रविवार, ९ जून, २०१३

आज देशाला परिवर्तन हवे आहे



 

 आज देशाला परिवर्तन हवे आहे

आज देशाला परिवर्तन हवे आहे

 

नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या निवडणुकीचे प्रचार प्रमुख केले आणि अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या . नरेंद्र मोदींना विरोध करणारे लोक अत्यंत अंध पाने आणि पूर्वग्रह दुषित हेतूने विरोध करताना दिस्तत.
आज देशाला एका परिवर्तनाची गरज आहे. अशा परिस्थितीत नवे नेतृत्व निर्माण होणे गरजेचे आहे. नव्याचे नेहमीच सर्वाना आकर्षण असते. राजीव गांधी जेव्हा वैमानिक होते तेव्हा त्यांना विमान चालवण्याचा अनुभव होता . तरीही या देशातील जनतेने देश चालवायला त्यांना दिलाच ना ?
मग नरेंद्र मोदींना विरोध करण्याची प्रवृत्ती का बळावत आहे?
केवळ गोध्रा प्रकरणाने त्यांना विरोध केला जात आहे . हा कॉंग्रेस आणि तत्सम विचाराच्या लोकांचा मनाचा संकुचितपणा आहे.
इंदिरा गांधी हत्येनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शीखांचा संहार केला होता .त्याची जबाबदारी राजीव गांधी यांच्यावर कोणी लाडात नाही
मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे हिंदुत्ववादी नेते म्हणूनच पहिले जाते . असा दुजाभाव का?
नरेंद्र मोदी यांच्यामुळे भा ज प ला सत्ता मिळाली तर ते दीर्घ काळ ती संधी सोडणार नाहीत अशी कोणाला वाटते काय?