक्षात घेऊन सुरू केलेल्या पीएम मुद्रा योजनेला या महिन्यात १० वर्षे पूर्ण झाली. अलीकडेच, रुद्रप्रयागच्या जिल्हा दंडाधिकाºयांनी मुद्रा योजनेच्या अनेक यशोगाथा सांगितल्या, ज्यात त्यांनी सांगितले की, ही योजना दुर्गम डोंगराळ भागातील लोकांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे, रोजगार निर्माण करत आहे आणि स्थलांतराला आळा घालत आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे. उत्तर प्रदेश आणि बाकी राज्यात जास्तीत जास्त तरुण, महिला याचा लाभ घेत आहेत. त्याबाबतीत महाराष्ट्रातील यशोगाथा समोर येताना दिसत नाहीत. ही उदासिनता जाणे आवश्यक आहे. मराठी तरुणांनी या शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. राजकारणातून आणि फसवे नेरेटिव्ह सेट करणाºया राजकारणापासून अलिप्त राहून स्वत:च्या विकासाचा मार्ग युवकांनी निवडला पाहिजे.


उत्तर प्रदेशातील या यशोगाथेमध्ये जाखोलीच्या सेमलता भरदार येथील रहिवासी सोबत सिंग यांना नोकरीसाठी घराबाहेर राहावे लागले. त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन लोणचे उत्पादन व्यवसाय सुरू केला आणि आज ते आणखी चार लोकांना रोजगार देत आहेतच, यासोबतच त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. त्याचप्रमाणे, नगरासू येथील मवाना गावातील रहिवासी इंदू देवी यांनीही पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे गृहिणी ते उद्योजक होण्याचा प्रवास केला. तिने मवाना येथे एक फॅब्रिकेशन वर्क युनिट स्थापन केले, ज्यामध्ये ती स्वत:सह इतर अनेक महिलांना रोजगार देत आहे. बिंदू नावाची एक महिला, जी पूर्वी दररोज ५० झाडू बनवत असे, आता ५०० झाडू बनवणारी युनिट चालवते. हे आपल्याकडे का घडताना दिसत नाहीये? आपल्याकडचा तरुणवर्ग हा सोशल मीडियावर अडकला आहे आणि सरकारने आम्हाला रोजगार द्यावा म्हणून याचना करत आहे. फक्त नोकरी म्हणजेच रोजगार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ओडिशा, आसाम, नागालँड, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात अशा सर्व राज्यांत या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परंतु महाराष्ट्रात या योजनेबाबत फारसे कोणी बोलताना दिसत नाही. आम्ही पुरोगामी म्हणून नुसत्या बढाया मारायच्या आणि काही करायचे नाही यात कसले आले आहे भूषण?

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या यशाचे दर्शन घडवणाºया अशा अनेक कथा आहेत. जेव्हा दुर्गम पर्वतांमध्ये आणि कठीण परिस्थितीत परिस्थिती बदलत असते, तेव्हा ही योजना किती परिवर्तनकारी आहे हे समजू शकते. हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान या योजनेद्वारे सामान्य लोकांना सक्षम बनवू इच्छितात, जेणेकरून त्यांना कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहावे लागू नये. जेव्हा तुम्ही जमिनीवर वास्तवात असता तेव्हा पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो.


पूर्वी गरीबांसाठी बँकांचे दरवाजे बंद राहिल्यामुळे लोकांना वेळेवर उपचार, शेती किंवा इतर कोणत्याही कामासाठी पैसे जमवण्यासाठी कसे संघर्ष करावा लागत असे. गरिबांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त व्याजदराने कर्ज देणाºया सावकार लोकांवर अवलंबून राहावे लागत असे आणि नंतर ते त्या सापळ्यात अडकत असत. जेव्हा आपल्याला बँकांकडून कर्ज मिळू लागले, तेव्हाही कर्ज मिळविण्यासाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला आणि जामीनदार शोधावा लागला. जेव्हा दलाल कर्जाची व्यवस्था करण्यात मदत करायचे, तेव्हा त्यांनी मोठे कमिशनही घेतले. आता हे सर्व भूतकाळात जमा झाले आहे. मुद्रा योजनेतून शिशू आणि मध्यम स्वरूपातील कर्ज सहज उपलब्ध होत आहेत. रोजगारासाठी लागणारे भांडवल जमा करणे शक्य होत आहे, याचा फायदा तरुणांनी घेतला पाहिजे.

विशेष म्हणजे मुद्रा योजनेत कोणाच्याही हमीची आवश्यकता नाही. याअंतर्गत ५० हजार ते २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते आणि तेही हमीमुक्त. या योजनेचा परिणाम असा आहे की, आता आपला देश नोकरी शोधणाºयांऐवजी नोकरी देणारे निर्माण करत आहे. गेल्या १० वर्षांत ५३ कोटींहून अधिक कर्जे मंजूर करण्यात आली, ज्याअंतर्गत अंदाजे ३३ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. सुमारे ६८ टक्के लाभार्थी महिला आहेत आणि ५० टक्के अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय आहेत.


फळे आणि फुले विक्रेते, भाजीपाला विक्रेते, चहाच्या दुकानदारांपासून ते विणकर आणि लघु उद्योगपतींपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेत आहेत. ते त्यांची स्वप्ने पूर्ण करत आहेत आणि इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. जे लोक या योजनेची खिल्ली उडवायचे, ते आज, जरी ते शांतपणे बोलत असले तरी, रोजगार निर्मितीतील हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग मानतात. पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे जमिनीवर आलेला सकारात्मक बदल आकड्यांमध्ये मोजणे कठीण आहे. देशाच्या कानाकोपºयात मग ते गाव असो वा शहर, मुद्रा योजनेचा लाभ घेऊन लोक प्रगती करताना दिसतात.

मुद्रा योजना ही महिला सक्षमीकरणाचे एक प्रमुख माध्यम बनली आहे. महिला आता उद्योजक होण्याचे स्वप्न जगत आहेत. महिला शक्तीने मुद्रा योजनेचे स्वागत केले आहे. एकीकडे यामुळे महिलांमध्ये काहीतरी करण्याची जिद्द वाढली आणि दुसरे म्हणजे, त्या आर्थिक कामांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ शकल्या. ज्या राज्यांनी मुद्रा कर्जात महिलांचा वाटा वाढवला, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईद्वारे लक्षणीय रोजगार निर्मिती केली आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तिने आपला व्यवसाय वाढवला आहे आणि इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हा एक मोठा बदल आहे. मुद्रा योजनेमुळे व्यवसायाचा विस्तार लहान शहरे आणि खेड्यांमध्ये झाला आहे. आऊटकम्स आॅफ मोदीनॉमिक्स २०१४-२४ या अहवालानुसार, २०१४ पासून दरवर्षी किमान ५.१४ कोटी नवीन नोकºया निर्माण झाल्या आहेत, ज्यामध्ये २०१४ पासून केवळ मुद्रा योजनेमुळे दरवर्षी सरासरी २.५२ कोटी कायमस्वरूपी नोकºयांची भर पडली आहे.


दहशतवाद आणि फुटीरतावादाने ग्रासलेल्या आणि दहशतवादी मालकांनी तरुणांना दिशाभूल केलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्येही २० लाखांहून अधिक मुद्रा कर्जे देण्यात आली आहेत. यामुळे तिथले तरुणही फुटीरतावाद नाकारून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. या योजनेमुळे सीमावर्ती गावांमध्येही लोकसंख्या वाढत आहे आणि स्थलांतरही कमी झाले आहे. मुद्रा योजनेचा अधिक प्रचार करणे आवश्यक आहे, विशेषत: गावे आणि शहरांमध्ये, कारण ती ग्रामीण उद्योगांना एक नवीन दिशा देऊ शकते आणि ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करू शकते. रोजगार निर्मितीसाठी दूरदर्शी मुद्रा योजना केवळ क्रांतिकारी ठरत नाही तर ग्रामीण गरिबांचे जीवनमानदेखील उंचावत आहे.

तिरस्काराचा निर्धार


बुधवारी नाशिकमध्ये उबाठा शिवसेनेचा मेळावा झाला. त्यात एआय तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपातून, त्यांच्यासम आवाजातून विचार मांडण्याचा प्रयत्न झाला. पण एकंदरीतच हा मेळावा उबाठा शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर भाजप तिरस्काराचा निर्धार करण्यासाठी होता हे दिसून आले. पण, तिरस्कारातून काही साध्य होत नाही तर विकासात्मक कार्यक्रम आपल्या हाती असेल, तरच मतदार जवळ करतात हे लक्षात घेण्याची गरज आहे. तिरस्काराच्या राजकारणातून राहुल गांधी काँग्रेसची वाताहात लावत असताना उबाठा शिवसेनाही त्याच दिशेने चालली आहे याचे वाईट वाटते.


या एआय तंत्रज्ञानाच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणातून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचेच विचार दिसत होते. कारण बाळासाहेबांचे भाषण महाराष्ट्राने ऐकलेले आहे. ते कधी असे टोमणे मारणारे भाषण करत नव्हते, तर परखडपणे स्पष्टपणे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता बोलत होते. पण गेल्या दहा वर्षांत जी नवी पिढी राजकारण पाहते आहे आणि ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकली नाहीत, त्यांना बुधवारच्या एआय कृत भाषणावरून प्रश्न पडला असेल की, एवढे महान व्यक्तिमत्त्वही असेच भाषण करत होते का? हा खºया अर्थाने बाळासाहेबांना लहान करण्याचा, त्यांचे अवमूल्यन करण्याचा प्रकार होता. त्यामुळे या मेळाव्यात एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांचा अपमानच केला असे म्हणावे लागेल.

रोज सकाळी कॅमेºयापुढे येऊन संजय राऊत जे बोलतात तेच एआयच्या भाषणात मुद्दे आले होते. त्यातला एक मुद्दा म्हणजे आम्ही भाजपला मोठे केले. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने बोलत आहेत की, भाजपला फडणवीसांना मिसरूडही फुटले नव्हते, तेव्हापासून शिवसेना आहे आणि आम्ही भाजपला मोठे केले. पण संजय राऊत आणि शिवसेना उबाठाला संपूर्ण महाराष्ट्राचा एक प्रश्न आहे की, जर तुम्ही भाजपला मोठे केले, तेवढी तुमची ताकद होती तर तुम्ही का मोठे झाला नाहीत? तुम्ही का संपत चालला आहात? राजकारणात कोणी कोणाला मोठा करत नसतो, प्रत्येकाला स्वत:ला मोठे व्हायचे असते. शिवसेना अजून संपूर्ण महाराष्ट्रातही पोहोचलेली नाही, पण भाजप राष्ट्रीय पातळीवरचा मोठा पक्ष आहे. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडीशा तसेच इशान्येकडील राज्यात सगळीकडे तो पसरला आहे. अगदी कोणत्याही पक्षाला पाय रोवता येत नाहीत अशा प. बंगालमध्येही तो मोठा पक्ष आहे, तिथे तर शिवसेना कुठेच नाही. शिवसेनेने मोठे केला असते तर अन्य राज्यात कोणी मोठे केले? त्यांनी आपली कामगिरी शिस्तबद्दपणे केली, संघटन कौशल्य दाखवले, कोणाला टोमणे मारत बसले नाहीत, एकमेकांना भेटत राहिले आणि पक्ष मोठा झाला. त्यामुळे भाजपला आम्ही मोठे केले असे म्हणणे सोडावे आणि आपण मोठे होऊ का कसे होता येईल हे पाहावे.


विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही इतकी विसंगती होती की, त्यांना मुद्दे पुरवणाºया, फिडिंग करणाºयांची कीव करावीशी वाटते. काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे ते आपल्या भाषणात बोलत होते. त्यात काँग्रेस आणि संघाची तुलना केली. आता काँग्रेस आणि भाजपची तुलना करायची की संघाची? म्हणजे एकीकडे राहुल गांधी भाषणात बोलतात संघाला आपल्याला हरवावे लागेल. म्हणजे जणू काही संघ निवडणुकीच्या मैदानात आहे. तीच स्क्रिफ्ट उद्धव ठाकरे वाजवतात? संघाला अध्यक्ष, सरसंघचालक कोण असावा याची चर्चा करण्यापेक्षा त्यांनी विचार केला पाहिजे की, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाला आपण दुसरा शिवसेनाप्रमुख देऊ शकलो नाही. त्या पदाला आपण पात्र नाही, असे सांगून ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष देसाई, मनोहर जोशी आणि वरिष्ठांनी शिवसेनाप्रमुख होऊ दिले नाही. त्यांच्यासाठी दुसरे पद निर्माण केले आणि शिवसेनाप्रमुखपद गोठवले. तिथेच शिवसेना संपली होती हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या निर्धार मेळाव्यात उबाठा शिवसेना वाढवण्याऐवजी तसा निर्धार करण्याऐवजी भाजप तिरस्काराचा निर्धार केला गेला हे लक्षात घेतले पाहिजे. मोदी, शाह, फडणवीस आणि भाजपवर टीका करून त्यांची जाहिरात होईल. ते तुम्हाला उत्तरही देणार नाहीत तर ते विकासकामे करत राहतील आणि तुम्ही मात्र तिरस्कार करत बसाल आणि जनतेच्या मनातून आणखी उतराल हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अनेक मुद्दे आहेत नाशिकच्या मेळाव्याबाबत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एआयच्या माध्यमातून केलेले बाळासाहेबांचे अवमूल्यन हे कोणाही सच्चा शिवसैनिक आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाºया मराठी मनाला आवडलेले नाही. बाळासाहेबांच्या तोंडून तुमची भाषा वदवायची वेळ आली याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे की, तुमचे कोणी ऐकायला तयार नाही. पण यात एका थोर व्यक्तीचे आपण अवमूल्यन करत आहोत, हे विसरून गेलात. आणखी एक गोष्ट म्हणजे, माझ्या नशिबाने मला इतके महान आई, वडील लाभले असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी तमाम उपस्थितांच्या आई, वडिलांचा अपमान केला. प्रत्येकाला आपले आई, वडील प्रिय असतात. तुमचे वडील इतक्या मोठ्या पदाला पोहोचले होते की, ते संपूर्ण राज्याचे झाले होते, त्यांना माझे वडील चोरले म्हणून सीमित करण्याचा प्रकार अनाकलनीय आहे.


संजय राऊत सातत्याने १०५ हुतात्मे या महाराष्ट्रासाठी दिले असे सांगतात. पण ते काही शिवसैनिक नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यावेळी शिवसेनेचा जन्मही झालेला नव्हता. ते सर्व गिरणी कामगार होते. पण गेल्या ३५ वर्षांत त्याच गिरणी कामगारांची अवस्था काय झालेली आहे? २५८ गिरण्या मुंबईत होत्या. त्या का बंद पडू दिल्या? गिरणी कामगारांच्या बलिदानाचे श्रेय घेता मग गिरण्या बंद पडल्या त्याचीही जबाबदारी घेणार का? आज महाराष्ट्र हा सवाल तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही.

प्रफुल्ल फडके/अन्वय


९१५२४४८०५५