स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेल्या आणि स्त्रीया फारशा बाहेर पडत नसताना आपल्या कर्तृत्वावर नाव कमावलेल्या कर्तबगार लेखिका, कलाकार म्हणून हिराबाई पेडणेकर यांचे नाव घ्यावे लागेल. आज 18 ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतीदिन. पण त्यांची कारकीर्द आजही लक्षणीय अशीच आहे. आज शिक्षणाची आणि सर्वच क्षेत्र महिलांसाठी खुली आहेत. पण त्या काळात महिलांनी समाजात वावरणे, पुरूषांसमोर येणे, लिखाण करणे, गायन करणे हे प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते. त्या काळात त्यांनी करून दाखवलेले कर्तृत्व हे खर्या दुर्गावताराचे प्रतिक आहे. म्हणूनच आज त्यांचा स्मृतीदिन आणि नवरात्रातील जागराच्या निमित्ताने त्यांचे स्मरण महत्वाचे आहे.
हिराबाई पेडणेकर या मूळच्या कोकणातल्या. पण त्यांचे बालपण, शिक्षण, लेखन मुंबईतील गिरगावात झाले. शिक्षणामुळेच स्त्रियांची स्थिती सुधारेल, असा त्यांना विश्वास होता, आणि स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. त्यांच्या घराण्यातच नृत्य, संगीत या कला होत्या. त्यांना चागले संस्कृत येत होते. त्यांचे संगीतातले अधिक शिक्षण भास्करबुवा बखले यांच्याकडे झाले.
गुर्जरशास्त्री यांच्याकडून हिराबाईंनी, संस्कृत नाट्यशास्त्र, आणि नाट्यवाङ्मय यांच्या सूक्ष्म अभ्यासासाठी मार्गदर्शन घेतले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची गोडी लागली. पुढे मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर हिराबाई पेडणेकरांचा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बालगंधर्व यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील मंडळींशी, आणि पुढे नानासाहेब फाटक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आला. या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन हिराबाई पेडणेकर स्वतःच नाटककार झाल्या. त्या काळात नाटक लिहिणार्या महिला नव्हत्या. त्यामुळे त्यांना मराठीतील आद्य नाटककारच म्हणावे लागेल.
हिराबाईंनी वयाच्या विशीत 1905 साली पहिले नाटक लिहिले ते ’जयद्रथ विडंबन.’ ते रंगभूमीवर आले नसले तरी अनेकांनी ते वाचून हिराबाईंची प्रशंसा केली. त्यांचे ’संगीत दामिनी’ (पहिला प्रयोग 1908, पुस्तकरूपाने प्रकाशित सन 1912) हे नाटक त्यानंतर काही वर्षांनी रंगभूमीवर आले आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. कारण स्त्रीने लिहिलेले हे पहिले नाटक होते. किर्लोस्कर मंडळींनी हे नाटक करावे अशी हिराबाईंची इच्छा होती, पण ते घडू शकले नाही. ’ललितकलादर्श’ने या नाटकाला यश मिळवून दिले आणि ते चार वर्षे रंगभूमीवर गाजत राहिले. हिराबाई पेडणेकर केवळ नाटक लिहीत नव्हत्या तर कविता-निबंधलेखनही करत. त्या काळातल्या अव्वल दर्जाच्या ’मनोरंजन’ मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. त्यांनी लिहिलेल्या मीराबाईच्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
पण नाट्यलेखनातून आपल्या अभिव्यक्तीला वाव मिळवून देणार्या त्या अतिशय कौतुकास्पद अशा लेखिका होत्या. त्यामुळेच मराठीतील नामांकीत नाटककार वसंत कानेटकर यांना हिराबाई पेडणेकर यांचे कौतुक वाटले होते. अनेक ऐतिहासिक नाटके लिहिणार्या वसंत कानेटकरांनी मराठीतील नाटकाच्या इतिहासात मराठी नाटककार लेखिका असा मान मिळवणार्या हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी ’कस्तुरीमृग’ हे नाटक लिहिले होते. म्हणजे आजकाल बायोपिकचा जमाना आहे. पण त्या काळात नाटकासाठी, रंगभूमीसाठी योगदान देणार्या हिराबाईंवर कानेटकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाने नाटक लिहावे आणि तेही प्रचंड गाजावे हे फार विलक्षण आहे. असा मान, गौरव फार कमी लोकांना येतो.
हिराबाई पेडणेकर यांची संगीतकार म्हणून कारकीर्दही फार मोठी आणि महत्वपूर्ण आहे. हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या ’प्रेमशोधन’ (1910) या आणि गडकर्यांच्या ’पुण्यप्रभाव’ (1916) या नाटकांना संगीत दिले होते. त्यामुळे महिला संगितकार म्हणूनही त्यांची किर्ती फार मोठी आहे. त्या काळात हिंदी मराठी चित्रपटांना सुरवात झालेली नव्हतीच. पण बॉलीवूड, हिंदी चित्रपटसृष्टी नावारूपाला आल्यानंतरही महिला संगीतकार निर्माण होण्यासाठी दशके लागली. लता मंगेशकर यांच्या घराण्यातच संगीत होते त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यानंतर उषा खन्ना यांनी चित्रपटसंगीत दिले. पण त्यापूर्वी चित्रपटाचा शोधही लागला नव्हता त्या काळात रंजनाचे महत्वाचे स्थान हे नाटकांना होते. त्या नाटकांना संगीत देण्याचे काम हिराबाई पेडणेकर यांनी केले होते ही फार मोठी गोष्ट आहे.
हिराबाईंच्या या कारकीर्दीचे अनेकांना म्हणूनच नेहमीच आकर्षण वाटत राहिले आहे. हिराबाई पेडणेकरांसंबंधी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यात कस्तुतीमृग (नाटक, लेखक - वसंत कानेटकर), आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (चरित्र, लेखिका - शिल्पा सुर्वे), हिराबाई आणि कोल्टकर- म.ल. वर्हाडपांडे यांची पुस्तके आहेत. पण हिराबाईंचे जीवन खरोखरच एखाद्या अभ्यासकाला प्रबंध लिहिण्यास प्रवृत्त करेल असेच आहे. म्हणूनच आज नवरात्रीच्या दुसर्या दिवशी या हिराबाई पेडणेकरांच्या हिर्यासारख्या कामगिरीवर आपण प्रकाश टाकला आहे. स्त्री मधील शक्तीस्वरूप तेच असते जे तिच्या तेजाने, शक्तीने सर्वांना भारावून टाकते. सगळीकडे अंध:कार असताना, टिका, विरोध असताना आपल्यातील कौशल्याने सर्वांना भुरळ घालण्याचे धाडस एखाद्या दुर्गा, शक्ती, चंडी यांच्यातच असते. आपल्यातील शक्तीची जाणिव होणे फार महत्वाचे असते. ती जाणिव झाल्यावर जग काय म्हणेल याचा विचार न करता ते काम करणे यासाठी फार मोठे धाडस लागते. हे धाडस हिराबाईंमध्ये होते. खरं तर हिराबाईंवर पन्नास वर्षांपूर्वी मराठी नाटक येउन गेले आहे. तसाच एखादा चित्रपट निर्माण होण्याची गरज आहे. भारतातील अशा कर्तृत्ववान महिलेवर केला जाणारा चित्रपट अत्यंत अनमोल असेल.
गुर्जरशास्त्री यांच्याकडून हिराबाईंनी, संस्कृत नाट्यशास्त्र, आणि नाट्यवाङ्मय यांच्या सूक्ष्म अभ्यासासाठी मार्गदर्शन घेतले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची गोडी लागली. पुढे मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर हिराबाई पेडणेकरांचा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बालगंधर्व यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील मंडळींशी, आणि पुढे नानासाहेब फाटक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आला. या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन हिराबाई पेडणेकर स्वतःच नाटककार झाल्या. त्या काळात नाटक लिहिणार्या महिला नव्हत्या. त्यामुळे त्यांना मराठीतील आद्य नाटककारच म्हणावे लागेल.
हिराबाईंनी वयाच्या विशीत 1905 साली पहिले नाटक लिहिले ते ’जयद्रथ विडंबन.’ ते रंगभूमीवर आले नसले तरी अनेकांनी ते वाचून हिराबाईंची प्रशंसा केली. त्यांचे ’संगीत दामिनी’ (पहिला प्रयोग 1908, पुस्तकरूपाने प्रकाशित सन 1912) हे नाटक त्यानंतर काही वर्षांनी रंगभूमीवर आले आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. कारण स्त्रीने लिहिलेले हे पहिले नाटक होते. किर्लोस्कर मंडळींनी हे नाटक करावे अशी हिराबाईंची इच्छा होती, पण ते घडू शकले नाही. ’ललितकलादर्श’ने या नाटकाला यश मिळवून दिले आणि ते चार वर्षे रंगभूमीवर गाजत राहिले. हिराबाई पेडणेकर केवळ नाटक लिहीत नव्हत्या तर कविता-निबंधलेखनही करत. त्या काळातल्या अव्वल दर्जाच्या ’मनोरंजन’ मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. त्यांनी लिहिलेल्या मीराबाईच्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
पण नाट्यलेखनातून आपल्या अभिव्यक्तीला वाव मिळवून देणार्या त्या अतिशय कौतुकास्पद अशा लेखिका होत्या. त्यामुळेच मराठीतील नामांकीत नाटककार वसंत कानेटकर यांना हिराबाई पेडणेकर यांचे कौतुक वाटले होते. अनेक ऐतिहासिक नाटके लिहिणार्या वसंत कानेटकरांनी मराठीतील नाटकाच्या इतिहासात मराठी नाटककार लेखिका असा मान मिळवणार्या हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी ’कस्तुरीमृग’ हे नाटक लिहिले होते. म्हणजे आजकाल बायोपिकचा जमाना आहे. पण त्या काळात नाटकासाठी, रंगभूमीसाठी योगदान देणार्या हिराबाईंवर कानेटकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाने नाटक लिहावे आणि तेही प्रचंड गाजावे हे फार विलक्षण आहे. असा मान, गौरव फार कमी लोकांना येतो.
हिराबाई पेडणेकर यांची संगीतकार म्हणून कारकीर्दही फार मोठी आणि महत्वपूर्ण आहे. हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या ’प्रेमशोधन’ (1910) या आणि गडकर्यांच्या ’पुण्यप्रभाव’ (1916) या नाटकांना संगीत दिले होते. त्यामुळे महिला संगितकार म्हणूनही त्यांची किर्ती फार मोठी आहे. त्या काळात हिंदी मराठी चित्रपटांना सुरवात झालेली नव्हतीच. पण बॉलीवूड, हिंदी चित्रपटसृष्टी नावारूपाला आल्यानंतरही महिला संगीतकार निर्माण होण्यासाठी दशके लागली. लता मंगेशकर यांच्या घराण्यातच संगीत होते त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यानंतर उषा खन्ना यांनी चित्रपटसंगीत दिले. पण त्यापूर्वी चित्रपटाचा शोधही लागला नव्हता त्या काळात रंजनाचे महत्वाचे स्थान हे नाटकांना होते. त्या नाटकांना संगीत देण्याचे काम हिराबाई पेडणेकर यांनी केले होते ही फार मोठी गोष्ट आहे.
हिराबाईंच्या या कारकीर्दीचे अनेकांना म्हणूनच नेहमीच आकर्षण वाटत राहिले आहे. हिराबाई पेडणेकरांसंबंधी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यात कस्तुतीमृग (नाटक, लेखक - वसंत कानेटकर), आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (चरित्र, लेखिका - शिल्पा सुर्वे), हिराबाई आणि कोल्टकर- म.ल. वर्हाडपांडे यांची पुस्तके आहेत. पण हिराबाईंचे जीवन खरोखरच एखाद्या अभ्यासकाला प्रबंध लिहिण्यास प्रवृत्त करेल असेच आहे. म्हणूनच आज नवरात्रीच्या दुसर्या दिवशी या हिराबाई पेडणेकरांच्या हिर्यासारख्या कामगिरीवर आपण प्रकाश टाकला आहे. स्त्री मधील शक्तीस्वरूप तेच असते जे तिच्या तेजाने, शक्तीने सर्वांना भारावून टाकते. सगळीकडे अंध:कार असताना, टिका, विरोध असताना आपल्यातील कौशल्याने सर्वांना भुरळ घालण्याचे धाडस एखाद्या दुर्गा, शक्ती, चंडी यांच्यातच असते. आपल्यातील शक्तीची जाणिव होणे फार महत्वाचे असते. ती जाणिव झाल्यावर जग काय म्हणेल याचा विचार न करता ते काम करणे यासाठी फार मोठे धाडस लागते. हे धाडस हिराबाईंमध्ये होते. खरं तर हिराबाईंवर पन्नास वर्षांपूर्वी मराठी नाटक येउन गेले आहे. तसाच एखादा चित्रपट निर्माण होण्याची गरज आहे. भारतातील अशा कर्तृत्ववान महिलेवर केला जाणारा चित्रपट अत्यंत अनमोल असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा