शोले चित्रपटात गब्बर सिंहची भूमिका साकारणार्या
अमजद खानचा आज जन्मदिवस. वयाच्या अवघ्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या
तीव्र झटक्यानं त्याचं निधन ऐन उमेदीत झाले. पण जी काही पंधरा वीस वर्ष
त्याने काम केले तो काळ खर्या अर्थाने गाजवला. खलनायकाला नायक बनवून गेला
असा तो काळ होता. त्याचप्रमाणे केवळ खलनायकच नाही तर आपण विनोदी आणि चरीत्र
अभिनेते म्हणूनही उत्तम कलाकार आहोत हे दाखवून त्याने आपली एक्झीट घेतली.
पण काही असलं तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील माईल स्टोन म्हणतात त्या शोलेचा
खलनायक असूनही तो हिरो बनून गेला.
अमजद खानचा जन्म 12 नोव्हेंबर
1940 रोजी पेशावर इथं झाला होता. बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये कामाची
सुरुवात त्याने केली पण तो कुणाच्या फारस स्मरणात राहिला नव्हता. पण त्याला
खर्या अर्थाने ओळख दिली ती शोलेतील गब्बर सिंह या भूमिकेने. त्या गब्बरची
भिती आजही अनेकांना वाटते.
तो काळ चित्रपटात हिंसाचार फार
दाखवण्याचा नव्हता. त्यामुळेच शोले हा माईल स्टोन म्हटले जाते. शोले म्हटलं
की आपल्याला आठवतो चित्रपटातील गब्बर सिंग. गब्बर सिंगची भूमिका साकारून
अमजद खान अजरामर झाला. त्यांनी ही भूमिका इतक्या प्रभावीपणे निभावली की,
त्यांच्याशिवाय ही भूमिका दुसरं कुणी साकारूच शकत नाही, असं वाटायला लागतं.
म्हणजे त्याचा काही वषार्र्ंपूर्वी रिमेक बनला. ये आग है करत अमिताभ बच्चन
त्याची जाहीरात करत होता. दाक्षिणात्य मोहनलाल त्यात होता. पण लोकांना तो
आवडलाच नाही. अमिताभ? आणि गब्बर? नाही तू जयच ठीक आहेस. गब्बर फक्त अमजदच
असू शकतो. मग ओरीजनल असो की रिमेक.
खरं तर गब्बर सिंगच्या
भूमिकेसाठी अजमद खान दिग्दर्शकाची पहिली पसंत नव्हते. सर्वात पहिले अभिनेता
डॅनी डेन्झोपा यांना गब्बरच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. मात्र डॅनी
तेव्हा अफगाणिस्तानमध्ये फिरोज खानच्या धर्मात्मा चित्रपटाचं शूटिंग करत
होते. त्यामुळे त्यांना शोले चित्रपट सोडावा लागला. त्यानंतर गब्बरची
भूमिका अमजद खान यांना मिळाली. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांना अमजद खान
यांचं नाव सुचवलं होतं. जावेद अख्तर यांनी अमजद खान यांना अनेक
वर्षांपूर्वी दिल्लीतील एका नाटकात बघितलं होतं.
अमजद खान यांनी बाल
कलाकार म्हणून 1951 साली चित्रपट ‘नाजनीन’ आणि 17 वर्षाच्या वयात ‘अब
दिल्ली दूर नही’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण शोले चित्रपटातील
गब्बर सिंहच्या भूमिकेद्वारे अमजद खान यांना जगभरात ओळख मिळवून दिली आणि ही
भूमिका अजरामर झाली. अमजद खान यांनी 1973 साली ‘हिंदुस्तान की कसम’ या
चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र त्यांना खरी ओळख
मिळवून दिली ती 1975 साली आलेल्या चित्रपट शोलेनं.
शोलेमधील गब्बर हा
अतिशय भयानक असा खलनायक दर्शवला गेला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकदा
लोकं अमजद खान यांना बघून घाबरून जायचे. या चित्रपटात गब्बरची भूमिका अमजद
खान यांनी इतकी शानदार केली होती की, लोकं त्यांना खरोखरच डाकू समजू लागले
होते आणि त्यांच्याकडे त्याच नजरेनं बघू लागले होते. त्यामुळे शोले नंतर
जीपी सिप्पी रमेश सिप्पींना पुढचा चित्रपट काढायला पाच वर्ष लागली. कारण
शोलेची लोकप्रियता काही केल्या ओसरतच नव्हती. पण नंतरच्या चित्रपटात हिरो
कोण असणार याची कोणालाच उत्सुकता नव्हती तर व्हीलन कोण असणार? गब्बरच्या
तोडीचा तो असेल का? त्यामुळे शान बघायला गेल्यावर त्यातील शाकाल ही कुलभूषण
खरवंदाची भूमिका लोकांना आवडली नाही. याच सिप्पी फिल्मचा हा व्हिलन आहे
का? ज्यांनी अमजदखान सारखा हिरो नव्हे तर खलनायकातील हिरा दिला? असा प्रश्न
प्रेक्षकांना पडला होता.
पण अमजदखान हा खर्या अर्थाने कलाकार होता.
त्याने आपले उर्वरीत आयुष्य म्हणजे पुढची पंधरा वर्ष गब्बरसिंगच्या
पलिकडेही आपण कोणीतरी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. गंब्बरची प्रतिमा
पुसण्याचा प्रयत्न केला होता. ही गब्बरची भूमिका आपली अंतिम सर्वश्रेष्ठ
भूमिका ठरू नये या गब्बरका डर त्याला सतावत असावा. पण त्याच्या या
प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आणि तो यशस्वी विनोदी अभिनेता, चरीत्र
अभिनेता म्हणूनही गाजला.
म्हणजे एकीकडे बरसात की एक रात, परवरीश,
कस्मे वादे, लूटमार, गंगा की सौगंध, मि. नटवरलाल , सत्ते पे सत्ता, इन्कार,
लाखन अशा चित्रपटांमधून आपली खलनायकी दाखवून प्रेक्षकांच्या शिव्या खात
होता. पण दुसरीकडे लव्ह स्टोरी, चमेली की शादी असे चित्रपटातून विनोदी
भूमिका करून भाव खाउन जात होता. त्यामुळे हलक्या फुलक्या विनोदी आणि
सहनायकांच्या तसेच चरीत्र अभिनेत्याच्या भूमिका करून मनातील गब्बर का डर
त्याने पूर्ण घालवून टाकला होता. यामध्ये उल्लेख करता येतील अशा लावारीस,
मुकद्दर का सिकंदर, याराना, दादा या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल.
प्रसंगी भावूक होणारा, आपल्या चुकांची दुरूस्ती करणारा, मित्रासाठी वाटेल
ते करणारा अशा भूमिका करत तो गब्बर का डर तोडून प्रेक्षकांच्या मनात नायक
बनला होता, हे त्याचे वैशिष्ठ्य होते.त्यांनंतर दाक्षिणात्य आणि
पद्मालयाच्या जितेंद्रपटात तर त्यांनी धुमाकूळच घातला होता. यात
हिंमतवालाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. प्रेक्षकांनी आपल्याला एकाच
भूमिकेने ओळखू नये ही गब्बर का डर असलेली परिस्थिती तोडण्याचे आव्हान
त्याने पेलले होते, त्या कलाकराचे कौतुक करावेच लागेल. विशेष म्हणजे आमच्या
दादा कोंडकेंनीही त्यांना दोन चित्रपटात संधी देऊन त्याचे सोने करून
घेतले. यातील पहिला राम राम गंगारामचा रिमेक असलेला तेरे मेरे बीच में
होता. याशिवाय अंधेरी रात में दिया तेरे हात में होता. आमच्या दादांना
अस्सल सोन्याची पारख होती आणि त्यांनी त्याचा शोध नेहमीच घेतला होता. त्यात
अमजदखान हे नाव जोडले गेले होते.
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
गब्बर का डर.....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा