महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रागरंग आणि हवा एकदम बदलू लागली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होणार आणि युतीचे सरकार सत्तेवर येणार असे चित्र होते. परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थी राजकारणामुळे ही हवा गेल्या आठ दिवसात पूर्ण बदलली आणि महाराष्ट्राला अस्थिरतेच्या दिशेने घेवून जाण्याची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या अस्थिरता निर्माण करणार्या आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती निर्माण करणार्या भाजपला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. ही राष्ट्रपती राजवट काल पुकारलेली म्हणत नाही तर अजून वीस दिवसांनी अस्थिर कौल मिळाला, दिल्ली विधानसभेत गेल्या डिसेंबरमध्ये जे घडले तसेच महाराष्ट्रात घडले तर किमान सहा महिन्यांसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता आहे.असे अस्थिर निकाल यापूर्वी बिहारमध्ये पाच सहावर्षांपूर्वी लागले होते. त्यामुळे बिहारमध्ये सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. भाजप, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पार्टी, काँग्रेस आणि अन्य अपक्ष अशा सगळीकडे पंचरंगी लढती झाल्या होत्या. त्यावेळी कोणतेही दोन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन करू शकत नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नव्हता. नेमके झालेही तसेच. गतवर्षी दिल्लीत आम आदमी पार्टीने केलेल्या शिरकावामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली. गेले वर्षभर दिल्ली विधानसभा अस्थिर अशी राहिली आहे. आता तीच वेळ महाराष्ट्रावर येणार आहे. याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या स्वार्थी नेत्यांवर राहणार आहे. त्यामुळे जर तशी परिस्थिती निर्माण झालीच तर पुन्हा होणार्या निवडणुकीत भाजपचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही.सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारी भाजपची प्रवृत्ती ही काँग्रेसी प्रवृत्ती झालेली आहे. त्यामुळे या भाजपला नाकारण्याची आता वेळ आलेली आहे. केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजप यात जमीन आसमानाचा फरक आहे. लोकांना परिवर्तन हवे आहे. परंतु परिवर्तन म्हणजे पक्षांतर असे समीकरण भाजपने मांडून काँग्रेसच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात थारा देवून जनतेची फसवणूक चालवलेली आहे. हे लोक कधीच महाराष्ट्राचे हीत चिंतू शकत नाहीत. जे काँग्रेसच्या माध्यमातून सत्तेत असताना आपल्या मतदारसंघासाठी काही करू शकले नाहीत ते भाजपच्या अजून न आलेल्या सत्तेत गेल्यावर काय करणार आहेत? त्यांच्या हातात सत्ता देवून कोणाचे भले होणार आहे? त्यामुळे हे गद्दारी विष फैलावणार्या या भारतीय जनता पक्षाला रोखणे म्हणजेच काँग्रेसला रोखणे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.आज महाराष्ट्रातील भाजपला गडकरी फडणवीस यांनी, तावडे बेवडे यांनी भ्रष्ट केले आहे. इतके वर्ष हा पक्ष जातीयवादी आहे, धर्मांध आहे म्हणून टिका करणार्या काँग्रेसजनांना आपल्यात घेवून भारतीय जनता पक्ष धर्मनिरपेक्ष आहे असे चित्र दिसेल असे गडकरींना वाटते काय? उलट काँग्रेसच्या दुष्ट प्रवृत्ती भाजपमध्ये शिरल्यामुळे जातीयवादाला उत आल्याशिवाय राहणार नाही. हीच काँग्रेस सत्तेचा गैरफायदा उठवत दलितांना हाताशी धरून, सत्ता आणि पैशाच्या जोरावर सर्वसामान्य, सवर्ण विशेषत: ब्राह्मण समाजाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात धन्यता मानत राहिली. त्यामुळे आगामी काळात भाजपसारख्या पक्षाबरोबर काँग्रेसचा हाच विचार गेला या राज्यातील निरपराध ब्राह्मणांना टाचा घासून मरावे लागेल. खोटे गुन्हे नोंदवून सामान्य माणसांना अडकवण्याचे कारस्थान हे लोक करतील. पुरोगामी असलेल्या महाराष्ट्राला जातीयतेच्या विळख्यात अडकवून जातीजातीत फूट पाडण्याचे काम करतील. जे काँग्रेसने केले तेच जर भाजप करणार असेल तर भाजप या राज्यात रूजण्यापूर्वीच त्यांना खुडण्याची हीच वेळ आहे.आज भारतीय जनता पक्ष हा तुकडे पाडणे, विभाजन करणे, फूट पाडणे आणि कलह माजवणे याशिवाय काही करू शकत नाही. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचे काम भाजप आणि काँग्रेस दोघांच्या अजिंड्यात आहे. परंतु या संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी अशा भाजपला बाजूला ठेवणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. छोटी छोटी राज्ये निर्माण करून भाजपशासीत राज्यांची संख्या वाढवणे एवढेच त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडेे पाडण्यासाठी हे लांडगे आतूर झालेले आहेत. महाराष्ट्रापासून विदर्भ कधीही वेगळा होवू द्यायचा नसेल तर भाजप आणि काँग्रेसला नाकारले पाहिजे. कारण भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आंध्रप्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला. त्याचा फटका काँग्रेसला बसला तर त्याचा लाभ भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळवला. आता महाराष्ट्राचे विभाजन करून कधी आपल्याला लाभ तर कधी काँग्रेसला असा खेळ करत हे दोन पक्ष देशाचे तुकडे करतील हे लक्षात घेतले पाहिजे.मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईवर या दोन्ही पक्षांचे डोळे लागले आहेत. महाराष्ट्रापासून ही मुंबई तोडून ती केंद्रशासीत करण्याचा घाट हा पक्ष करताना दिसत आहे. चीनचे राष्ट्रपती भारत भेटीवर आल्यावर मुंबईचा शांघाय करण्यासाठी मुंबईत चीनला गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले. यावर कोणीही कसलीही चर्चा करून आपली मते मांडली नाहीत याचे आश्चर्य वाटले. मुंबईला मुंबईच राहु दिले पाहिजे. मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. या मुंबईसाठी आमच्या 105 हुताम्यांचा बळी गेला आहे. ते सगळे लाल बावटा हातात घेतलेले गिरणी कामगार होते. या हुतात्म्याचे बलिदान वाया घालवून पुन्हा मुंबई वेगळी करण्याचा हा जो घाट भाजपने घातला आहे त्याला वेळीच विरोध झाला पाहिजे. ती वेळ आत्ताची आहे. या निवडणुकीत भाजपला नाकारून महाराष्ट्राचे हीत साधले पाहिजे.भारतीय जनता पक्षाला जे सध्या मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत त्यांनी आपल्या उमेदवारांवरून जरा नजर फिरवावी आणि 25 उमेदवार किंवा संभाव्य आमदार ओरीजनल भाजपचे आहेत काय हे दाखवावे. सगळे बाटगे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांतून स्वार्थासाठी आलेले डोमकावळे आहेत. राज्याचे लचके तोडण्यासाठी, राज्याला लुटण्यासाठी आलेले हे लुटारू आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तोच ज्याच्यामध्ये प्रबळ देशाभिमान आहे. ज्याच्यामध्ये जाज्वल्य हिंदुत्त्व आहे. जो कधीकाळी संघमैदानावर गेलेला आहे. ज्याला डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली स्थापन केलेली संघटना माहित आहे. ज्याला गोळवलकर गुरूजींचे विचार पटतात. राजकारणात न जाता बाहेरून अंकुश ठेवण्याचे काम करणार्या संघाच्या मैदानावर जो गेलेला आहे तो खरा भाजपचा कार्यकर्ता, उमेदवार.पण तहहयात भाजप आणि संघावर गलिच्छ टिका करणार्या, संघावर नको ते आरोप करून देशद्रोही ठरवणार्या काँग्रेसजनांना आज भाजप आपल्यात घेत आहे. कसे विसरले गडकरी की 1975 साली याच काँग्रेसने आणीबाणी आणली आणि संघावर बंदी घातली. मिसा कायद्याखाली संघाच्या स्वयंसेवकांना अठरा महिने कारावास भोगावा लागला. अर्थात आणीबाणीच्या काळात शिक्षा भोगावी लागली होती ती अटलबिहारी वाजपेयींना, शिक्षा भोगावी लागली ती अडवाणींना, तुरूंगात गेले ते प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे हे निष्ठावंत संघ मैदानावरून आलेले स्वयंसेवकांना. संधीचा फायदा उठवणार्यांना त्याची काय पत असणार आहे? त्याच वाजपेयींचे सरकार एक मताने पाडून देशाला निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडणार्यांना हेच गडकरी आपल्या पक्षात घेतात आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करतात. अशा लोकांना आपण कशी काय मते द्यायची? हे भाजप काँग्रेसवाले देशाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याकडून राज्याचे कोणतेही हीत पाहिले जाणार नाही. त्यामुळे परिवर्तनाची लाट आहे, भाजपची लाट आहे असे भासवून जुन्याच भ्रष्ट काँग्रेसजनांना भगव्या वस्त्राखाली घेवून परिवर्तन झाले असे भासवणार्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे.
सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४
काँग्रेसजनांनी भगवी वस्त्र परिधान केली म्हणजे परिवर्तन नव्हे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा