समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला आणि देशभरात त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. भारतासारख्या देशात हा निकाल तसा पचनी पडणारा नसला तरी या निकालाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. मोठ्या मनाने हे स्वागत केले गेले पाहिजे. कारण निसर्गाला कोणीही आव्हान देऊ नये आणि निसर्ग नियमाचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाºया समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाºया भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाºया याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार झाली आणि त्यानंतर हा निर्णय देण्यात आला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाºया देशातील सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत झालेले आहे. याचे पडसाद लगेचच शुक्रवारी दिसू लागले. काहींनी आपल्या प्रोफाइल फोटोंवर इंद्रधनुष्याचे रंग ठेवले. इ जगातला अविभाज्य भाग असलेल्या गुगलने आपल्या होमपेजवर सर्च बॉक्सखाली इंद्रधनुष्याच्या रंगाचा झेंडा लावला होता. समलैंगिक संबंध गुन्हा नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच गुगल इंडियाच्या होमपेजवर हा झेंडा फडकू लागला. इंद्रधनुष्याच्या रंगांचा झेंडा ‘एलजीबीटी’ समाजाचे प्रतिक आहे. फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियांतून या निर्णयाचे स्वागत झालेले दिसते. यावरुन एक फार मोठी कोंडी न्यायालयाने फोडल्याने अनेकांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येते. आपल्याकडे कायदा आणि धर्म यांची सरमिसळ केली जाते, गफलत केली जाते. धर्माची भीती, कायद्याची भीती, समाजाची भीती या भीतीयुक्त वातावरणात असे समलिंगी आजवर स्वत:ला कोंडून घेत होते. शारीरिक संबंध हे फक्त भिन्नलिंगी व्यक्तिंमध्येच असले पाहिजेत अशी अपेक्षा ठेऊन धर्माशी आणि पाप-पुण्याशी निगडीत या गोष्टींकडे पाहिले जात होते. परंतु हा एक निसर्गाचा चमत्कार आहे, त्याकडे तितकेच लक्ष द्यायचे असते, त्याचा बाऊ करायचा नसतो हे आपण लक्षात न घेतल्यामुळे असे दडपणाचे प्रकार घडत होते. भिन्नलिंगी व्यक्तिंमध्येच शारीरिक आकर्षण असले पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे. पण कधीकधी समलिंगींमध्येही असे आकर्षण निर्माण होते. ते निसर्गाने त्या व्यक्तिंच्या शरीरात, मनात काहीतरी वेगळे रसायन निर्माण केलेले असते त्यामुळे. काही पुरुष बायकी असतात तर काही स्त्रिया पुरूषी असतात. कोणी काळे, कोणी गोरे तसाच कोणी भिन्नलिंगी तर कोणी समलिंगी संबंध ठेऊ इच्छितो इतके हे साधे आहे. परंतु पुरुषांनी स्त्रियांशीच संबंध ठेवायचे आणि स्त्रियांनंी पुरुषांशीच ठेवायचे या ब्रिटीशकालीन कायद्याचा वापर केल्यामुळे समाजातील या एका वेगळ्या गटाचा कोंडमारा होत होता. लेसबियन किंवा होमो या भावना निसर्गाच्या चमत्कृतीमुळे निर्माण होतात. कोणाला असे वाटत नसते की आपण अशाप्रकारे जन्माला यावे. एकतर मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी ही अपेक्षा प्रत्येकाची असते. पण जर तृतीयपंथी जन्माला आला, समलिंगी जन्माला आला किंवा वयात आल्यानंतर लिंगपरिवर्तन करावेसे वाटले तर त्याला कोण काय करणार? सामान्य माणसांप्रमाणेच त्यांना वागणूक दिली गेली पाहिजे. हे समलिंगी आपले जोडीदार आपल्या पद्धतीने निवडत असतात, त्यांच्या वेगळ्या जगाचा ते आनंद घेत असतात. सेक्सचा संबंध फक्त प्रजोत्पादनाशी न जोडता तो संबंध शारीरिक आनंदाशी जोडला गेला पाहिजे. इंद्रियतृप्तीसाठी सेक्स करणे हाही दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या त्या विशिष्ठ कोशात जर कोणी समलिंगी संबंध ठेवत असतील आणि त्याचा कोणाला त्रास होणार नसेल तर त्याचा बाऊ करण्याचे काहीच कारण नाही. समलिंगी संबंध हे काही आज निर्माण झालेले नाहीत. ती काही २१ व्या शतकातील देणगी आहे असे नाही. हजारो वर्षांपूर्वीही अशा संस्कृतीला किंवा प्रवृत्तीला स्वीकारले गेले होते. त्यात पाप-पुण्याचा कुठेही संबंध नाही की कोणत्याही धर्माचा त्याच्याशी संबंध नाही. समलंैगिकता ही मानवी सुखाशी, आनंदाशी जोडली गेलेली आहे. किंबहुना धर्म, भाषा हे भेद विसरुन, जात-पात विसरुन समलिंगी संबंध ठेवणारे खºया अर्थाने राष्टÑीय एकात्मतेचा विचार करणारे निधर्मी लोक आहेत असे म्हणावयास हरकत नाही. कारण समलिंगी संबंध ठेवणारे जे लोक आहेत ते कधी जात-पात, गोत्र, धर्म पाहून किंवा कुंडली जुळते का पाहून असे संबंध ठेवत नाहीत. ते या साºया पलिकडे गेलेले लोक आहेत. म्हणूनच न्यायालयाच्या या निर्णयाकडे भुवया उंचावून न बघता त्याचे स्वागत करून त्या जगातील लोकांना मोकळा श्वास घेण्यास मदत केली पाहिजे. इतिहासातील काही दाखल्यांमध्ये अलेक्झांडर-सेल्युकस यांच्यात असे संबंध होते. जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर समलिंगी संबंधामुळे पुरुषार्थात कुठेही कमी पडलेला नव्हता. आपले समलिंगी जीवन जाहीर सांगणारा करण जोहरसारखा यशस्वी निर्माता दिग्दर्शक कशातही कमी नाही. ही निसर्गाची ठेवण आहे ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडे अजंठा, वेरुळ, खजुराहोसारखी असंख्य लेणी, शिल्प पाहिली तर त्यामध्ये अशा काही शिल्पकृती दिसून येतात की त्यामध्ये समलिंगी संबंधाचे प्रकार दिसून येतात. पुराणातही काही दाखले आहेत, पण ती पुराणातील वानगी तिथेच सोडून देऊ. परंतु वर्तमानात आज ही एक सोसायटी आहे हे स्वीकारायला हवे. परस्पर संमतीने कोणी असे संबंध ठेवत असतील आणि त्याचा बाहेरच्या समाजाला कसलाही त्रास होणार नसेल तर त्यांना गुन्हेगार ठरविण्याचे कारण नाही. समलैंगिकता गुन्हा नाही हे स्वीकारल्याने फार मोठे आभाळ कोसळेल असे समजण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे भिन्नलिंगी संबंध असतात तसेच समलिंगी आहेत इतकेच लक्षात घेऊन त्याचे स्वागत केले पाहिजे. स्वागत याचा अर्थ त्याला फार महत्व न देणे किंवा ते अनैसर्गिक आहे असे न समजणे हा त्याचा अर्थ आहे. कायद्याने बंदी घातली तरी हे संबंध चोरुन राहणारच आहेत. गुन्हा नाही म्हणून कोणी उघडपणे काही करतील असेही समजण्याचे कारण नाही. त्यामुळे ते स्वीकारणे हेच योग्य.
शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८
हे तर निसर्गाचं देणं!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा