- आपण किती बेअक्कल आहोत हे दाखवण्यासाठी प्रशांत ठाकूर आणि राम ठाकूर यांच्यात सध्या चढाओढच लागलेली दिसत आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळे बहुदा पितापुत्रांना शब्दांचाही अर्थ कळेनासा झालेला दिसतो. अर्थात अक्कल असती तर त्यांना मास्तरकी सोडायची वेळ आली नसती. या बावळट पितापुत्रांना साक्षात्कार झाला की म्हणे , प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांवर आमदार विवेक पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. अर्थात असे त्यांना वाटण्याचे कारण एकतर ते झोपेत स्वप्न पहात असावेत किंवा रात्रीची उतरली नसावी, त्यामुळे अर्धवट अवस्थेत दिवास्वप्न पहात असावेत. पण या त्यांच्या बावळटपणामुळे पनवेलकरांना प्रश्न पडला आहे की शब्दांचा अर्थ कळत नाही, वाक्याचा अर्थ कळत नाही त्याला मास्तर कोणी केला? नशिब आपण त्याच्या हाताखाली शिकलो नाही, नाहीतर आपणही असेच प्रशांत ठाकूरांसारखे निष्क्रिय झालो असतो.
- प्रशांत ठाकूर यांनी जो दोन दिवसांपूर्वी वचननामा नामक खोटारडेपणाचानामा प्रसिद्ध केला आहे, त्यावरून रामप्रहरच्या बोरूबहाद्दरांनी 600 कोटींची शेकडो विकासकामे केली असे आपल्या अग्रलेखातून म्हटले होते. त्याला सवाल केला होता की, जर 600 कोटी रूपयांची विकासकामे केली असे म्हणता, तर मग काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? पण या बिनडोक पितापुत्रांना त्याचा अर्थ कळला नाही. त्याचे उत्तर देण्याची हिंमत नाही, त्यामुळे सोयीचा अर्थ लावला. पण पितापुत्र बिनडोक असले म्हणजे मतदार बिनडोक नाहीत. मतदारांना बेअक्कल ठरविण्याच्या या पितापुत्रांच्या बावळटपणामुळे पितापुत्रांना मतदारच त्यांची जागा दाखवून देणार आहेत.
- बुडत्याचा पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणे प्रशांत ठाकूर यामुळे आणखी अडचणीत आले आहेत. त्याच लेखात विचारले होते की 600 कोटी रूपयांची कामे केली म्हणता मग ते पैसे कुठे खर्च केले हे सांगा. तर त्यावर यांची दातखिळ बसली. कारण कामे केलीच नाहीत तर सांगणार कोठून? जो विकासकामे करू शकतो, ज्याने एवढी विकासकामे केली आहेत त्याला निवडून येण्याची चिंता करण्याचे कारण नसते. मग काँग्रेसमधून आपण निवडून येणार नाही हे समजल्यावर काँग्रेस सोडली. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या निष्क्रियतेवर त्यांच्या या बावळटपणामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. विकासकामे केली होती तर काँग्रेस सोडण्याची गरज काय होती हा साधा प्रश्न होता. पण तो प्रश्न केल्यामुळे प्रशांत ठाकूर यांचे पुरते वस्त्रहरण झाले. पितापुत्रांचा थयथयाट झाला. आता मतदारांनी 600 कोटीच्या विकासकामांचा हिशोब विचारला तर काय करायचे? या भितीने त्यांनी आमदार विवेक पाटील यांनी आमच्या कामावर शिक्कामोर्तब केले म्हणून स्वत:चीच स्वत: पाठ थोपटून घेण्याचा बावळटपणा केला. पण जग हे बघते आहे.
- प्रशांत ठाकूर काँग्रेस सोडताना मुख्यमंत्री किती निष्क्रिय आहेत, काही कामे करत नाहीत, कसली मंजूरी देत नाहीत असे सांगून मुख्यमंत्र्यांच्या नावाने खडे फोडून काँग्रेस सोडणारा आमदार हा 600 कोटी रूपयांची कामे करूच शकत नाही हे सर्वांना माहित आहे. काँग्रेसमध्ये गेल्यामुळे कसलाही विकास करता आला नाही, ही काँग्रेस निष्क्रिय आहे, नुसती आश्वासने देते असे गळा ताणून, घसा खरवडून प्रशांत ठाकूर 13 सप्टेंबरला सांगत होते. मग ही कामे झाली असे भाजपच्या वचननाम्यात कसे काय सांगू शकता? त्यामुळे प्रशांत ठाकूर यांनी जर काही केले असेलच तर ते भाजपने केले असे ते कसे काय सांगू शकतात? या सगळ्या थापेबाजीमुळे प्रशांत ठाकूर स्वत:च निर्माण केलेल्या जाळ्यात अडकले आहेत आणि शेकापक्षावर टिका करत सुटले आहेत.
- असे पाठ फिरवून, पाय लावून पळून जावून मतदार तुम्हाला दारात उभे करणार नाही. जे प्रश्न कर्नाळाने उपस्थित केले आहेत त्याची उत्तरे द्यावीच लागतील. 600 कोटी रूपये कुठे खर्च केले हे प्रशांत ठाकूर यांनी सप्रमाण, पुराव्यानिशी जाहीर करावे. एवढी विकासकामे करणार्या माणसाला पराभवाची भिती का वाटली? त्या भितीने काँग्रेस सोडून भाजपमध्ये यावेसे का वाटले? असेल अंगात पुरूषार्थ, कर्तृत्त्व तर द्या उत्तर. पनवेलमध्ये सगळेच काही राम ठाकूर यांचे विद्यार्थी नाहीत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा बाणेदारपणा प्रामाणिक माणसातच असतो. या प्रश्नांची उत्तरे अनेक दिवसांपासून प्रशांत ठाकूर टाळत आहेत यातच त्यांच निष्क्रियपण सिद्ध होत आहे. हा निष्क्रियपणा झाकण्यासाठी विषयाला बगल दे, खोटे गुन्हे नोंदव, पोलिसांना हाताशी धर असले प्रकार करत आहेत. पण प्रशांत ठाकूर यांना मतदान होईपर्यंत हा प्रश्न मतदार विचारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण येत्या 19 तारखेला प्रशांत ठाकूर दुसर्या क्रमांकावरही असणार नाहीत. त्यांना तिसर्या क्रमांकावर जावे लागले आहे.
- कोणताही भ्रष्ट दगड भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आणावा आणि त्याला भाजपच्या मतदारांनी मतदान करावे हे कदापि शक्य होत नाही. ती प्रथा फक्त काँग्रेसमध्ये पूर्वी होती. त्यामुळे स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी आणि ठेकेदारी करण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या प्रशांत ठाकूर यांना आता जास्तीत जास्त मतदारांनी नाकारायचे ठरवले आहे.
- गद्दारी ज्यांच्या रक्तात भरलेली आहे त्या नासक्या रक्ताला आता पुन्हा संधी मिळणार नाही. जनता दलाशी गद्दारी. शेतकरी कामगार पक्षाशी गद्दारी. काँग्रेसशी गद्दारी. राष्ट्रवादीशी गद्दारी करून आता भाजमध्ये गेल्याने शुद्ध होतील असे समजत आहेत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जातो, सत्तेच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवता येतील. असे सांगून शेतकरी कामगार पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले. दहा वर्षात केद्रात, राज्यात त्यांची सत्ता होती. तेव्हा एकही प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. जे एन पी टीचे , सिडकोचे ठेके मात्र घेता आले. त्यासाठी मुख्यमंत्री भेटत होते. फक्त टोल प्रश्नावर निर्णय घ्यायला मुख्यमंत्री भेटत नव्हते? वाढदिवसाला यायला मुख्यमंत्र्यांना वेळ होता पण टोलचा निर्णय घ्यायला वेळ नव्हता? अरे किती फसवाल? कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर? सिडकोच्या संचालकांना अंधारात ठेवून भूखंड लाटला, त्यावर मुख्यमंत्र्यांची चूपचाप सही घेता येते मग टोलप्रश्नावर त्यांना बोलायला का जमत नाही? कारण प्रशांत ठाकूर यांना माहित होते. त्यांना फक्त मतदारांन फसवायचे होते. पण मतदारांनी प्रशांत ठाकूर यांचा स्वार्थीपणा ओळखला आहे. म्हणूनच जवळजवळ शंभर वेळा प्रश्न विचारून झाला आहे की, जर सायन पनवेल रस्त्याचे काम प्रशांत ठाकूर यांना मिळाले असते तर त्यांनी टोलचे आंदोलन केले असते का? याचे उत्तर देता न आल्यामुळे त्यांची 9 इंच फाटली. ती सावरण्यासाठी प्रश्नांना बगल देण्याचे काम ते करत आहेत. पण जेवढी ते उत्तर देण्याची टाळाटाळ करत आहेत, तेवढे त्यांचे मतदार आणखी दिवसेंदिवस कमी होताना दिसणार आहेत.
- आज काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे राज्यभर भाजपबद्दल संतापाची लाट आहे. महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या भाजपला सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही हे अस्सल मराठी माणसाने निश्चित केले आहे. ज्या काँग्रेसला नाकारायचे, ज्या भ्रष्ट आणि निष्क्रिय काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदार जागृत झालेला असताना त्याच भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी देण्याचे पाप जर भाजप करीत असेल तर त्यांना त्यांची जागा मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय कसा राहील? आंब्याच्या दिवसात ते बाहेरून आलेले विक्रेते हापूस आंबे म्हणून कागदी खोक्यातून, चकाकच पॅक अशी खोकी विकत असतात. हापूस हा शब्दही त्यांना माहित नसतो. पण रत्नागिरी हापूस म्हणून मराठी कोकणी माणसालाच ते असे आंबे विकायला येतात. एखादा माणूस ती पेटी विकत घेतो. आत उघडून पाहिल्यावर लक्षात येते की हा हापूस नाही. हा तर रायवळ आंबा आहे. तसे हे बाहेरून आलेले उपरे भाजपचे लोक हापूसच्या पॅकींगमध्ये प्रशांत ठाकूर यांच्यासारखे रायवळ, आढी नासवणारे आंबे हापूस म्हणून विकत आहेत. पण मतदार आता पेटी उघडून दाखव म्हणतील. हापूस असेल तरच घेतील. नाहीतर भिरकावून देतील. तसेच प्रशांत ठाकूर यांना जनता आता प्रश्न विचारते आहे की, 600 कोटी रूपये कुठे गेले? कशावर खर्च केले? ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टने सायन पनवेल मार्गाचे काम केले असते तर टोलमाफीचे आंदोलन केले असते का? भोपाळच्या घातक कचर्याचे तळोजात आणून जाळून टाकण्याचा जो विषप्रयोग होणार होता त्याला विरोध का केला नाही? पनवेलचे आमदार असूनही त्या प्रश्नावर चर्चा होत असताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथून पळ का काढला? दहा वर्षात केंद्रात राज्यात सत्ता असताना जमले नाही मग आता कसे जमेल? या प्रश्नांची प्रशांत ठाकूर उत्तरे देवूच शकणार नाहीत. कारण उत्तर फक्त प्रामाणिक माणूसच देवू शकतो. ज्यांच्या अंगात दम असतो असा पुरूषार्थ असलेला माणूसच उत्तर देवू शकतो. हे निष्क्रिय लेचे पेचे का या प्रश्नांची उत्तरे देणार?
गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४
सध्याचा भाजप म्हणजे हापूसच्या पेटीत रायवळ आंबे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा