मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्याचबरोबर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकांचाही निकाल लागला. या सर्व निकालांवरून एक स्पष्ट होते की बिहारमध्ये नितिशकुमारांची भाजपबरोबर असलेली आघाडी बहुमताच्या दिशेने जात असली तरी भाजपचा दृष्टीकोन फक्त बिहार नाही. भाजपचे उद्दीष्ट हे शतप्रतिशत भाजप हेच असल्याचे दिसत आहे. भाजपने बिहारमध्ये बहुमताची चिंता केलेली नाही तर आपला पक्ष कसा वाढेल याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे आपल्या जागा वाढणे महत्वाचे आहे, एनडीएची सत्ता गेली तरी चालेल. कारण त्यांना केंद्रातील सत्ता मजबूत करायची आहे. अगदी एक्झीट पोलप्रमाणे निकाल लागला असता तरीही सरकार नितिशकुमारांचे गेले असे दिसले असते पण भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असते. त्याचा फायदा आगामी काळातील 2024 च्या लोकसभेसाठी करून घेण्याचे आणि केंद्रातील सत्ता आपल्याकडे ठेवण्याचे धोरण त्यांचे आहे. त्यामुळे भाजप एक नंबरचा पक्ष राखणे, शत प्रतिशत भाजपचे प्रयत्न करणे हे त्यांचे उद्दीष्ट होते. त्यामुळे एनडीएचे सरकार पुन्हा सख़ेवर आले तरी नितिशकुमारांची हार असेल पण भाजपची जीत असेल. एक्झीट पोलप्रमाणे जरी निकाल लागला असता तरी सत्ता नितिशकुमारांची हार झाली असती पण सर्वाधिक जागा घेऊन भाजपचा विजयच झाला असता. भाजपचे धोरण या निवडणुकीत काय किंवा कोणत्याही विधानसभा निवडणुकीत की जिथे त्यांनी युती किंवा आघाडी केलेली आहे तिथे सत्ता गेली तरी चालेल पण आपले संख्याबळ जास्त राहीले पाहिजे याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. याचे मोठे उदारहण महाराष्ट्रातील आहे. गेल्याच वर्षी युतीमध्ये निवडणूक लढवूनही, युतीला स्पष्ट बहुमत मिळवूनही भाजपने सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या हा मुद्दा मोठा केला होता. जिथे भाजपची सत्ता आहे ती टिकवण्याचा प्रयत्न केलाच पण जिथून भाजपची सत्ता गमावली ती परत मिळवण्यासाठी आणि आपले संख्याबळ वाढवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यामुळे भाजपचे लक्ष हे केवळ बिहार निवडणुका नव्हते तर बिहार बरोबर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकांमध्ये सरशी मिळवणे हे आहे.
मध्यप्रदेशात फोडाफोडी करून भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपत आणले. त्यामुळे एक फार मोठा काँग्रेसचा गट भाजपकडे वळला आणि आमदारकीचे राजीनामे दिले आणि पोटनिवडणुका लागल्या. भाजपला स्पष्ट बहुमतासाठी मध्य प्रदेशात केवळ 8 आमदारांची गरज भासत होती. पण पोटनिवडणुकीत जवळपास 18 आमदार जिंकताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपने पक्षवाढीला इथे महत्व दिलेले आहे.
गुजरातमध्येही 7 जागांवर भाजपचे उमेदवार पोटनिवडणुकीत जिंकताना दिसत आहेत आणि आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. उत्तर प्रदेशातही 7 पोटनिवडणुकांपैकी 4 पेक्षा जास्त जागांवर भाजप विजयी होताना दिसते आहे. त्यामुळे भाजपने एकुणच या सगळ्या निवडणुका पक्षवाढीचा दृष्टीकोन समोर ठेवून आणि शत प्रतिशत भाजपच्या दृष्टीने वाटचाल करताना दिसत आहे.
सगळे पक्ष एक विचार करत असतात आणि भारतीय जनता पक्षाचे धोरण वेगळेच आहे असे या निवडणुकीतून दिसून आले आहे. म्हणजे सगळे पक्ष आम्ही फूटभर पुढे जाऊ असा विचार करत असताना भाजपचा विचार हा इंचभर पुढे सरकण्याचा आहे असे सांगितले जाते. पण भाजप चौफेरच नव्हे तर संपूर्ण परिघात सर्व दिशांनी इंच इंच पुढे सरकत विस्तारत जाण्याचा विचार करतो. अन्य पक्षांनी फक्त तिथेच फुटभर सरकण्याचा विचार केल्याचे दिसून येते. भाजपला केंद्रातील सूत्र आपल्या हाती ठेवायची आहेत, त्याला प्राधान्य असेल. बाकी प्रादेशिक पातळीवर ते सर्व पर्याय खुले ठेवू शकतात. म्हणजे महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसचा उच्चार ते करू शकतात. कोणतीही एक निवडणूक झाली की त्यांचा कार्यक्रम ऑपरेशन लोटस असतो. यात सर्व पर्याय खुले असल्याचे बोलून राष्ट्रवादी, शिवसेना या दोन्ही पक्षांशी बोलणी करण्याचीही तयारी त्यांची असेल. आज समोरासमोर असले तरी लोकसभेला जागा वाढवण्यासाठी ते वेळ पडली शिवसेनेशी पुन्हा हात मिळवणी करतील, राष्ट्रवादीलाही बरोबर घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे बिहारच्या निकालात भाजप हा संर्वात मोठा पक्ष आला आहे, पण विरोधातील राष्ट्रीय जनता दल हा दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे. राजद आणि संजद यात नितिशकुमार मागे आहेत. त्यामुळे आघाडीला जिंकून आणले पण मित्र पक्षाला पाडण्याचे काम भाजपने केलेले आहे. नितिशकुमारांना रोखण्यासाठी लोकजनशक्ती पार्टी वेगळी लढली असली तरी ते भाजपचा मित्र पक्ष आहेत. त्यामुळे भाजपने आपला अजंडा इथे राबवण्यात यश मिळवले आहे. तो अजंड आहे शत प्रतिशचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा