महापालिकेच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (इव्हीएम) केलेल्या घोटाळ्यामुळेच भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचा आरोप करून निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मंगळवारी इव्हीएमची अंत्ययात्रा काढली. ‘पारदर्शक’ कारभाराचा दावा करणार्या भाजप सरकारविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या गुरुवारी पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात, पुणे महा पालिकेतील 162 जागांपैकी तब्बल 98 जागा मिळाल्याने भाजपला प्रथमच पुण्याची एकहाती सत्ता मिळाली. परंतु, इव्हीएममध्ये झालेल्या घोटाळ्यामुळेच भाजपला यश मिळाल्याचा आरोप केला जात आहे. अर्थात हे काही या देशात पहिल्यांदाच होत आहे असं नाही. बिहारमध्ये झालेल्या मतदानांनंतर अशी शेका दहा वर्षांपूर्वी घेतली गेली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही याला विरोध होता हे विसरून चालणार नाही. दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी एकत्र येऊन त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. लोकशाही बुडविण्यासाठी इव्हीएमची मदत घेण्यात आल्याने मंगळवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी मशिनची अंत्ययात्रा काढली.पुण्यात जंगली महाराज रोडवरील झाशीच्या राणी चौकापासून ते भाजपच्या निवडणूक कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. भाजप कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. हा तसा अतिरेकच होता. ‘मतांची चोरी हीच का तुमची पारदर्शकता’, ‘इव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटला’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप वगळता इतर पक्षांकडून लढणारे उमेदवार मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. हा सगळा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल. 21 तारखेला 10 महिपालिकांसाठी मतदान झाल्यावर बहुतेक सर्व वृत्त वाहिन्यांवर निकालाचे अंदाज दाखवण्यात आले होते. त्या अंदाजात हेच आकडे होते.वेगवेगळ्या एजन्सीजनी हे अंदाज वर्तवले होते. हे अंदाज जनतेचा कौल घेउन वर्तवले होते. मग ते अंदाज काय मॅनेज केलेले होते का? समजा त्या अंदाजांपेक्षा विरुद्ध निकाल आले असते तर शंकेला वाव होता. परंतु इव्हीएम मशिनबाबत अशा शंका यापूर्वीही घेतल्या गेल्या ओत. पण अंत्ययात्रा काढण्याचा आगाउपणा आजवर कधी झालेला नव्हता. या देशात इव्हॅीएम मशिन ही काही भाजपने आणलेली नाहीत. ती काँग्रेस शासीत काळातच आलेली आहेत. इव्हॅीएम मशिनबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी वातावरण असतानाही पुन्हा काँग्रेस सत्तेवर आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मशिनमध्ये काही गडबड नाही ना? अशी शंका व्यक्त केली होती. पंधरावर्षांपूर्वी चाराघोेटाळ्यांनंतर लालूप्रसाद यादव यांना बिहारमध्ये जे मतदान झाले ते पाहिल्यावर इव्हीएम मशिनमध्ये गडबड झाल्याची शंका व्यक्त केली गेली होती. मशिनवर कोणतेही बटण दाबले तरी लालूप्रसाद यांच्या लालेटेनला म्हणजे कंदीलालाच मत मिळते अशा अफवाही पसरल्या होत्या. तेेंव्हा कोणीही आततायीपणा केलेला नव्हता.सुरवातीपासून ईव्हीएमला शिवसेनाप्रमुखांनी विरोध केल्यावर कोणी त्यांची साथ दिली नव्हती. कारण तेव्हा आज विरोध करणार्यांची, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. आज त्यांना अपयश आल्यावर हे ेशहाणपण कसे सुचले? त्यामुळे यातून स्पष्ट होते की पराभव स्विकारण्याचे मोठेपण या विरोधी पक्षांमध्ये नाही. कायम सत्तेवर असल्यामुळे सत्तेपासून फार काळ दूर राहण्याची भिती वाटते आहेे. पण हे ेकाही आजच घडले आहे असे नाही. अंत्ययात्रा काढणार्यांना तेंव्हा काय झाले ेयाचेही उत्तर द्यावे लागेल.
मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७
ईव्हीएम मशिनवर संशय घेण्याचा प्रकार जुनाच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा