बुधवार, ८ जुलै, २०२६

संत जनाबार्इंचे प्रेम


धरीला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर।। असा संत जनाबार्इंचा अभंग आहे. जनाबाई या वेगळी अनुभूती देणाºया संत होत्या. आपल्या या अभंगात जनाबार्इंना म्हणायचे आहे की, मी माझ्या भक्तीच्या दोराने त्या पंढरीच्या विठ्ठलाला (चोराला) थेट माझ्या मनाच्या गाभाºयात बांधून ठेवले आहे. आता तो तिथून कुठेही जाऊ शकत नाही. विठ्ठलमय होण्याची ही प्रक्रिया म्हणजे जनाबार्इंची अनुभूती.


ज्ञानेश्वरांनी हरिपाठात म्हटले आहे की, भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति। बळेवीण शक्ति बोलू नये॥ १॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित। उगा राहे निवांत शिणसी वाया॥ २॥ सायासे करिसी प्रपंच दिननिशी। हरिसी न भजसी कोण्या गुणे॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे॥ ४॥

जन्म-मृत्यूरूप संसार दु:खापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावाचून हरीवर आत्यंतिक म्हणजे नि:सीम प्रेम बसणार नाही व अशा नि:सीम भक्तीवाचून संसारांतून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे. यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्यावाचून भक्ती होईल व भक्तीवाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय, म्हणून तसे बोलू नये॥ १॥ अत्यंत सहजपणे आणि निर्मळपणे ज्ञानदेवांनी येथे सांगितले आहे. हे जनाबाईच्या कृतीतून दिसून येते. मी माझ्या भक्तीच्या जोराने आणि दोराने त्याला बांधून ठेवला आहे, म्हणून तो माझ्याजवळ आहे.


म्हणून ज्ञानदेव म्हणतात की, देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काहीएक व्यर्थ शीण न करता आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थिर कर आणि निजबोधाने शांत राहा॥ २॥ देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस ते का बरे? ॥ ३॥ हरीचे भजन कर म्हणजे तू या संसारसागरातून तत्काळ तरून जाशील, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥ ४॥ ही हरिपाठातील महत्त्वाची शिकवण आहे. अत्यंतिक विश्वास, श्रद्धा आणि भक्ती करणारा मी नाही तर कर्ता करवता तो आहे. त्या तो ला जाणायचे आहे. ती भक्ती. तो शोधायला जातो तेव्हा मी नाहीसा होतो. मी पण जाते तिथे देवपण येते. तिथेच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.

जनाबार्इंनी विठ्ठलाला सर्वस्व मानले होते. जे काही करणार ना ते तोच करेल. मग वाटोळे केले तरी तोच करणार आणि कल्याण करायचे तरी तोच करणार. म्हणून चोरीचा आळ आल्यावरही हा पण त्याचाच खोडसाळपणा आहे हे मानून सगळे त्याला अर्पण करून त्याला शिव्या देण्यासही ती मागे पुढे पाहत नाही. कारण तोच कर्ता आहे, हा तिचा भक्तिभाव फार मोठा आहे. आपल्या श्वासात, कणाकणात तोच आहे आणि आपण त्याच्या परमात्मास्वरूपात विलीन आहोत ही तिची भावना फार मोठी आहे.


प्रफुल्ल फडके/संतकृपा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: