औद्योगिक विकासाला चालना देत उद्योगधंदे वाढवण्याचे कारण पुढे करत मालक धार्जिणा कामगार कायदा लवकरच आणण्याचे धोरण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आखले आहे. याला शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. भारतीय जनता पक्ष जर काँग्रेस प्रमाणेच भांडवलदारांचा फायदा पाहून श्रमशक्तीवर आघात करण्याचा प्रयत्न करणार असेल तर आज श्रमशक्तीला शेतकरी कामगार पक्षासारख्या विचाराचीच गरज आहे हे यातून स्पष्ट होत आहे. आज संघटीत आणि शासकीय सेवेतील कामगारांची ही अवस्था आहे तर कसलीही सुविधा नसलेल्या असंघटीत कामगारांची काय अवस्था असेल ही कल्पनाच हे भांडवलदार करू शकणार नाहीत. मुळात जागतीकीकरण, खासगीकरण आणि उदात्तीकरणाच्या धोरणा मुळे कामगार वर्गाची पिळवणूक होत आहेच. अशातच मालक धार्जिणा कामगार कायदा अस्तित्वात आल्यास कामगारांच्या हालात आणखीनच भर पडेल. अशा वेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई विवेक पाटील यांच्याशिवाय सर्वसामान्य कामगारांना कोणताही आधार असणार नाही. आपल्या सुरक्षेसाठी आणि भवितव्यासाठी असंघटीत आणि असुरक्षित कामगारांनी भाई विवेक पाटील यांच्या विचाराची पाठराखण करणे गरजेचे असेल. या येऊ घातलेल्या संकटातून शेकापक्ष आणि भाई विवेक पाटील हेच कामगारांना सोडवू शकतील. त्यासाठी मोठ्या संघटनेची गरज आहे, मोठ्या आंदोलनाची गरज आहे. त्याचे नेतृत्व भाई विवेक पाटील यांनी केले पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवला पाहिजे. नव्या कामगार कायद्या अंतर्गत केल्या जाण्यार्या तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांना कोणत्याही कामगार कल्याणाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच पूर्वी 100 कामगार असलेल्या कारखान्यांना तो बंद करण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. या तरतुदीत बदल करून नव्या सरकारने आता मात्र 300 कामगारांपर्यंतचा उद्योग धंदा बंद करण्यासाठी परवानगीची गरज भासणार नाही, असा बदल करण्याचे ठरवले आहे. तसेच कामाच्या स्थळी जर कामगाराचा मृत्यू झाला तर मालकाला शिक्षे ऐवजी केवळ दंड भरावा लागणार आहे. या वरून हे सिद्ध होते की हे सरकार भांडवलदारांची पाठराखण करणारे सरकार आहे. याला कडाडून विरोध करण्याचा इशारा भाई विवेक पाटील यांनी केलेली आहे. ती कामगार हीताची आहे हे सर्व श्रमशक्तीने लक्षात घेवून भाई विवेक पाटील यांनी दाखवलेल्या प्रवाहात येण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा जो कायदा पारित करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार विवेक पाटील यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. कामगार हा देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे. या कायद्याद्वारे कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्यास या सरकारला त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाई विवेक पाटील यांनी दिलेला आहे. यासाठी शेकाप हा कायदा होऊ देणार नाही यासाठी गरज पडल्यास आम्ही टोकाचा संघर्ष करण्यासही मागे पुढे पाहणार नाही असे स्पष्ट मत विवेक पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील उद्योग धंदे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यात जात असताना अशा स्वरूपाचे कायदे आणून देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नक्की काय साधू पाहत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. शेकापच्या बरोबरीने अन्य सर्वच कामगार संघटनांनी या कायद्या विरोधात शड्डू ठोकल्यामुळे फडणवीस सरकार विरुद्ध कामगार असा संघर्ष लवकरच पेटणार हे निश्चित झाले आहे.मोठे उद्योग आणि छोटे कारखाने याबाबत हा निर्णय आहे, तेथील कामगार इतके असुरक्षित होत आहेत तर प्रत्यक्षात ज्या ठिकाणी शंभर पेक्षा कमी कामगार असतील अशाठिकाणी कामगारांची किती पिळवणूक होत असेेल याचा विचार करण्याची गरज आहे.आज या देशात अनेक संस्था, कंपन्या, फर्म अशा आहेत की तिथे पाच ते पंचवीस इतकेच कामगार आहेत. त्यांना कोणत्याही सवलती नसतात, कोणत्याही कामगार कल्याणाच्या योजना नसतात. ठरवून दिलेले अल्प वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यांची अवस्था तर फार वाईट असते. त्यांचे हाल आज कुत्राही खात नाही. ही विषमता निर्माण करणार्या या सरकारला आणि या यंत्रणेला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. ते काम शेतकरी कामगार पक्षाने केले तर फार मोठे काम यातून उभे राहणार आहे.
गरम गरम, नरम नरम ,बेशरम
आज कामगारांना पगाराशिवाय कोणत्याही उत्पन्नाचा मार्ग नसतो. त्यामुळे महिन्याच्या एक तारखेला होणारा पगार याबाबत त्याची अवस्था 1 ते 10 गरम गरम, 11 ते 20 नरम नरम आणि 21 ते 30 बेशरम अशी असते. पगार झाल्यावर सढळ हाताने गरम हाताने खर्च करतो. सगळे हप्ते, देणी देतो. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या मर्यादीत पैशात पुढचे दहा दिवस नरम नरम राहतात. पण नंतरचे 21 ते 30 दिवस त्याला बेशरम व्हावे लागते. 1 तारखेच्या पगाराचे आमिष दाखवून त्याला उधारी उसनवारी करावी लागते. त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत वाईट असते. लाचार होवून त्याला बेशरम व्हावे लागते. त्यामुळे सामान्य असंघटीत कामगारांची अवस्था ही 1 ते 10 गरम गरम, 11 ते 20 नरम नरम आणि 21 ते 30 बेशरम अशी असते.
गरम नरम बेशरमच्यापुढे काय?
सामान्य कामगारांची ही अवस्था आहे तर ज्या फर्म, छोट्या संस्था यामधून वेळेवर पगार होत नाहीत, अल्प पगारात ते काम करतात अशा कामगारांची अवस्था काय असेल हा विचारच न केलेला बरा. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण करणार्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता श्रमशक्तीने भाई विवेक पाटील यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली एक होणे गरजेचे आहे.
अपुर्या पगारामुळे भ्रष्टाचाराची कीड
आज या देशात भ्रष्टाचार हा फार मोठा रोग लागला आहे. पण भ्रष्टाचाराने पैसे मिळवणे सगळ्यांनाच जमते असे नाही. सर्वांनाच पगाराव्यतिरीक्त अन्य मार्ग असतात असे नाही. अशा लोकांची मात्र या बाबत अत्यंत हलाकीची अवस्था असते. अपुर्या वेतनामुळे आणि जादा कामामुळे पोलिस, प्रशासकीय अधिकारी आणि शासकीय अधिकारी भ्रष्ट मार्गाने पैसा जमवतात. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांना सुरक्षितता देणे गरजेचे आहे. पण यापेक्षा वाईट अवस्था असते ती सामान्य असंघटीत आणि छोट्या फर्ममधील कामगारांची. त्यांना असा कोणताही मार्ग अवलंबता येत नाही. त्यामुळे त्यांच हाल अतिशय वाईट असतात. आज अशा कामगारांचे, श्रमिकांचे कैवारी होतील तेच या देशाचे भले करू शकतील.
कामगार कायदे अपुरे
ज्याठिकाणी शासकीय कार्यालये, मोठे कारखाने आहेत त्यांच्यासाठी कायदे आहेत. पण असंघटीत आणि छोट्या फर्ममधील कर्मचार्यांना कसलेही कायदे नाहीत त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आज अशा कामगारांचे नेतृत्व करणारे नेते हे देशाला दिशा देवू शकतात. ते काम भाई विवेक पाटील पूर्ण करतील यात शंका नाही. कारण अपुर्या वेतनात ना कसला भविष्य निर्वाह निधी, ना कसल्या कामगार कल्याणाच्या योजना. यात सामान्य माणूस खूप भरडला जातो. कंत्राटी कामाच्या नावाखाली कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे. हे शोषण थांबवणारे नेतृत्व आज गरजेचे आहे.
भविष्यात कामगारांच्या आत्महत्या पहाव्या लागतील
आज या देशात, महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्या हा फार मोठा प्रश्न आहे. पण शेतकर्यांपाठोपाठ कामगार वर्ग नागवला जात आहे. कामगारांचे जीवन हे हप्तेबंद, इसीएस आणि इएमआयने बंदीस्त झालेले आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज, विमा याचे हप्ते त्याला बँकेमार्फत द्यावे लागतात. पण वेळेवर पगार न होण्यामुळे त्याची बँकेची प्रतिष्ठा कमी होते. बँकांचे कर्जाचे हप्ते वेळेवर पगार न झाल्यामुळे, विमा हप्ते वेळेवर भरले न गेल्यामुळे त्याची पूर्वीची सगळी धडपड वाया जाते. मार्केटमधील त्याचे नाव खराब होते. अन्य कोणत्याही कारणासाठी बँका त्याला जवळ उभ्या करत नाहीत. त्यामुळे अशा असुरक्षित नोकरशाहीत अडकलेल्या कामगारांना भविष्यात आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही अशी बिकट परिस्थिती या देशात आहे. शेतकर्यां पाठोपाठ कामगारही आत्महत्या करू लागले तर या देशातील सामान्य माणसांची अवस्था काय असेल याचा विचारच करता येणे शक्य नाही.
मिशीला तूप लावून जगायचे कसे?
सभ्य माणसाची अवस्था अशी असते की अपमान सांगावा मना आणि सन्मान सांगावा जना. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी उपाशी पोटी असेल तरी सामान्य माणूस मिशीला तूप लावून खोटी ढेकर लावायचा आभास निर्माण करतो आणि आपण उपाशी नाही तर तुपाचे जेवलो आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण या कृतीत लवकरच आपल्या पोटाचा आधार मिळेल ही आशा असते. पण आज मिशिला तूप लावायलाही काही संधी नसल्याची परिस्थिती आहे.
जगाच्या पाठीवर
आज मुंबईत रोजगारासाठी गावाकडून, घाटमाथ्यावरून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात. पण त्यांच्याकडून घरच्यांची काही अपेक्षा असते. आपला मुलगा, आपला नवरा, आपला बाप आपल्याला ठराविक तारखेला पैसे पाठवतील अशी अपेक्षा कुटुंबियांची असते. पण पगार वेळेवर झाला नाही तर त्या कामगाराची अवस्था काय होते आणि त्याने कुटुंबियांना काय सांगावे हा फार मोठा प्रश्न असतो. कामगारांच्या या दुरावस्थेतून त्यांची सुटका करणारा नेता आता कधी येणार याचा विचार कामगार करतो आहे. वेटींग फॉर गोदो ही अवस्था त्यात आहे.
एकही नातेवाईक, मित्र शिल्लक नाही आता
एका कामगाराने काही दिवसांपूर्वी या दयनीय अवस्थेतील प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हटले आहे की पगार वेळेवर झाला नसल्यामुळे इतकी उसनवारी झाली आहे की भाऊ, बहीण, वडील, मित्र, मेहुणा असे अनेकजण झाले. आता उसने पैसे मागायला एकही नातेवाईक मित्र शिल्लक राहिलेला नाही. हे किती विदारक चित्र आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा