मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

19 तारखेला पराभव झाल्यावर प्रशांत ठाकूर भाजपमध्ये असतील का?


  • उरण आणि पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारा पक्ष आहे याची सर्वांना खात्री आहे. युती आणि आघाडी यांच्यात राज्यभरात कितीही कुरघोड्या झाल्या तरी शेतकरी कामगार पक्ष मात्र आपले स्थान राखून आहे, राखून राहील आणि त्यांचे संख्याबळ वाढतच जाईल यात शंकाच नाही.
  • गेल्या वर्षभरात मुंबईतही शेतकरी कामगार पक्षाने आपली चांगली ताकद निर्माण केलेली आहे. कारण हा पक्ष कष्टकर्‍यांचा, सामान्यांचा आणि शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे या पक्षाची गरज आहे हे सामान्य मतदारांमध्ये रूजले आहे.
  • रामशेठ ठाकूर-प्रशांत ठाकूर यांना वाटते आपण नसलो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष शून्य होईल. पण गद्दारी करणार्‍या या पितापुत्रांना मतदारांनी दाखवून दिले आहे की तुम्ही गेल्यावर शेकापक्ष संपला नाही तर वाढला आहे. रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षात होते तेव्हा 2004 मध्ये शेकापक्षाचे फक्त 2 आमदार होते. त्यानंतर ठाकूर पितापुत्र काँग्रेसमध्ये गेले आणि शेकापक्षाचे 2 चे चार आमदार झाले. ताकद दुप्पट झाली. उलट काँग्रेसपक्ष क्षीण झाला. पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये असलेले काँग्रेसचे सदस्य कमी होत गेले. ग्रामीण भागात असलेली काँग्रेस नष्ट झाली. त्यामुळे गेल्या पाच वर्षात सर्वाधिक ग्रामपंचायती या शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आल्या.  कृषी उत्पन्न बाजारसमितीत तर काँग्रेस शून्य झाली. पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत काँग्रेस शून्य झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेसमुक्त पनवेल-उरण हे केव्हाच करून टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसमधून आपल्याला तिकीट मिळणार नाही, मुलाखतीलाही आमंत्रण दिले गेले नाही, प्रशांत ठाकूर यांची निष्क्रियता स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेसने दुसरे उमेदवार शोधण्यास सुरूवात केली होती. गेल्या सहा महिन्यात आम्ही आमच्या अग्रलेखातून दुसराच काटा येणार हे वारंवार सांगितले होते. तसेच झाले. त्यामुळे प्रशांत ठाकूर लगेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले.
  • राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेतेही निष्क्रिय आणि लबाड आहेत. आयत्या बिळावर नागोबा होणारे आहेत. कसला विचार नाही की आचार नाही. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करून स्वबळाची भाषा करू लागले. पण स्वबळावर लढण्याची भाषा करू लागले. पण स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तेवढे उमेदवार तरी हवेत ना भाजपकडे? मग काय त्यांनी गद्दारांची शोधाशोध सुरू केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, शेतकरी संघटना, अपक्ष अशा वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार, माजी आमदार आपल्यात घेवून कसेबसे दोनअडीचशे उमेदवार उभे केले. पण त्यात ओरीजनल भाजपचे पन्नासही उमेदवार नाहीत. ज्या शिवसेनेने आपल्याला मोठे केले त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या भारतीय जनता पक्षाने शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या, काँग्रेसशी गद्दारी करणार्‍या प्रशांत ठाकूर यांना आपली उमेदवारी दिली. कसे मतदार यांना निवडून देतील? मतदारांना काय मूर्ख समजतात हे लोक?
  • काँग्रेसमध्ये जावून काँग्रेस संपवली आणि आता भारतीय जनता पक्षात जावून भाजपला खिंडार पाडण्यापलिकडे हे गद्दार काही करू शकणार नाहीत. प्रशांत ठाकूर यांनी जाहीर करावे की 19 तारखेला त्यांचा पराभव झाल्यानंतर प्रशांत ठाकूर भाजपमध्ये असतील का? 19 ऑक्टोबरनंतर पराभव झाल्यानंतर प्रशांत ठाकूर नरेंद्र मोदींचे, सूषमा स्वराज यांचे गोडवे गातील का? नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देवून हातात झाडू घेवून सफाई करतील का? हे निव्वळ स्वार्थाचे आणि सोयीचे राजकारण करत आहेत. आज राज्यातील भारतीय जनता पक्ष हा स्वार्थी, भ्रष्टाचारी आणि बरबटलेल्या नेत्यांचा पक्ष आहे. बाटग्यांचा पक्ष आहे. आयात केलेल्या नेत्यांचा पक्ष आहे. त्यामुळे केंद्रात जरी भाजपला शत प्रतिशत भाजप म्हणत मतदारांनी कौल दिला तरी राज्यात भाजपला जनता नाकारेल यात शंकाच नाही. त्यामध्ये सर्वात दारूण पराभव होईल तो पनवेल विधानसभा मतदारसंघातून प्रशांत ठाकूर यांचा.
  • 2009 च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी अण्णा हजारे यांचे प्रमाणपत्र खरेदी करून आपण स्वच्छ असल्याचे दाखवून प्रचार केला होता. आता हेच प्रशांत ठाकूर अण्णा हजारेंना विसरले आहेत. अण्णांवर टिका करतात. अण्णांवर बोलण्यास टाळतात. वारंवार पक्ष बदलणार्‍या, भ्रष्ट अशा प्रशांत ठाकूर यांना अण्णा हजारे आता विकत तरी प्रमाणपत्र देतील का? ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चरला सायन पनवेल महामार्गाचा ठेका मिळाला नाही म्हणून मी हे आंदोलन केले, या आंदोलनाला अण्णांचा पाठिंबा आहे असे पत्र प्रशांत ठाकूर यांनी आणून दाखवावे.
  • आज सूषमा स्वराज यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना प्रचारासाठी यावे लागते यातच प्रशांत ठाकूर यांची लायकी दिसून येते. त्यांना स्थानिक काय माहिती आहे? त्यांना पाहण्यासाठी म्हणून लोक येतील. त्यांना ऐकण्यासाठी लोक येतील. पण याचा अर्थ जमलेली गर्दी ही काही मतदारांमध्ये परिवर्तीत होईल असे समजण्याचे कारण नाही. शेतकरी कामगार पक्ष क्षीण झाला असे राम ठाकूर- प्रशांत ठाकूर आपल्या वर्तमानपत्रातून   म्हणतात मग त्याच्याविरोधात प्रचार करण्यासाठी एवढे मोठे नेते त्यांना का आणावे लागतात? पितापुत्र क्षीण झाले आहेत, त्यांच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारामुळे जनता त्यांन विटली आहे याची जाणिव झाल्यामुळे पितापुत्रांना वैफल्य आले आहे. त्यामुळे यांच्याकडे बघून तरी आम्हाला मतदान करा असा टाहो फोडण्याचे काम प्रशांत ठाकूर करीत आहेत. पण त्यांच्याकडे बघून लोकसभेला जनतेने भरभरून कौल दिलेला आहे. विधानसभेला त्यांचे काही काम नाही. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांना घरीच बसावे लागणार आहे हे निश्‍चित.
  • राहुल गांधी, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. त्याचे भांडवल पाच वर्ष केले. आता तसेच फोटो सूषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्याबरोबर काढून आपली चर्चा चालू आहे, टोल बंद होणार आहे असे फसवण्याचा प्रयत्न प्रशांत ठाकूर करणार आहेत. सगळ्यात विनोदाचा भाग म्हणजे प्रशांत ठाकूर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कटआउटबरोबर फोटो काढला आणि त्यांच्याशी आपली चर्चा झाली म्हणून तो फोटो रामप्रहरमध्ये छापला. हा खोटेपणा अंगलट आल्यामुळे काँग्रेसने ही घाण पहिली बाहेर काढली पाहिजे म्हणून लाथाडायला सुरूवात केली. ती घाण आता भाजपमध्ये येवून पडली आहे. परंतु नरेंद्र मोदींनी या देशात स्वच्छतेचे आवाहन केलेले आहे. त्याप्रमाणे इथला मतदार स्वच्छता अभियानात भाग घेणार असून प्रशांत ठाकूर यांना कचर्‍याप्रमाणे लांब फेकून देणार आहे. जसा आमदार विवेक पाटील यांनी तळोजातील घातक कचर्‍याला विरोध केला त्याचप्रमाणे इथला मतदार प्रशांत ठाकूर यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. एकदा आमदारकीची संधी देवूनही प्रशांत ठाकूर यांनी काय केले? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. पनवेल मतदारसंघात भोपाळचा घातक विषारी कचरा आणून टाकण्याचे षडयंत्र सुरू होते. त्याला लोकप्रतिनिधी म्हणून विरोध करणे प्रशांत ठाकूर यांचे कर्तव्य होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामागे नेमका अर्थ काय होता हे सगळ्या मतदारांना समजले आहे. त्या घातक कचर्‍याला आमदार विवेक पाटील यांनी विरोध केला नसता तर प्रशांत ठाकूर यांच्या कृपेने तो कचरा तळोजात आला असता, इथल्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले असते. यावर आमदार विवेक पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला. पण आपल्या मतदारसंघाचा प्रश्‍न असूनही प्रशांत ठाकूर यांनी तेथून पळ काढला, चर्चेत भाग घेतला नाही, याचा अर्थ मतदारांनी समजून घेतला आहे. ज्या भ्रष्ट आणि स्वार्थी  भाजपच्या नेत्यांना, ज्या विनोद तावडेंना प्रशांत ठाकूर यांचे समर्थन करायचे आहे त्यांनीही याचा जबाब दिला पाहिजे. पनवेलकरांना मृत्यूच्या दाढेत नेणार्‍या प्रशांत ठाकूर यांना तुम्ही उमेदवारी देता, म्हणजे तुम्ही किती विषारी आहात हे पनवेलकरांनी पाहिले आहे. त्यामुळेच भाजपला मतदार आता नाकारतील हे निश्‍चित आहे. राम ठाकूर प्रशांत ठाकूर यांनी शेकापक्ष क्षीण झाला आहे असे म्हटले आहे पण प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेस क्षीण केली आणि आता भाजप क्षीण करण्यासाठी ते भाजपत गेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: