वैशाख शु्द्ध तृतिया म्हणजेच अक्षय्य तृतीया हा भारतीय हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा दिवस. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपली एकुणच संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने शेतकºयांच्या दृष्टीने हा शेतीचा मूहूर्त करणारा आणि चांगले पिक यावे म्हणून असलेला उत्तम मुहूर्त आहे. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. बरेचसे शब्द मराठी ग्रामीण भाषेत बोलताना त्याचे अपभृंश होतात, त्यातून कोणी आकीती म्हणतं. पण हा एक अत्यंत चांगला आणि पवित्र असा दिवस मानला जातो.
या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. १८ पुराणे लिहून झाल्यानंतर आता आपले काम पूर्ण झाले असे समजून कामातून निवृत्ती घेण्याचा विचार व्यासांनी केला होता. परंतु जोपर्यंत महाभारत लिहित नाही आणि त्यातील गीतोपदेश जगापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णत्व येणार नाही असे भगवंतांनी त्यांना सांगितले. परंतु आता मी थकलो आहे, लिहिण्याची ताकद नाही असेत्यांनी भगवंतांना सांगितले. तेंव्हा भगवंतांनी तुला उत्तम लेखनीक देतो असे सांगितले आणि श्री गणेशाला त्यांच्याकडे पाठवले. श्री गणेश हा पहिला स्टेनो टायपीस्ट, पहिला संगणक, पहिला लेखनीक आणि वेगाने काम करणारा पहिला फॉर्म्युला आहे. त्या श्री गणेशाने व्यासकृत महाभारत लिखाणास सुरुवात केली तो हा दिवस.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते'. या दिवशी गंगेचे स्वगार्तून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
जैन धर्मातही या दिवसाचे खूप महत्व आहे. भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगºयाची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात. हरभºयांनी ओटी भरली जाते.त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी चैत्रगौर उठवली जाते आणि पुन्हा देवघरात आणली जाते.
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाºया काळाला महायुग असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा १२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. बलरामाचे शस्त्र हेनांगर आहे. त्यामुळे तो शेतकºयांचा देव आहे. मातीत आळी घालणे व पेरणी ही कामे आवर्जून या दिवशी करतात. अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरात आषाढात बेंदूर असतो. त्यामुळे आकीतीला आळं अन बेंदराला फळं हे शेतकºयांचेनियोजन असते. यादिवशी घातलेल्या वेलांना बेंदराच्या दरम्यान फळं येतात. काकडी, भोपळा, दोडका, दुधीभोपळा याचे विपूल पिक येते. या दिवशी घातलेल्या लाल भोपळ्याचे वेलाला आलेलेभोपळे वर्षभर विविध सणांसाठी, देवदिवाळीला घारगे बनवायला वापरले जातात.
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुवेर्दात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.
याशिवाय हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कायार्चे फळ अक्षय्य(न संपणारे) असे मिळते.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाºया देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाºया त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही.
प्रफुल्ल फडके/ संस्कृती
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा