महाराष्टÑात स्थिर सरकारची भाषा केली जात असली तरी इथले सरकार कायमच अस्थिर राहिलेले आहे. महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर एक वसंतराव नाईक यांचा कार्यकाल वगळता कोणाही मुख्यमंत्र्याला सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल मिळालेला नाही. त्यामुळे १९७५ पासून सातत्याने कोणत्याही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा काळ न मिळणे ही परंपरा खंडित करण्याचे काम फडणवीस करणार का याकडे महाराष्टÑाचे लक्ष लागून राहिले आहे.महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना चीन युद्धामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंनी संरक्षण मंत्रिपदावर बोलावले. हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला असे म्हणत यशवंतराव दिल्लीत गेले. त्यांनी महाराष्टÑाची धुरा १ मे १९६० ते १९ नोव्हेंंबर १९६२ पर्यंत सांभाळली. त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांनी १ वर्ष आणि पी के सावंत यांनी ९ दिवस मुख््यमंत्रीपद सांभाळून वसंतराव नाईक यांच्याकडे राज्याची धुरा आली. ती त्यांनी सलग ११ वर्ष ७७ दिवस इतकी सांभाळली. परंतु त्यांच्यानंतर ती खुर्ची सलग पाच वर्ष कोणालाही मिळाली नाही, म्हणूनच आता चार वर्ष पूर्ण करण्याच्या दिशेने चाललेले देवेंद्र फडणवीस ही परंपरा खंडित करणार की काही उलथापालथ होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.१९७५ साली वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रीपद शंकरराव चव्हाण यांच्याकडे आले. त्यांनी ते १९७७ पर्यंत सांभाळले. त्यानंतर १७ मार्च १९७७ ते १८ जुलै १९७८ या ३ वर्ष १८१ दिवसांच्या काळात त्यांनी ते दोन टप्प्यात सांभाळले. १८ जुलै ७८ ते १७ फेब्रुवारी १९८० या काळात पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात राष्टÑपती राजवट लागू झाली आणि पवारांचे मुख्यमंत्रीपद गेले. तेंव्हापासून ही परंपरा सुरुच आहे. राज्याला एका पक्षाच्या किंवा आघाडीच्या हातात सलग सत्ता असूनही सलग पाच वर्ष काम करणारा मुख्यमंत्री मिळालेला नाही. त्यामुळेच आता ही परंपरा फडणवीस खंडित करणार की पुन्हा काही खांदेपालट होणार याची उत्सुकता महाराष्टÑाला लागलेली आहे. साहजिकच आगामी दोन महिने हे फडणवीस सरकारची परिक्षा पाहणारे ठरणारे आहेत. आपल्याकडे मुख््यमंत्रीपद जाण्यासाठी भ्रष्टाचाराचे कारणच पुरेसे असते असे नाही. अचानकही लॉटरी लागल्याप्रमाणे एखादे नवे नाव पुढे येऊ शकते आणि नवा गडी नवे राज्य निर्माण होते.राष्टÑपती राजवट संपूष्टात आल्यानंतर अब्दुल रेहमान अंतुले यांना ९ जून १९८० साली इंदिरा गांधींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाठवले. तेंव्हापासून आमदारांमधून मुख्यमंत्री निवडण्याची प्रथा संपुष्टात आली आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील तो मुख्यमंत्री होऊ लागला. प्रतिभा प्रतिष्ठानचा घोटाळा समोर आला आणि अंतुलेंची गच्छंती झाली. त्यांच्याजागी बॅ. बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री म्हणून आले. वर्षभर कामकाज पाहिल्यानंतर बाबासाहेब भोसले यांच्या जागी पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेसने वसंतदादा पाटील यांची नेमणूक केली. कारण १९८५ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसची ती खेळी होती. परंतु ही वसंतदादांची कारकीर्दही जेमतेम सव्वादोन वर्षांची राहिली. त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी शिवाजीराव पाटील निलंगेकरांना मुख्यमंत्री म्हणून नेमले. ते जेमतेम २७६ दिवस मुख्यमंत्री होते. त्यानंतर कडक शिस्तीचे हातात छडी घेतलेले मास्तर अशी ख्याती असलेल्या शंकरराव चव्हाण यांना काँग्रेसने हातात छडी घेऊन पाठवले. यावेळी शंकररावांना सव्वादोन वर्षांचा कालावधी मिळाला. पण १९९० च्या निवडणुका एकहाती जिंकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये घेऊन राज्याची धुरा सोपवली. शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले. निवडणुकीपूर्वी २ वर्ष ३६४ दिवस म्हणजे पूर्ण ३ वर्ष नाही आणि निवडणुकीनंतर पुन्हा २२१ दिवस असे ते सलग मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्री म्हणून जावे लागले. नरसिंहराव सरकारच्या काळात त्यांना संरक्षणमंत्रीपदी संधी मिळाली आणि महाराष्टÑाची धुरा ही सुधाकरराव नाईक यांच्याकडे आली.सुधाकरराव नाईक यांनी पावणेदोन वर्ष या राज्याची धुरा हातात सांभाळली पण तत्कालीन परिस्थिती, बदलते प्रवाह यामुळे नाईकांना हटवून पुन्हा एकदा काँग्रेसने ऐन मार्च महिन्यातील रखरखत्या उन्हात शरद पवारांना पाठवले. शरद पवार यावेळी दोन वर्ष ८ दिवस इतका काळ मुख्यमंत्री पदावर राहिले. त्यानंतर सत्तापालट झाला. काँग्रेसची दीर्घकाळची सत्ता काढून घेण्यात युतीला यश आले आणि शिवसेना भाजप युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले. पण मनोहर जोशी यांनाही पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. त्यांचे गोड बोलणे आणि कामे न होणे हे युतीसाठी मारक ठरु लागले. कामे करण्यासाठी आपल्या हातात सत्ता दिलेली आहे, कामे केली पाहिजेत अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झालेली होती. त्यामुळे एखादा कर्तबगार नव्या दमाचा मुख्यमंत्री देऊन राज्याचा गाडी वेगाने पळवायचा विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आणि निर्णयक्षम अशा नारायण राणे यांना त्यांनी संधी दिली. पूर्ण वर्षाचा कालावधी नसतानाही त्या काळात झिरो पेंडिंग कामे या धोरणाने नारायण राणे यांनी सरकार अक्षरश: चालवले नाही तर पळवले. पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत युतीला सत्ता गमवावी लागली. राज्यात पुन्हा सत्तांतर झाले.काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या आघाडीचे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आले. यावेळी विलासराव देशमुख यांनंी सलग ३ वर्ष ३ महिेने मुख्यमंत्रीपद सांभाळले आणि त्यांच्या जागी उर्वरीत काळासाठी काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले. राज्याची अस्थिर मुख्यमंत्रीपद ही परंपरा कायम राहिली ती अगदी २०१४ पर्यंत तशीच. सुशीलकुमार शिंदे यांना २००४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेस राष्टÑवादी आघाडी २००४ मध्ये सत्तेत आली. पण त्यांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी काँग्रेसमधील गटबाजी सक्रीय झाली. काँग्रेस नेतृत्वावर विलासराव गटाचा दबाव पडला आणि पुन्हा एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. पण इथेही त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. महाराष्टÑाची परंपरा कायम राहिली.तब्बल ४ वर्ष ३३ दिवस कार्यरत राहिलेल्या विलासरावांना राम गोपाल वर्मा यांचेसमवेत २६/११ चे प्रकरण भोवले आणि मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी उर्वरीत काळासाठी अशोक चव्हाण या नवख्या चेहºयाला संधी देण्यात आली. यावेळीही अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्याने त्यांना पुन्हा संधी दिली गेलीी. पणा २००९ पासून २०१४ पर्यंत त्यांना सलग पाच वर्ष काढणे शक्य झाले नाही. आदर्श घोटाळयात नाव आल्यामुळे त्यांना जावे लागले आणि अचानक दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंंत्री म्हणून पाठवण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण ३ वर्ष ३३९ दिवस इतका काळ या पदावर राहिले. पण गेल्या चाळीस वर्षात सलग पाच वर्ष एक मुख्यमंत्री ही प्रथा त्यांना प्रस्थापित करता आलेली नाही. म्हणूनच आता देवेंद्र फडणवीस ही प्रथा खंडित करतात का हा प्रश्न सर्वांना आहे.
शनिवार, १ सप्टेंबर, २०१८
४३ वर्षांची परंपरा फडणवीस खंडीत करणार का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा